अ‍ॅपशहर

१८ वर्षांच्या संसारानंतर धनुष- ऐश्वर्या झाले वेगळे, चाहते काय म्हणाले...

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आणखी एक लोकप्रिय जोडी तुटली. सामंथा रूथ प्रभू आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाच्या धक्क्यातून चाहते बाहेर येत होते तेवढयात धनुषने आणि रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या यांनी वेगळे होत असल्याची घोषणा केली.

guest Arpita-Deo | Lipi 18 Jan 2022, 3:11 pm
मुंबई- दाक्षिणात्य स्टार अभिनेता, दिग्दर्शक धनुष आणि पत्नी ऐश्वर्या यांचा घटस्फोट झाला आहे. धनुष आणि ऐश्वर्याने १८ वर्षांच्या संसारानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विभक्त होण्याची बातमी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली. ही बातमी कळताच चाहत्यांना मोठा धक्का बसला. चाहते सोशल मीडियावर वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dhanush and aishwarya rajnikanth divorce after 18 years of marriage fans reaction
१८ वर्षांच्या संसारानंतर धनुष- ऐश्वर्या झाले वेगळे, चाहते काय म्हणाले...



धनुष- ऐश्वर्याच्या विभक्त होण्याच्या बातमीनंतर धनुष सोशल मीडियावर ट्रेंड करु लागला. धनुषच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देत एका यूजरने लिहिलं, 'रजनीकांत होणे सोपे नाही.' तर दूसऱ्या युझरने लिहिले की, 'हे अपेक्षित नव्हतं. हे धक्कादायक आहे. ब्रेकअपचं कारण काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं नाही. प्रसारमाध्यमं आणि चाहत्यांनी त्यांना थोडा वेळ देण्याची गरज आहे. धनुष आणि ऐश्वर्याला चांगल्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो. थलाइवा स्ट्रॉंग रहा.'

धनुष- ऐश्वर्याच्या पहिल्या भेटीपासून ते घाईत केलेल्या लग्नापर्यंत, जाणून घ्या सर्वकाही



आणखी एका चाहत्याने रजनीकांत आणि धनुषचा फोटो शेअर करत म्हटले की, 'आता या फोटोला काही अर्थ नाही. धनुष का केलं असं? लव्ह यू थलैयवा रजनीकांत.' धनुष आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या बातमीने चाहत्यांना खूप दुख: झाले आहे. लग्नाच्या १८ वर्षांनी विभक्त होण्यामागचं कारण काय असा प्रश्न चाहते दोघांनाही विचारत आहेत.

Dhanush Net Worth: एकत्र कोट्यवधी रुपये कमवायचे धनुष- ऐश्वर्या

ट्वीटरद्वारे दिली विभक्त झाल्याची बातमी

धनुष आणि ऐश्वर्या २००४ मध्ये लग्न बंधनात अडकले. ऐश्वर्या ही सुपरस्टार रजनीकांत यांची थोरली मुलगी आहे. त्यांना यात्रा आणि लिंगा ही दोन मुलं आहेत. मधल्या काळात त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या अनेकदा येत राहिल्या पण त्यावर ते कधीच काही बोलले नाहीत. मात्र १७ जानेवारी रोजी स्वतः धनुषने घटस्फोट घेतल्याची माहिती चाहत्यांना दिली. त्याच्या ब्रेकअपची बातमी कळताच धनुष ट्विटरवर ट्रेंड करू लागला.



धनुषचं ट्वीट

धनुषने ट्वीटमध्ये लिहिले की, '१८ वर्ष आम्ही मित्र म्हणून, पालक म्हणून, एकमेकांचे शुभचिंतक म्हणून एकत्र होतो. हा प्रवास पुढे जाण्याचा, समजून घेण्याचा, जुळवून घेण्याचा आणि एकत्रपणे स्वीकारण्याचा होता. परंतु आज आम्ही अशा ठिकाणी उभे आहोत जिथे आमचे मार्ग वेगळे झाले आहेत. ऐश्वर्या आणि मी पती पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आता आम्ही स्वतःला वैयक्तिकरित्या ओळखण्यासाठी वेळ देत आहोत. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आम्हाला ते हाताळण्यासाठी वेळ द्या. ओम नम:शिवाय.'


ऐश्वर्याची इन्स्टाग्राम पोस्ट

रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याने तिच पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आणि लिहिले, 'कोणत्याही कॅप्शनची गरज नाही... फक्त तुमचे प्रेम आमच्या सोबत राहू दे तसेच तुम्ही समजून घ्याल ही अपेक्षा.' असे कॅप्शन दिले.

View this post on Instagram A post shared by Aishwaryaa R Dhanush (@aishwaryaa_r_dhanush)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज