म. टा. प्रतिनिधी, मुंबई
बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन गेल्या ५० वर्षांपासून मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. त्यांनी १९६९मध्ये 'सात हिंदुस्तानी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून सलग पाच दशके बॉलिवूड आणि टीव्ही विश्वात ते सक्रिय आहेत. मात्र आता वाढत्या वयोमानानुसार त्यांना त्रास होऊ लागला आहे. परिणामी, ते निवृत्त होण्याचा विचार करत आहेत. या गोष्टीचा उल्लेख त्यांनी स्वतःच त्यांच्या ब्लॉगमध्ये केला आहे.
सध्या अमिताभ बच्चन 'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या शूटिंगसाठी मनाली येथे आहेत. या चित्रीकरणादरम्यान त्यांनी त्यांच्या अनुभवाबद्दल लिहिले आहे. मनालीमधील शुटिंग लोकेशनवर पोहोचण्यासाठी त्यांना तब्बल बारा तासांचा प्रवास करावा लागला. या प्रवासासंदर्भातील माहिती त्यांनी आपल्या ब्लॉगद्वारे चाहत्यांसमोर मांडली. शिवाय, इथल्या निसर्गाचे आणि स्थानिकांचेही कौतुक केले आहे. पण, सोबतच 'आता मेंदू आणि हाताची बोटे परस्परविरोधी काम करत आहेत, हा एक संदेश आहे. त्यामुळे मला निवृत्त व्हायला हवे', अशा आशयाचे लेखन त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये केले आहे. नुकतेच 'कौन बनेगा करोडपती'चे शूटिंग संपवल्यानंतर अमिताभ बच्चन हे मनालीला शूटिंगसाठी रवाना झाले होते. ब्रह्मास्त्र सिनेमाशिवाय अमिताभ बच्चन 'झुंड', 'गुलाबो सिताबो', 'बटरफ्लाय' (कन्नड), 'एबी आणि सीडी' (मराठी), 'उयरनधा' आणि 'चेहरे' या चित्रपटांवर काम करत आहेत. बिग बींच्या निवृत्तीबाबतच्या लिखाणामुळे बॉलिवूड आणि त्यांचे चाहते या ब्लॉगकडे गांभीर्याने पाहत आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या प्रकृती स्वास्थासंदर्भातही चिंता व्यक्ती केली जात आहे.
बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन गेल्या ५० वर्षांपासून मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. त्यांनी १९६९मध्ये 'सात हिंदुस्तानी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून सलग पाच दशके बॉलिवूड आणि टीव्ही विश्वात ते सक्रिय आहेत. मात्र आता वाढत्या वयोमानानुसार त्यांना त्रास होऊ लागला आहे. परिणामी, ते निवृत्त होण्याचा विचार करत आहेत. या गोष्टीचा उल्लेख त्यांनी स्वतःच त्यांच्या ब्लॉगमध्ये केला आहे.
सध्या अमिताभ बच्चन 'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या शूटिंगसाठी मनाली येथे आहेत. या चित्रीकरणादरम्यान त्यांनी त्यांच्या अनुभवाबद्दल लिहिले आहे. मनालीमधील शुटिंग लोकेशनवर पोहोचण्यासाठी त्यांना तब्बल बारा तासांचा प्रवास करावा लागला. या प्रवासासंदर्भातील माहिती त्यांनी आपल्या ब्लॉगद्वारे चाहत्यांसमोर मांडली. शिवाय, इथल्या निसर्गाचे आणि स्थानिकांचेही कौतुक केले आहे. पण, सोबतच 'आता मेंदू आणि हाताची बोटे परस्परविरोधी काम करत आहेत, हा एक संदेश आहे. त्यामुळे मला निवृत्त व्हायला हवे', अशा आशयाचे लेखन त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये केले आहे. नुकतेच 'कौन बनेगा करोडपती'चे शूटिंग संपवल्यानंतर अमिताभ बच्चन हे मनालीला शूटिंगसाठी रवाना झाले होते. ब्रह्मास्त्र सिनेमाशिवाय अमिताभ बच्चन 'झुंड', 'गुलाबो सिताबो', 'बटरफ्लाय' (कन्नड), 'एबी आणि सीडी' (मराठी), 'उयरनधा' आणि 'चेहरे' या चित्रपटांवर काम करत आहेत. बिग बींच्या निवृत्तीबाबतच्या लिखाणामुळे बॉलिवूड आणि त्यांचे चाहते या ब्लॉगकडे गांभीर्याने पाहत आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या प्रकृती स्वास्थासंदर्भातही चिंता व्यक्ती केली जात आहे.