‘स्टुडंट ऑफ द इअर’ मधून आपल्या करिअरचीची सुरुवात करणारी अलिया भट एकामागोमाग सिनेमे करत अव्वल बनली. सिनेमांत कामं करतानाच, ती सोशलीही कमालीची अॅक्टिव आहे. इंडस्ट्रीतल्या ताणतणावांमुळे एकिकडे इंडस्ट्रीतलं नैराश्य वाढत असताना, अलियाला मात्र हा ताण हवाच असं वाटतं.
गेल्या काही महिन्यांपासून नैराश्याने ग्रासलेल्या अनेक तारकांनी मृत्यूला कवटाळलं. त्याचवेळी दुसरीकडे अनेक लोक या ताणातून सावरण्यासाठी वेगवेगळे उपाय योजताना दिसतात. अलियाला मात्र असं वाटत नाही. तिला वाटतं, ताण, प्रेशर असलं की पाय जमिनीवर रहातात. ‘ते खरंच आहे. प्रेशर असल्यामुळे पाय जमिनीवर राहतात. कामावर सतत लक्ष ठेवण्यासाठी ताण परिणामकारक ठरतो. कामावर खूप छान फोकस होतो. काम करताना बऱ्याचदा टीका सहन करावी लागते. इंडस्ट्रीमध्ये खूप स्पर्धा आहे. फार अंगाला लावून न घेता काम करणं हाच यावरचा पर्याय आहे,’ असं ती सांगते. कामाबाबत फोकस असण्याबाबत बोलताना ती म्हणते, माझा आगामी डिअर जिंदगी हा सिनेमाही खूप वेगळा आणि महत्त्वाचा आहे. या सिनेमातून माझं कौतुक झालं तर छानच आहे. पण बऱ्याचदा टीका होण्याची शक्यता असते. पण त्याला आपण तयार असलं पहिजे.
किंग खान आणि केमिस्ट्री
‘माझा नवा सिनेमा खूपच सोपा आहे. त्यातल्या मुलीला अनेक प्रश्न पडत असतात. त्या सगळ्याची उत्तरं शाहरुख तिला देतो. ही फिल्म मला खूप जवळची आहे, कारण यात शाहरुख माझ्यासोबत आहे. त्यांची सिनेमे पाहात आम्ही लहानाचे मोठे झालो. त्याच्याच सिनेमांनी मला प्रेम, रोमान्स असं सगळं शिकवलंय, ’ असंही ती सांगते.
सिद्धार्थ-वरूण स्पेशल
वरुण धवनपासून शाहरुख खानपर्यंत सगळ्यांसोबत काम केलेल्या अलियाचे खरे दोस्त हे वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे आहेत. ‘या दोघांसोबत मी माझ्या करिअरची सुरुवात केली. माझी चिडचिड होत असेल, किंवा माझा मूड नसेल तर हे दोघेही माझा मूड लगेच ट्रॅकवर आणतात. या दोघांसोबत मी जास्त कम्फर्टेबल असते. आमच्यातही भांडणं होतात. वाद होतात. पण तेच माझे खऱ्या अर्थाने 'डिअर जिंदगी' आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून नैराश्याने ग्रासलेल्या अनेक तारकांनी मृत्यूला कवटाळलं. त्याचवेळी दुसरीकडे अनेक लोक या ताणातून सावरण्यासाठी वेगवेगळे उपाय योजताना दिसतात. अलियाला मात्र असं वाटत नाही. तिला वाटतं, ताण, प्रेशर असलं की पाय जमिनीवर रहातात. ‘ते खरंच आहे. प्रेशर असल्यामुळे पाय जमिनीवर राहतात. कामावर सतत लक्ष ठेवण्यासाठी ताण परिणामकारक ठरतो. कामावर खूप छान फोकस होतो. काम करताना बऱ्याचदा टीका सहन करावी लागते. इंडस्ट्रीमध्ये खूप स्पर्धा आहे. फार अंगाला लावून न घेता काम करणं हाच यावरचा पर्याय आहे,’ असं ती सांगते. कामाबाबत फोकस असण्याबाबत बोलताना ती म्हणते, माझा आगामी डिअर जिंदगी हा सिनेमाही खूप वेगळा आणि महत्त्वाचा आहे. या सिनेमातून माझं कौतुक झालं तर छानच आहे. पण बऱ्याचदा टीका होण्याची शक्यता असते. पण त्याला आपण तयार असलं पहिजे.
किंग खान आणि केमिस्ट्री
‘माझा नवा सिनेमा खूपच सोपा आहे. त्यातल्या मुलीला अनेक प्रश्न पडत असतात. त्या सगळ्याची उत्तरं शाहरुख तिला देतो. ही फिल्म मला खूप जवळची आहे, कारण यात शाहरुख माझ्यासोबत आहे. त्यांची सिनेमे पाहात आम्ही लहानाचे मोठे झालो. त्याच्याच सिनेमांनी मला प्रेम, रोमान्स असं सगळं शिकवलंय, ’ असंही ती सांगते.
सिद्धार्थ-वरूण स्पेशल
वरुण धवनपासून शाहरुख खानपर्यंत सगळ्यांसोबत काम केलेल्या अलियाचे खरे दोस्त हे वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे आहेत. ‘या दोघांसोबत मी माझ्या करिअरची सुरुवात केली. माझी चिडचिड होत असेल, किंवा माझा मूड नसेल तर हे दोघेही माझा मूड लगेच ट्रॅकवर आणतात. या दोघांसोबत मी जास्त कम्फर्टेबल असते. आमच्यातही भांडणं होतात. वाद होतात. पण तेच माझे खऱ्या अर्थाने 'डिअर जिंदगी' आहेत.