मुंबई- आपली कला सादर करताना मरण येणं हे एखाद्या कलाकारासाठी पुण्याचं मानलं जातं. मराठी चित्रपटसृष्टीमधील अशी एक लोकप्रिय अभिनेत्री जिला मंचावर आपली कला सादर करतानाच मृत्यू आला. मात्र तिच्या जाण्याने चित्रपटसृष्टीचं कधीही भरून न निघणारं नुकसान झालं. त्यांचं मरण असं होतं की समोरून पाहणाऱ्या प्रेक्षकांना त्या अभिनय करत आहेत असंच वाटत राहिलं. त्या अभिनेत्री होत्या आपल्या नृत्याने सगळ्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि छोट्या पडद्यासह मोठा पडदा गाजवणाऱ्या अश्विनी एकबोटे. त्यांच्या अशा अचानक निघून जाण्याने सगळेच हळहळले होते. त्यांच्या एक्झिटने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. त्यांनी २२ ऑक्टोबर २०१६ रोजी या जगाचा निरोप घेतला.
लोकप्रिय नृत्यांगना आणि अभिनेत्री अशी त्यांची ओळख होती. शिक्षणानंतर त्या अभिनय क्षेत्राकडे वळल्या. ‘देबू’, ‘महागुरू’, ‘बावरे प्रेम हे’, ‘तप्तपदी’, ‘डंक्यावर डंका’, ‘आरंभ’, ‘क्षण हा मोहाचा’, ‘कॉफी आणि बरंच काही’ या मराठी चित्रपटांमध्ये त्या दिसल्या. त्या पुण्यातील भरत नाट्यमंदिरात प्रयोग करत असताना त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. तेव्हा त्या 'नाट्यत्रिविधा' या नाटकाचा प्रयोग करत होत्या. त्यावेळी शेवटच्या प्रसंगाला नृत्य करत असताना, अश्विनी यांनी गिरकी घेतली आणि त्याचवेळी त्या रंगमंचावर कोसळल्या. मात्र हा नाटकातीलच भाग आहे, असंच उपस्थितांना वाटलं. त्यादरम्यानच पडदाही पडला, मात्र अश्विनी जमिनीवर कोसळल्या आणि परत उठल्याच नाहीत. अश्विनी एकबोटे त्यावेळी फक्त ४४ वर्षांच्या होत्या.
तेव्हा त्या 'गणपती बाप्पा मोरया' या मालिकेत कैकसीची भूमिका करत होत्या. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर निर्मात्यांनी ते पात्रच मालिकेतून काढून टाकलं. कारण त्यांच्या अभिनयाप्रमाणे इतर कोणतीही अभिनेत्री त्या पात्राला न्याय देऊ शकली नसती. ‘त्या तिघांची गोष्ट’, ‘एका क्षणात’, ‘नांदी’ ही नाटके, ‘दुहेरी’, ‘दुर्वा’, ‘राधा ही बावरी’, ‘तू भेटशी नव्याने’, ‘अहिल्याबाई होळकर’, ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘अरुंधती’, ‘उंच माझा झोका’, ‘असंभव’ या मालिका त्यांनी गाजवल्या होत्या.
'आई कुठे काय करते'मध्ये परतली अरुंधती; आशुतोषने आनंदात सगळ्यांसमोरच मारली मिठी
लोकप्रिय नृत्यांगना आणि अभिनेत्री अशी त्यांची ओळख होती. शिक्षणानंतर त्या अभिनय क्षेत्राकडे वळल्या. ‘देबू’, ‘महागुरू’, ‘बावरे प्रेम हे’, ‘तप्तपदी’, ‘डंक्यावर डंका’, ‘आरंभ’, ‘क्षण हा मोहाचा’, ‘कॉफी आणि बरंच काही’ या मराठी चित्रपटांमध्ये त्या दिसल्या. त्या पुण्यातील भरत नाट्यमंदिरात प्रयोग करत असताना त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. तेव्हा त्या 'नाट्यत्रिविधा' या नाटकाचा प्रयोग करत होत्या. त्यावेळी शेवटच्या प्रसंगाला नृत्य करत असताना, अश्विनी यांनी गिरकी घेतली आणि त्याचवेळी त्या रंगमंचावर कोसळल्या. मात्र हा नाटकातीलच भाग आहे, असंच उपस्थितांना वाटलं. त्यादरम्यानच पडदाही पडला, मात्र अश्विनी जमिनीवर कोसळल्या आणि परत उठल्याच नाहीत. अश्विनी एकबोटे त्यावेळी फक्त ४४ वर्षांच्या होत्या.
तेव्हा त्या 'गणपती बाप्पा मोरया' या मालिकेत कैकसीची भूमिका करत होत्या. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर निर्मात्यांनी ते पात्रच मालिकेतून काढून टाकलं. कारण त्यांच्या अभिनयाप्रमाणे इतर कोणतीही अभिनेत्री त्या पात्राला न्याय देऊ शकली नसती. ‘त्या तिघांची गोष्ट’, ‘एका क्षणात’, ‘नांदी’ ही नाटके, ‘दुहेरी’, ‘दुर्वा’, ‘राधा ही बावरी’, ‘तू भेटशी नव्याने’, ‘अहिल्याबाई होळकर’, ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘अरुंधती’, ‘उंच माझा झोका’, ‘असंभव’ या मालिका त्यांनी गाजवल्या होत्या.
'आई कुठे काय करते'मध्ये परतली अरुंधती; आशुतोषने आनंदात सगळ्यांसमोरच मारली मिठी