अ‍ॅपशहर

Dhanush Aishwarya Divorce: विभक्त झाल्यावरही एकाच हॉटेलमध्ये राहात आहेत धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत?

Dhanush Aishwarya Divorce Announcement: साउथ स्टार धनुष याने लग्नाच्या १८ वर्षांनी त्याच्या पत्नीपासुन विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्याने ही माहिती ट्विट शेअर करत चाहत्यांना दिली. त्याच्या या ट्विटमुळे त्याच्या फॅन्सना खुप मोठा धक्का बसला आहे. आता विभक्त झाल्यावर या कारणासाठी एकाच होटेलमध्ये राहात आहेत धनुष आणि ऐक्ष्वर्या, जाणुन घ्या कारण.

guest Arpita-Deo | Lipi 25 Jan 2022, 8:20 am
मुंबई- धनुष आणि रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याने लग्नाच्या १८ वर्षांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी याची माहिती सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली होती. असं काय झालं की या दोघांनी लग्नाच्या १८ वर्षांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. पण या सगळ्यात धनुष आणि ऐश्वर्या वेगळे झाल्यानंतरही सध्या एकाच हॉटेलमध्ये राहत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम after divorce announcement dhanush and ex wife aishwarya are living in same hotel
Dhanush Aishwarya Divorce: विभक्त झाल्यावरही एकाच हॉटेलमध्ये राहात आहेत धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत?


सलमानच्या शेजारच्यांचा दावा- पनवेलचं फार्महाऊस दफन भूमी

आता याला योगायोग म्हणावा की काय ते माहीत नाही पण हे खरं आहे. ई-टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या आणि धनुष रामोजी राव स्टुडियोमधील सितारा हॉटेलमध्ये राहात आहे. हे तेच हॉटेल आहे जिथे रामोजी राव स्टुडिओमध्ये शूटिंग केल्यानंतर बहुतेक कलाकार राहतात. हाती आलेल्या माहितीनुसार धनुष तेथे त्याच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग करत आहे, तर ऐश्वर्या एका गाण्याच्या दिग्दर्शनासाठी तिथे आहे. या गाण्याचं शूटिंग २३ जानेवारीपासून सुरू झालं असून, गाणं १४ फेब्रुवारी २०२२ रोजी व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं जातं आहे.

View this post on Instagram A post shared by Aishwaryaa R Dhanush (@aishwaryaa_r_dhanush)

धनुषने १८ वर्षांनंतर ऐश्वर्यापासून विभक्त झाल्याची माहिती देणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. त्याने लिहिलं होतं की, '१८ वर्ष आम्ही मित्र, पालक, एकमेकांचे शुभचिंतक म्हणून एकत्र होतो. हा प्रवास पुढे जाण्याचा, समजून घेण्याचा आणि एकत्रपणे स्वीकारण्याचा होता. परंतु आज आम्ही अशा वळणावर उभे आहोत जिथे आमचे मार्ग वेगळे झाले आहेत. ऐश्वर्या आणि मी पती- पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आता आम्ही स्वतःला वैयक्तिकरित्या ओळखण्यासाठी वेळ देत आहोत. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आम्हाला ते हाताळण्यासाठी वेळ द्या.'

ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना मलायका अरोराचं सडेतोड उत्तर

View this post on Instagram A post shared by Aishwaryaa R Dhanush (@aishwaryaa_r_dhanush)

धनुष आणि रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याने २००४ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना यात्रा आणि लिंगा अशी दोन मुलं आहेत. ऐश्वर्या आणि धनुषचा घटस्फोट का झाला असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला असून याचं कारण धनुषच्या वडिलांनी एका मुलाखतीत सांगितलं. 'हा घटस्फोट नसून ते फक्त वेगळे झाले आहेत. अनेकदा कुटुंब आणि जोडप्यांमध्ये मतभेद आणि कौटुंबिक भांडणं होतात. यामुळे हे दोघंही वेगळे झाले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज