मुंबई: बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप नेहमी विविध राजकीय-सामाजिक विषयावर आपली मते मांडत असतो. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबाबतही त्यानं विरोधी पण संयमी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
कोणाचंही नाव न घेता त्याने या निर्णयासंदर्भातला त्याचा विरोध व्यक्त केला. तो लिहितो, 'एक माणूस विचार करतो की १२० कोटी लोकांच्या भल्यासाठी योग्य गोष्ट कोणती ते त्याला नेमकं माहित आहे आणि तो निर्णय घेण्या आणि अंमलात आणण्याइतकी सत्ताही त्याच्यापाशी आहे हे खूपच भीतीदायक आहे.' याला जोडूनच त्याने आणखीही एक ट्विट केलंय. तो लिहितो, 'मला कलम ३७० किंवा ३५अ बद्दल जास्त माहिती नाही. त्याचे परिणाम, इतिहास आणि वास्तव मला अजूनही कळलेले नाहीत. कधी वाटतं हे कलम हटायला हवं होतं. कधी वाटतं का हटायला हवं? ना मी काश्मिरी मुसलमान आहे, ना काश्मिरी पंडित. माझा काश्मिरी मित्र म्हणतो की काश्मीरची गोष्ट 'राशोमॉन' सिनेमासारखी आहे.' राशोमॉन हा जपानी सिनेमा एकाच घटनेच्या काढलेल्या वेगवेगळ्या अन्वयार्थांवर आधारित आहे.
अनुराग पुढे लिहितो, 'अनेक पैलू आहेत काश्मीरचे. सर्व बरोबर आहेत आणि सर्व चुकीचे आहेत. बस् एवढं माहित आहे की ज्या पद्धतीने हे सर्व घडलं ते योग्य नव्हतं.'
कोणाचंही नाव न घेता त्याने या निर्णयासंदर्भातला त्याचा विरोध व्यक्त केला. तो लिहितो, 'एक माणूस विचार करतो की १२० कोटी लोकांच्या भल्यासाठी योग्य गोष्ट कोणती ते त्याला नेमकं माहित आहे आणि तो निर्णय घेण्या आणि अंमलात आणण्याइतकी सत्ताही त्याच्यापाशी आहे हे खूपच भीतीदायक आहे.' याला जोडूनच त्याने आणखीही एक ट्विट केलंय. तो लिहितो, 'मला कलम ३७० किंवा ३५अ बद्दल जास्त माहिती नाही. त्याचे परिणाम, इतिहास आणि वास्तव मला अजूनही कळलेले नाहीत. कधी वाटतं हे कलम हटायला हवं होतं. कधी वाटतं का हटायला हवं? ना मी काश्मिरी मुसलमान आहे, ना काश्मिरी पंडित. माझा काश्मिरी मित्र म्हणतो की काश्मीरची गोष्ट 'राशोमॉन' सिनेमासारखी आहे.' राशोमॉन हा जपानी सिनेमा एकाच घटनेच्या काढलेल्या वेगवेगळ्या अन्वयार्थांवर आधारित आहे.
अनुराग पुढे लिहितो, 'अनेक पैलू आहेत काश्मीरचे. सर्व बरोबर आहेत आणि सर्व चुकीचे आहेत. बस् एवढं माहित आहे की ज्या पद्धतीने हे सर्व घडलं ते योग्य नव्हतं.'