अ‍ॅपशहर

'धर्मवीर'ची निर्मिती एकनाथ शिंदेंच्या सल्ल्यानं नव्हे, तर शिवसेनेच्या या नेत्याची होती इच्छा

Dharmaveer movie facts 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांचा प्रवास पडद्यावर उभा केला आहे. या चित्रपटाची निर्मिती मंगेश देसाईंनी केली आहे.

Authored byभाग्यश्री रसाळ | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Aug 2022, 1:38 pm
मुंबई: जनसामान्यांचा आधार अशी ख्याती असलेले आणि आपलं संपूर्ण आयुष्य सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची घालणारे नेते म्हणजे आनंद दिघे. आनंद दिघे या लोकनेत्याचा जीवनप्रवास चित्रपटाच्या रूपानं प्रेक्षकांच्या आला. चित्रपटाला राजकीय पार्श्वभूमी असल्यानं नेतेमंडळींनीही या चित्रपटाला पसंती दर्शवली. 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटाची निर्मिती मंगशे देसाई यांनी केली आहे. या चित्रपटात आनंद दिघेंचा प्रवास दाखवण्यात आला असला तरी त्यांचे शिष्य एकनाथ शिंदे यांच्या आयुष्यातील काही प्रसांगाचीही चर्चा झाली. मंगेश देसाई आणि एकनाथ शिंदे अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात . पण धर्मवीर मुक्कामपोस्ट ठाणे या चित्रपटामुळं त्यांच्यातील मैत्री वाढत गेली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Dharmaveer movie

ओळखलं का या चिमुरडीला? आज आहे मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची आणि बिन्धास्त अभिनेत्री

धर्मवीर मुक्कामपोस्ट ठाणे या चित्रपटाच्या निर्मितीसाठी एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं,मदत केली असल्याचं मंगेश देसाईंनी सांगितलं. या चित्रपटाची निर्मिती एकनाथ शिंदे यांच्या सल्ल्यानं केली असल्याचंही म्हटलं गेलं होतं. पण आता यासंदर्भात मंगेश देसाईंनी मोठा खुलासा केलाय. शिवसेने नेते
संजय राऊत यांची इच्छा होती की आनंद दिघेंवर चित्रपट व्हावा, असा खुलासा देसाईंनी केलाय.

View this post on Instagram A post shared by Mangesh Desai (@mangeshdesaiofficial)

अभिनेत्याचा अजब दावा- हृतिक रोशनने घरी बोलवून लॅपटॉपवर दाखवलेले कंगनाचे फोटो
बऱ्याच वर्षांपासून आनंद दिघेंच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्यासाठी मी प्रयत्न करत होतो. पण ते शक्य होत नव्हतं,असं देसाई म्हणाले. २०१३ मध्ये मंगेश देसाईंचा ‘खेळ मांडला’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या प्रीमियरला संजय राऊतही आले होते. त्या प्रिमियर सोहळ्यालाच संजय राऊत यांनी आनंद दिघेंच्या आयुष्यावर चित्रपट यायला हवा अशी इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा एकनाथ शिंदेही उपस्थित होते. त्यांनी ही जबाबदारी मंगेश देसाईंवर सोपवली. २०१३ पासून मंगेश देसाईं या चित्रपटासाठी प्रयत्न सुरू केले होते. अखेर २०२२ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला.


अशीही चर्चा
'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन हा चित्रपट प्रदर्शित केला जातोय. तसंच एकनाथ शिंदेंच्या मार्केटिंगसाठी बनवण्यात आला असंही म्हटलं गेलं.
लेखकाबद्दल
भाग्यश्री रसाळ
" महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हाताळण्याचा सहा वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांच्या लिखाणाची आवड."... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज