अ‍ॅपशहर

दहशतवादी हल्ल्याची १३ वर्ष! कलाकारांनी वाहिली शहिदांना श्रद्धांजली

मुंबईवर झालेल्या २६-११ या दहशतवादी हल्ल्याला आज १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या मुंबईतील शहीद पोलिसांना बॉलिूवड कलाकारांनी यांनी श्रध्दांजली वाहिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Nov 2021, 8:44 pm
मुंबई: २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटू आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. थरकाप उडवून देणाऱ्या या घटनेला आज १३ वर्ष पूर्ण झाली. दहशतवाद्यांनी ताज हॉटेल आणि ट्रायडेंट हॉटेलबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर हल्ला केला होता. या हल्ल्यात १६६ नागरिकांना जीव गमवावा लागला होता. तर, मुंबई पोलिस दलातील काही अधिकाऱ्यांना वीरमरण आलं.बॉलिवूड सेलिब्रिटींकडून हल्ल्यातील शहिदांना अभिवादन करण्यात आलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम दहशतवादी हल्ला


अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या हल्ल्यातील शहिदांना सोशल मीडियाद्वारे आदरांजली वाहिली. अक्षय कुमार,अनुपम खेर,रवीना टंडन,अमिताभ बच्चन, विवेक ओबेरॉय,अभिषेक बच्चन,अनिल कपूर, रणवीर शौरी यांच्यासह अनेक बी-टाउन सेलिब्रिटींनी १३ वर्षांपूर्वीच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे.
https://twitter.com/TandonRaveena
कसा केला गेला हल्ला?
अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी सन २००८ मध्ये मुंबईवर आत्मघाती हल्ला केला. या हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला. कसाब आणि त्याच्या साथीदारांनी पाकिस्तानातून भारतात समुद्रमार्गे प्रवेश केला. कफ परेड येथील बधवार पार्क येथून हे दहशतवादी मुंबईत घुसले. या हल्ल्यानंतर दुर्लक्षित असलेल्या सागरी सुरक्षेवर सर्वांचे लक्ष गेले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज