मुंबई:
पुलवामा हल्ल्यानंतर माजी क्रिकेटपटू, काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलेलं वक्तव्य सोशल मीडियावर वादाचा विषय ठरलं. सिद्धू यांच्या वक्तव्यावर आता अभिनेते अनुपम खेर यांनी जोरदार टीका केली आहे.
अनुपम खेर यांनी ट्विटरच्या माध्यमातून सिद्धूंवर टीकास्त्र डागले. 'एखाद्या माणसाला गरजेपेक्षा जास्त बोलण्याची सवय असली मग तो त्यातून काहीही बरळतो' अशी कोपरखळी खेर यांनी मारली.
पुलवामा हल्ल्यानंतर सिद्धू यांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या प्रतिक्रियेमुळे त्यांच्यावर जोरदार टीका झाली. ते म्हणाले, ' पुलवामात झालेल्या हिंसेचा मी निषेध करतो. प्रत्येक देशात दहशतवादी असतात आणि दहशतवादाला धर्म नसतो. त्यामुळे हिंसा घडवणाऱ्या दहशतवाद्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे. परंतु, मूठभर दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या या हिंसेसाठी आपण संपूर्ण देशाला जबाबदार धरू शकत नाही.'
पुलवामा हल्ल्यानंतर माजी क्रिकेटपटू, काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलेलं वक्तव्य सोशल मीडियावर वादाचा विषय ठरलं. सिद्धू यांच्या वक्तव्यावर आता अभिनेते अनुपम खेर यांनी जोरदार टीका केली आहे.
अनुपम खेर यांनी ट्विटरच्या माध्यमातून सिद्धूंवर टीकास्त्र डागले. 'एखाद्या माणसाला गरजेपेक्षा जास्त बोलण्याची सवय असली मग तो त्यातून काहीही बरळतो' अशी कोपरखळी खेर यांनी मारली.