अ‍ॅपशहर

...म्हणून तिरंगा उलटा झाला होता: अक्षय कुमार

महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंना प्रोत्साहन देताना तिरंगा उलटा पकडल्याबद्दल माफी मागणाऱ्या अभिनेता अक्षय कुमारनं तब्बल पाच दिवसांनंतर या प्रकरणी आपली बाजू मांडली आहे.

Maharashtra Times 28 Jul 2017, 3:33 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम akshay kumar reaction on holding indian flag upside down
...म्हणून तिरंगा उलटा झाला होता: अक्षय कुमार


महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंना प्रोत्साहन देताना तिरंगा उलटा पकडल्याबद्दल माफी मागणाऱ्या अभिनेता अक्षय कुमारनं तब्बल पाच दिवसांनंतर या प्रकरणी आपली बाजू मांडली आहे. 'खरंतर मी राष्ट्रध्वज उलटा पकडलाच नव्हता. माझ्याजवळचा घडी घातलेला राष्ट्रध्वज उघडत असताना तो उलटा उघडला. त्याचवेळी मागून कोणीतरी त्याचा फोटो काढला. त्यामुळं तो उलटा दिसत होता,' असं त्यानं स्पष्ट केलं आहे.

गेल्या रविवारी भारत-इंग्लंडमध्ये झालेल्या अंतिम सामन्यादरम्यान भारताच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अक्षय कुमार लॉर्ड्सवर उपस्थित होता. त्यावेळी त्यानं तिरंगा उलटा पकडल्याचा एक फोटो व्हायरला झाला होता. त्यावरून सोशल मीडियात त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. त्याबद्दल त्यानं माफीही मागितली. 'टॉयलेट एक प्रेम कथा' या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्तानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यानं याबाबतची वस्तुस्थिती सांगितली. 'टीव्हीवर पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की मी तिरंगा सरळच पकडला होता. केवळ तो उघडत असताना उलटा उघडला गेला होता. मागून फोटो काढला गेल्यामुळं तो तसा दिसत होता. पण तरीही कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर माफी मागतो. याआधीही माफी मागितली आहे. पुन्हा एकदा मागतो,' असं त्यानं सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज