मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या मानाच्या फिल्मफेअर सोहळ्यात मराठमोळ्या अभिनेत्रीला तिच्या दमदार अभिनयासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. ही अभिनेत्री अर्थातच अमृता सुभाष. झोया अख्तर दिग्दर्शित रणवीर सिंग आणि आलिया भट यांचा ‘गली बॉय’ चांगला लोकप्रिय झाला होता. अमृता सुभाष यामध्ये रणवीर सिंगच्या आईच्या भूमिकेत दिसली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तिच्या कामाचं कौतुकही झालं. फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्यानंतर सर्वच स्तरातून आणखी तिचं कौतुक होत आहे.
अभिनेत्री पर्ण पेठे, विभावरी देशपांडे, नेहा भट्ट, नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर अशा अनेक कलाकार मंडळींनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. आम्हाला तुझा अभिमान आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. यावरून मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर दखल बॉलिवूडलाही घ्यायला लावली आहे असंच म्हणावं लागेल.
संहितेला महत्त्व दिलं
'गली बॉय'ची निवड करताना मी चित्रपटाच्या संहितेला महत्त्व दिलं. कारण मुळात आडातच नसेल, तर पोहऱ्यात कुठून येणार? फक्त हेच सिनेमे नव्हे, तर अशा आणखीही अनेक संहिता आहेत ज्या इतरांनी नाकारल्या होत्या, पण मी त्या स्वीकारल्या. पुढं त्या सिनेमांनी राष्ट्रीय पुरस्कारांपर्यंत मजल मारली. एकदा चित्रपटाची संहिता आवडली की बाकी काहीही मी पाहत नाही. संहितेतलं चांगलं-वाईट कळणं हे आमच्या घरातून आलं आहे. कारण, लहानपणापासून घरातूनच वाचनाचे संस्कार माझ्यावर झाले. त्यामुळं चांगली संहिता कोणती हे लक्षात येतं. अर्थात, चांगल्या संहिता तुमच्यापर्यंत येणंही महत्त्वाचं असतं.
'गली बॉय'चा बोलबाला
फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सर्वांधिक पुरस्कार 'गली बॉय' चित्रपटानं पटकावले. रणवीर सिंहला उत्कृष्ट अभिनेत्याचा तर आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक झोया अख्तर, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी अमृता सुभाषला पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार सिद्धांत चतुर्वेदीनं पटकावला. सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी रीमा कागती, जोया अख्तर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट संवादासाठीचा पुरस्करा विजय मौर्या यांनी आपल्या नावे केला. सर्वोत्कृष्ट गीतासाठी डिव्हाइन अँड अंकुर तिवारी यांनी 'अपना टाइम आ गया' असं म्हणत पुरस्कार स्विकारला.
अमृता म्हणते आता रणवीरची आई होणार नाही
'गली बॉय'साठी अलिया, रणवीरला उत्कृष्ट अभिनेत्री, अभिनेत्याचा पुरस्कार
अभिनेत्री पर्ण पेठे, विभावरी देशपांडे, नेहा भट्ट, नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर अशा अनेक कलाकार मंडळींनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. आम्हाला तुझा अभिमान आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. यावरून मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर दखल बॉलिवूडलाही घ्यायला लावली आहे असंच म्हणावं लागेल.
संहितेला महत्त्व दिलं
'गली बॉय'ची निवड करताना मी चित्रपटाच्या संहितेला महत्त्व दिलं. कारण मुळात आडातच नसेल, तर पोहऱ्यात कुठून येणार? फक्त हेच सिनेमे नव्हे, तर अशा आणखीही अनेक संहिता आहेत ज्या इतरांनी नाकारल्या होत्या, पण मी त्या स्वीकारल्या. पुढं त्या सिनेमांनी राष्ट्रीय पुरस्कारांपर्यंत मजल मारली. एकदा चित्रपटाची संहिता आवडली की बाकी काहीही मी पाहत नाही. संहितेतलं चांगलं-वाईट कळणं हे आमच्या घरातून आलं आहे. कारण, लहानपणापासून घरातूनच वाचनाचे संस्कार माझ्यावर झाले. त्यामुळं चांगली संहिता कोणती हे लक्षात येतं. अर्थात, चांगल्या संहिता तुमच्यापर्यंत येणंही महत्त्वाचं असतं.
'गली बॉय'चा बोलबाला
फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सर्वांधिक पुरस्कार 'गली बॉय' चित्रपटानं पटकावले. रणवीर सिंहला उत्कृष्ट अभिनेत्याचा तर आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक झोया अख्तर, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी अमृता सुभाषला पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार सिद्धांत चतुर्वेदीनं पटकावला. सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी रीमा कागती, जोया अख्तर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट संवादासाठीचा पुरस्करा विजय मौर्या यांनी आपल्या नावे केला. सर्वोत्कृष्ट गीतासाठी डिव्हाइन अँड अंकुर तिवारी यांनी 'अपना टाइम आ गया' असं म्हणत पुरस्कार स्विकारला.
अमृता म्हणते आता रणवीरची आई होणार नाही
'गली बॉय'साठी अलिया, रणवीरला उत्कृष्ट अभिनेत्री, अभिनेत्याचा पुरस्कार