अ‍ॅपशहर

Me Too: 'जे चाललंय ते मस्त चाललंय'

अभिनेता अनिल कपूर यानेही 'मी टू' बाबत आपली भूमिका व्यक्त केली आहे. 'आपल्यावरील अत्याचाराला महिला उघडपणे वाचा फोडत आहेत, ही खूपच चांगली बाब आहे. जगाने या विषयाकडे मोकळेपणी पाहिलं पाहिजे आणि स्त्रियांना काय सांगायचंय ते ऐकलं पाहिजे,' अशा शब्दांत अनिल कपूरने आपलं मत मांडलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Oct 2018, 3:48 pm
मुंबई :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम anil-kapoor


अभिनेता अनिल कपूर यानेही 'मी टू' बाबत आपली भूमिका व्यक्त केली आहे. 'आपल्यावरील अत्याचाराला महिला उघडपणे वाचा फोडत आहेत, ही खूपच चांगली बाब आहे. जगाने या विषयाकडे मोकळेपणी पाहिलं पाहिजे आणि स्त्रियांना काय सांगायचंय ते ऐकलं पाहिजे,' अशा शब्दांत अनिल कपूरने आपलं मत मांडलं.

'माझ्या घरात तीन महिला आहेत (पत्नी सुनिता आणि दोन मुली- सोनम, रेहा) आणि या तिघीही स्वतंत्र आहेत. मी त्यांचं ऐकतो आणि जगानेही महिलांचं म्हणणं ऐकायला हवं,' असं अनिल कपूर म्हणाला. महिलांचं समाजातलं स्थान समानतेचं नव्हे तर उच्च आहे असं त्याला वाटतं. तो म्हणाला, 'माझ्यासाठी महिला समान नाहीत तर प्रत्येक बाबतीत पुरुषापेक्षा सुपिरिअर आहेत. त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फुटत असेल तर ते चांगलंच आहे.'

मीटू या मोहीमेंतर्गत बॉलिवूडमध्ये सध्या खळबळ उडाली आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर आरोप केल्यानंतर अन्य महिलाही पुढे आल्या. आलोक नाथ, विकास बहल, रजत कपूर, सुभाष घई अशा दिग्गजांची नावे पुढे आली. या संदर्भात एका कार्यक्रमादरम्यान प्रश्न विचारल्यानंतर अनिल कपूरने वरील भूमिका व्यक्त केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज