मुंबई: महानायक अमिताभ बच्चन लवकरच छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा लोकप्रिय 'कौन बनेगा करोडपती'चा खेळ रंगवताना दिसणार आहे. केबीसीच्या नव्या सीझनच काही फोटो बच्चन यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करायला सुरुवात केली आहे. केबीसीच्या नव्या पर्व सुरू होत असतानात जुन्या पर्वाच्या विजेत्यांच्या चर्चाही होऊ लागल्या आहे.
सामन्य व्यक्ती जेव्हाकोट्यधीशहोतो तेव्हा त्याची चर्चा तर होणारचं. त्याचं आयुष्यही बदलून जातं. २०११मध्ये ५ कोटींचं बक्षिस जिंकलेल्या सुशील कुमार याचंही आयुष्यचं बदललं. पण त्यानं सांगितेला त्याचा अनुभव डोळ्यात पाणी आणणारा असाच आहे. पैसा आज आहे तर उद्या नाही, हे त्याच्या बाबतीत अत्यंत खरं ठरलं. ५ कोटी जिंकल्यानंतर संसाराला, आयुष्यालाच उतरती कळा लागल्याचं तो म्हणतोय.
राज ठाकरेच माझा आवडता ब्रॅण्ड; 'या' दिग्दर्शकानं शेअर केला फोटो
केबीसी जिंकल्यानंतर सुशीलला सिगारेट आणि दारुचं व्यसन लागलं. केबीसी जिंकल्यानंतर स्थानिक पातळीवर तो सेलिब्रिटी झाला होता. महिन्यातीस दहा पंधरा दिवस बिहारमध्ये इकड्या तिकडच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी त्याला खास आमंत्रणं दिली जात होती. अभ्यासातून लक्ष विचलीत झालं होतं. मीडिया प्रसिद्धीचा एकप्रकारे त्याला चस्काच लागला होता. लोकांना सांगण्यासाठी त्यांनी नवीन नवीन उद्योग,व्यवसाय करायला सुरुवात केली. पंरतु यात मोठं नुकसान झालं. यात खूप पैसा खर्च झाला.
मालिकेनं निरोप घेतल्यानंतर 'मिसेस मुख्यमंत्री' भावुक; शेअर केली खास पोस्ट
सुशील सांगतो की, याच दरम्यान गुप्तदान करण्याचं मला वेड लागलं होतं. महिन्याला हजारो रुपये तो दान करायचा. अनेकांनी त्याला फसवण्याचा प्रयत्न केला. पण पत्नीनं सुशीलला या लोकांबद्दल आणि त्यांच्या हेतूबद्दल वारंवार सांगूनही त्यानं तिचं ऐकलं नाही. त्यामुळं सुशील आणि त्याच्या पत्नीमध्येही वाद होऊ लागले.
याच सोबत काही चांगल्या गोष्टी झाल्यातंही सुशील सागंतो. त्यानं दिल्लीत काही गाड्या खरेदी केल्या होत्या. एका मित्राच्या साहाय्यानं तो गाड्या चालवण्यासाठी देत होता. त्यासाठी दिल्लीच्या फेऱ्याही वाढल्या होत्या. याच दरम्यान सुशीलची मैत्री जामिया मिलियात मीडियाचा अभ्यास करणाऱ्या काही मुलांसोबत झाली. तसंच जेएनयूमधील काही विद्यार्थी त्याचे मित्र झाले. रंगभूमीवर काम करणाऱ्या काही विद्यार्थ्यांशीही त्यानं ओळख वाढवली. जेव्हा हे विद्यार्थी गप्पा मारायचे तेव्हा आपण या तलावातलं बेडूक असल्याचं सुशीलला वाटायचं.अनेक गोष्टींचं त्याला ज्ञान नव्हतं. याच दरम्यानं दारु आणि सिगारेटचं व्यसन लागल्याचं सुशील सांगतो.
'एकदा रागाच्या भरात घरातून बाहेर पडलो तेव्हा एका पत्रकाराचा फोन आला. काही वेळ मी त्याच्यासोबत व्यवस्थित बोललो. परंतु त्याच्या एका प्रश्नावर मी चिडलो आणि माझ्याकडचे सर्व पैसे संपले असून दोन गायी खरेदी केल्या होत्या.त्यांचं दूध विकून उदनिर्वाह करत असल्याचं त्याला सांगितलं. त्या दिवसापासू चित्र पालटलं. जे लोक आजुबाजुला असायचे ते दूर झाले. लोकांनी कार्यक्रमाला बोलवणं बंद केलं', असं सुशील सांगतो.
त्यानंतर चित्रपट दिग्दर्शक होण्याचं स्वप्न घेऊन मी मुंबईला आलो. एका मोठ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काही काळ काम केलं. पण तितंथही मन रमलं नाही. त्यानंतर एका गीतकार मित्रासोबत त्याच्या घरी राहू लागलो. दिवसभर एकटा असायचो. याच काळात स्वत:ला ओळखण्यासाठी वेळ मिळाला, स्वत:ला जाणून घेता आलं. खरा आनंद हा आवडीचं काम करण्यातचं असल्याचं मला उमगलं. त्यानंतर मी पुन्हा घरी परतलो. शिक्षक होण्यासाठी परिक्षा दिल्या. पास झालो. आता खूप बरं वाटतं. कोणतही काम उत्साहानं करतो. पर्यावरणासंबंधीत अनेक कामांमध्ये सहभाग घेतो, असं सुशील सांगतो.
शेवटी सुशील म्हणतो की, 'आयुष्यात गरजा जितक्या कमी असतील तितकं चांगलं. तेवढंच कमायचं जेवढ्या आपल्या गरजा असतील'.
सामन्य व्यक्ती जेव्हाकोट्यधीशहोतो तेव्हा त्याची चर्चा तर होणारचं. त्याचं आयुष्यही बदलून जातं. २०११मध्ये ५ कोटींचं बक्षिस जिंकलेल्या सुशील कुमार याचंही आयुष्यचं बदललं. पण त्यानं सांगितेला त्याचा अनुभव डोळ्यात पाणी आणणारा असाच आहे. पैसा आज आहे तर उद्या नाही, हे त्याच्या बाबतीत अत्यंत खरं ठरलं. ५ कोटी जिंकल्यानंतर संसाराला, आयुष्यालाच उतरती कळा लागल्याचं तो म्हणतोय.
राज ठाकरेच माझा आवडता ब्रॅण्ड; 'या' दिग्दर्शकानं शेअर केला फोटो
केबीसी जिंकल्यानंतर सुशीलला सिगारेट आणि दारुचं व्यसन लागलं. केबीसी जिंकल्यानंतर स्थानिक पातळीवर तो सेलिब्रिटी झाला होता. महिन्यातीस दहा पंधरा दिवस बिहारमध्ये इकड्या तिकडच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी त्याला खास आमंत्रणं दिली जात होती. अभ्यासातून लक्ष विचलीत झालं होतं. मीडिया प्रसिद्धीचा एकप्रकारे त्याला चस्काच लागला होता. लोकांना सांगण्यासाठी त्यांनी नवीन नवीन उद्योग,व्यवसाय करायला सुरुवात केली. पंरतु यात मोठं नुकसान झालं. यात खूप पैसा खर्च झाला.
मालिकेनं निरोप घेतल्यानंतर 'मिसेस मुख्यमंत्री' भावुक; शेअर केली खास पोस्ट
सुशील सांगतो की, याच दरम्यान गुप्तदान करण्याचं मला वेड लागलं होतं. महिन्याला हजारो रुपये तो दान करायचा. अनेकांनी त्याला फसवण्याचा प्रयत्न केला. पण पत्नीनं सुशीलला या लोकांबद्दल आणि त्यांच्या हेतूबद्दल वारंवार सांगूनही त्यानं तिचं ऐकलं नाही. त्यामुळं सुशील आणि त्याच्या पत्नीमध्येही वाद होऊ लागले.
याच सोबत काही चांगल्या गोष्टी झाल्यातंही सुशील सागंतो. त्यानं दिल्लीत काही गाड्या खरेदी केल्या होत्या. एका मित्राच्या साहाय्यानं तो गाड्या चालवण्यासाठी देत होता. त्यासाठी दिल्लीच्या फेऱ्याही वाढल्या होत्या. याच दरम्यान सुशीलची मैत्री जामिया मिलियात मीडियाचा अभ्यास करणाऱ्या काही मुलांसोबत झाली. तसंच जेएनयूमधील काही विद्यार्थी त्याचे मित्र झाले. रंगभूमीवर काम करणाऱ्या काही विद्यार्थ्यांशीही त्यानं ओळख वाढवली. जेव्हा हे विद्यार्थी गप्पा मारायचे तेव्हा आपण या तलावातलं बेडूक असल्याचं सुशीलला वाटायचं.अनेक गोष्टींचं त्याला ज्ञान नव्हतं. याच दरम्यानं दारु आणि सिगारेटचं व्यसन लागल्याचं सुशील सांगतो.
'एकदा रागाच्या भरात घरातून बाहेर पडलो तेव्हा एका पत्रकाराचा फोन आला. काही वेळ मी त्याच्यासोबत व्यवस्थित बोललो. परंतु त्याच्या एका प्रश्नावर मी चिडलो आणि माझ्याकडचे सर्व पैसे संपले असून दोन गायी खरेदी केल्या होत्या.त्यांचं दूध विकून उदनिर्वाह करत असल्याचं त्याला सांगितलं. त्या दिवसापासू चित्र पालटलं. जे लोक आजुबाजुला असायचे ते दूर झाले. लोकांनी कार्यक्रमाला बोलवणं बंद केलं', असं सुशील सांगतो.
त्यानंतर चित्रपट दिग्दर्शक होण्याचं स्वप्न घेऊन मी मुंबईला आलो. एका मोठ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काही काळ काम केलं. पण तितंथही मन रमलं नाही. त्यानंतर एका गीतकार मित्रासोबत त्याच्या घरी राहू लागलो. दिवसभर एकटा असायचो. याच काळात स्वत:ला ओळखण्यासाठी वेळ मिळाला, स्वत:ला जाणून घेता आलं. खरा आनंद हा आवडीचं काम करण्यातचं असल्याचं मला उमगलं. त्यानंतर मी पुन्हा घरी परतलो. शिक्षक होण्यासाठी परिक्षा दिल्या. पास झालो. आता खूप बरं वाटतं. कोणतही काम उत्साहानं करतो. पर्यावरणासंबंधीत अनेक कामांमध्ये सहभाग घेतो, असं सुशील सांगतो.
शेवटी सुशील म्हणतो की, 'आयुष्यात गरजा जितक्या कमी असतील तितकं चांगलं. तेवढंच कमायचं जेवढ्या आपल्या गरजा असतील'.