मुंबई : आजचा दिवस राजकारणाचाच. सकाळपासून एकनाथ शिंदे नाराजी नाट्य मीडियावर चांगलंच रंगत आहे. अनेक कलाकार वेगवेगळे मीम्स टाकत आहेत. राजकीय परिस्थितीवर विनोदी भाष्यही करत आहेत. आज एक योगायोग म्हणजे २१ जून हा वर्षातला सर्वात मोठा दिवस मानला जातो. भूगोलात प्रत्येक जण हे शिकला आहे. याला धरूनच दिग्दर्शक मुकुल अभ्यंकर यानं त्याच्या फेसबुक पेजवर एक गमतीशीर पोस्ट शेअर केली आहे. त्यात लिहिलं आहे, '२१ जून ...वर्षातला सगळ्यात मोठा दिवस की "वर्षा" तला शेवटचा दिवस?' सध्याच्या या राजकीय घडामोडीवर ही पोस्ट मार्मिक आहे. सध्या ती व्हायरलही झाली आहे.
जगातील कुठल्याच बापाच्या आयुष्यात हे दु:ख येऊ नये...धर्मवीरमधला डोळ्यात पाणी आणणारा सीन
मुकुल अभ्यंकरची 'बेस्ट सेलर' ही वेब सीरिज अमॅझाॅन प्राइमवर चांगलीच गाजली. त्यात मिथुन चक्रवर्ती, श्रुती हासन, सोनाली कुलकर्णी, अर्जन बाजवा, सत्यजीत दुबे असे कलाकार होते. मुकुलनं मीसिंग, डाॅक्टर आय लव्ह यू हे सिनेमे दिग्दर्शित केले होते. मीसिंग सिनेमात तब्बू, मनोज वाजपेयी यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
अभिनेता आरोह वेलणकर यानं देखील राज्यातील सुरू असेलल्या राजकीय नाट्यावर वक्तव्य केलं आहे.'एकनाथ शिंदे आणखी १२ आमदारांना घेऊन अज्ञातवासात आहेत, असं मराठी वृत्त वाहिन्यांवर दाखवलं जातय. काही तरी मोठं घडणार असं दिसतंय', असं ट्विट आरोहनं केलं आहे.
या परिस्थितीवर अभिजीत बिचकुलेंनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘आता जी काही राजकीय परिस्थिती चालू आहे ती सर्वसामान्यांची हिताची बिलकूल नाही. आता सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत. लोकांना जगणं मुश्किल झालं आहे. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे राजकारण करत आहेत. माझा शिवसेनेशी संबंध नाही, मी अपक्ष आहे. पण आज बाळासाहेब ठाकरे इथे असते तर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता. हे जे काही मोठे झाले आहेत ते बाळासाहेबांमुळेच झाले आहेत, त्यात काही दुमत नाही.'
उद्धव ठाकरेंसाठी खरंच OTT वर बदलले 'धर्मवीर'चे संवाद?
जगातील कुठल्याच बापाच्या आयुष्यात हे दु:ख येऊ नये...धर्मवीरमधला डोळ्यात पाणी आणणारा सीन
मुकुल अभ्यंकरची 'बेस्ट सेलर' ही वेब सीरिज अमॅझाॅन प्राइमवर चांगलीच गाजली. त्यात मिथुन चक्रवर्ती, श्रुती हासन, सोनाली कुलकर्णी, अर्जन बाजवा, सत्यजीत दुबे असे कलाकार होते. मुकुलनं मीसिंग, डाॅक्टर आय लव्ह यू हे सिनेमे दिग्दर्शित केले होते. मीसिंग सिनेमात तब्बू, मनोज वाजपेयी यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
अभिनेता आरोह वेलणकर यानं देखील राज्यातील सुरू असेलल्या राजकीय नाट्यावर वक्तव्य केलं आहे.'एकनाथ शिंदे आणखी १२ आमदारांना घेऊन अज्ञातवासात आहेत, असं मराठी वृत्त वाहिन्यांवर दाखवलं जातय. काही तरी मोठं घडणार असं दिसतंय', असं ट्विट आरोहनं केलं आहे.
या परिस्थितीवर अभिजीत बिचकुलेंनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘आता जी काही राजकीय परिस्थिती चालू आहे ती सर्वसामान्यांची हिताची बिलकूल नाही. आता सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत. लोकांना जगणं मुश्किल झालं आहे. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे राजकारण करत आहेत. माझा शिवसेनेशी संबंध नाही, मी अपक्ष आहे. पण आज बाळासाहेब ठाकरे इथे असते तर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता. हे जे काही मोठे झाले आहेत ते बाळासाहेबांमुळेच झाले आहेत, त्यात काही दुमत नाही.'
उद्धव ठाकरेंसाठी खरंच OTT वर बदलले 'धर्मवीर'चे संवाद?