अ‍ॅपशहर

पेन बंद पडल्यामुळं बिग बी ‘नर्व्हस’

सुपरस्टार अमिताभ बच्चन अलीकडे जरा ‘नर्व्हस’ झालेत. का? तर त्यांच्या खास कलेक्शनमधली बहुतांश पेन्स आता चालत नाहीयेत. त्यांच्यावर बिग बींचा खूप जीव आहे. पेन जमवण्याच्या आपल्या छंदाबाबत त्यांनी ‘मुंटा’कडे आपलं मनोगत व्यक्त केलं.

Maharashtra Times 19 Apr 2016, 1:30 pm
Mrinmayi.Natu@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amitabhs pen collection
पेन बंद पडल्यामुळं बिग बी ‘नर्व्हस’


काही दिवसांपूर्वी अमिताभ यांनी एक फोटो ट्विटरवर अपलोड केला होता. काय होतं या फोटोमध्ये, तर चक्क पेनांचा ‌ढिग. ही पेन्स एका छानशा कपात जपून ठेवलेली आहेत. यापैकी बहुतांश पेन्स आता बंद पडली आहेत. पण त्यामुळे बिग बींच्या मनाचा एक कोपरा हळवा झाला आहे. ही पेन्स त्यांची खूप आवडती आहेत. पण आता बंद पडलेली असल्यानं ते थोडे ‘नर्व्हस’ झालेत.

‘मी सध्या ९/१० क्वार्टर लाइफ क्रायसिसमध्ये आहे’, असं अमिताभ यांनी अलीकडेच ट्विटरवर म्हटलं होतं. त्यामागचं एक कारण त्यांच्याकडे असलेली ही बंद पेन्स हेदेखील होतं. घरभर अशी पेन्स विखुरलेली आहेत असं ते म्हणतात. फार कमी लोकांना बच्चन यांच्या या पेनाच्या आवडीबद्दल माहित असेल. गेल्या अनेक वर्षांपासून बिग बींना विविध प्रकारच्या लेखण्या जमा करण्याचा छंद आहे.

'एक काळ असा होता जेव्हा पहिल्या पेनाला फार महत्त्व होतं. आता नव्या ट्रेंडनुसार त्याची जागा ईमेल आणि मोबाइल घेताना दिसतोय', असं बच्चन यांनी सोशल मीडियावर लिहिलं होतं. सोशल मीडियावर ते अॅक्टिव्ह असले तरी त्यांचा भर हा पेनाने लिहिण्यावरच अधिक असल्याचं ते सांगतात. आपल्याकडे नेमकी किती पेन्स आहेत हे ठाऊक नसलं तरी ते सतत नवीन पेनं विकत घेत असतात. 'मला हा छंद असल्याचं समजल्यापासून आता अनेक परिचितांनीही मला भेट म्हणून पेन द्यायला सुरुवात केली आहे. यात विशेषतः शाईच्या पेनांची संख्या जास्त आहे', असंही ते पुढे सांगतात.

हस्तलिखित पत्रांची उत्सुकता

वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना किंवा चांगलं काम केल्यास शाबासकी म्हणून बच्चन अनेकांना हस्तलिखित पत्रं पाठवतात. बॉलिवूडमधले सगळे कलाकार बिग बींचं पत्र यावं यासाठी उत्सुक असतात. शाईच्या पेनानं लिहिलेली ही पत्रं बॉलिवूडकर जपून ठेवत असल्याचं समजतं.

''मला पेन जमवण्याचा छंद आहे. माझ्याकडे निरनिराळ्या पेन्सचं कलेक्शन आहे. कम्प्युटर्समुळे आता हातानं लिहिण्याची सवय हळूहळू सुटत चालली आहे. वयोमानानुसार लिहिताना हात किंचित कापतात खरे. पण तरीही दिवसातला थोडा वेळ लिखाणासाठी खास बाजूला ठेवत असतो. प्रत्येकानं दिवसातून किमान पानभर तरी हातानं लिहायला हवं.'' - अमिताभ बच्चन

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज