अ‍ॅपशहर

PM मोदींनी त्यांचा जन्मदाखला दाखवावाः कश्यप

नागरिकत्व दुरुस्ती कायदा संपूर्ण देशभरात लागू झाला असून, चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी यावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली आहे. अनुराग कश्यप यांनी सुरुवातीपासून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध दर्शवला आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक ११ डिसेंबर रोजी संसदेत मंजूर करण्यात आले होते.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Jan 2020, 8:51 pm

छपाक'ला शिवसेनेचा पाठिंबा; बंदीचे आवाहन चुकीचेः राऊत

मुंबईः नागरिकत्व दुरुस्ती कायदा संपूर्ण देशभरात लागू झाला असून, चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी यावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली आहे. अनुराग कश्यप यांनी सुरुवातीपासून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध दर्शवला आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक ११ डिसेंबर रोजी संसदेत मंजूर करण्यात आले होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम anurag-kashyp


अनुराग कश्यप यांनी देशभरात लागू झालेल्या सीएएच्या अंमलबजावणीवरून पंतप्रधान मोदींवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची पॉलिटिकल सायन्स या विषयात घेतलेली पदवी दाखवावी. पंतप्रधान मोदींनी त्यांचा जन्मदाखला, त्यांच्या वडिलांचा जन्मदाखला आणि संपूर्ण कुटुंबाचा जन्मदाखला सार्वजनिक करावा, अशी मागणीही कश्यप यांनी केली आहे.


एका दुसऱ्या ट्विटमध्ये, आमच्यावर सीएए जबरदस्तीने लादण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी त्यांची पॉलिटिकल सायन्स विषयात घेतलेली पदवी सार्वजनिक करावी. आपण शिक्षित आहोत, असे पंतप्रधानांनी आधी सिद्ध करावे आणि नंतर बोलावे, अशी आगपाखड कश्यप यांनी केली आहे.


सीएए देशभरात लागू झाला आहे. पंतप्रधान मोदींनी आधी त्यांची कागदपत्रे दाखवावी. त्यांचा, त्यांच्या वडिलांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा जन्मदाखला सार्वजनिक करावा. त्यानंतर देशवासीयांकडे कागदपत्रे मागावीत, असेही कश्यप यांनी म्हटले आहे.

मोदी-ममता भेट; CAA मागे घेण्याची केली मागणी

केंद्रातील मोदी सरकार मठ्ठ आहे. सीएए आणताना सरकारने कोणतेही धोरण आखले नाही. सीएए संदर्भात सरकारकडे कोणतीही दूरदृष्टी नाही. सरकारला विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर त्यांनी उत्तरे दिली नाहीत. सीएए लादण्याचे काम फक्त सरकारने केले आहे, असा आरोपही कश्यप यांनी केला. दुसरीकडे, १० जानेवारी हा देशासाठी काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया अभिनेत्री स्वरा भास्कर हिने दिली आहे.

CAA विरोधी आंदोलन; रेल्वेचे ८४ कोटी नुकसान

दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती कायदा १० जानेवारी २०२० पासून संपूर्ण देशात लागू करण्यात आला आहे. यासंदर्भातील अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली आहे. म्हणजेच १ जानेवारी २०२० ही नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची संपूर्ण भारतात अंमलबजावणी करण्याची तारीख ठरली आहे. दरम्यान, या कायद्याला देशात विविध ठिकाणी विरोध सुरूच आहे. अनेक राज्यांनी देखील या कायद्याची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय घेतला आहे.

बॉक्स ऑफिसवरील पहिला दिवस 'तान्हाजी'चा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज