अ‍ॅपशहर

शिकलेल्या महिलाही नवऱ्यासाठी उपास-तापास करतात तेव्हा...रत्ना पाठक यांचं वक्तव्य वादात

Ratna Pathak On Karwachauth बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक शाह सध्या चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टींवर मनमोकळेपणानं गप्पा मारल्या .

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jul 2022, 4:54 pm
मुंबई: उत्तम अभिनय आणि निर्भिडपणे आपलं मत मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते नसिरुद्दीन शहा नेहमीच सामाजिक आणि राजकीय विषयांवर उघडपणे बोलताना दिसतात. यासाठी त्यांना अनेकदा टीकेला सामोरं जावं लागतं. आता त्यांच्या पत्नी रत्ना पाठक यांनी केलेल्या वक्तव्यामुळं वाद निर्माण झाला आहे. रत्ना पाठक यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनेक गोष्टींवर गप्पा मारल्या. अंधश्रद्धा, रुढी-परंपरा यावर त्यांनी भाष्य केलंय. त्यामुळं देशातील महिलांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ratna pathak shah


रत्ना पाठक यांनी महिलांच्या उपास-तापास, व्रतवैकल्यांवर आक्षेप घेतला आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. रत्ना पाठक यांना प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. तर त्यांनी देशातील हिंदू महिलांची माफी मागावी, अशी मागणी होत आहे.


काय म्हणाल्या रत्ना पाठक?

एका मुलाखतीत रत्ना पाठक यांना पतीच्या दीर्घ आयुष्यासाठीतुम्ही (करवा चौथ) उपवास करता का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्यांनी 'मी काय वेडी आहे का, असे उपवास करायला? असं उत्तर दिलं. त्या इथेच थांबल्या नाहीत. यावर बोलताना त्या पुढं म्हणाल्या की, आश्चर्य वाटतं की, आज शिकलेल्या महिलाही पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपास-तापास करतात. आपल्या देशात विधवा महिलांच्या वाट्याला भयाण आयुष्य येतं. त्यामुळं या भीतीपोटी महिला असे उपवास करतात. २१ व्या शतकातही आपण याबद्दल चर्चा करतो यापेक्षा मोठं दूर्दैव नाही, असं रत्ना पाठक म्हणाल्या.


रत्ना यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, रणवीर सिंगच्या 'जयेशभाई जोरदार' चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकराली होती. या चित्रपटात त्यांनी रणवीरच्या आईची भूमिकेत दिसल्या होत्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज