मुंबई: अभिनेत्री हेमांगी कवी तिच्या विनोदी त्याचप्रमाणे गंभीर भूमिकांसाठीही ओळखली जाते. ती सध्या 'मन धागा धागा जोडते नवा' या मालिकेतही एन्ट्री घेणार आहे. हेमांगीच्या सोशल मीडिया पोस्टही विशेष चर्चेत येतात. आता तिने वटपौर्णिमेनिमित्त एक स्पेशल पोस्ट केली असून तिने यातून टीका करणाऱ्यांवरही डोळ्यात अंजन घातले आहे. वटपौर्णिमेनिमित्त अनेक महिला व्रत करुन वडाची पूजा करतात. शूटिंगमध्ये व्यग्र असलेल्या हेमांगीने वटपौर्णिमा केली नाही, मात्र असा सत्यवानासारखा नवरा सातशे जन्म मिळावा असे म्हटले आहे.
विविध सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या हेमांगीने या पोस्टमध्ये लिहिले की, 'काल वटपौर्णिमा होती. परवा रात्री शूटिंगला उशीरा पॅक अप झाल्यामुळे काल सकाळी जरा उशीराच उठले. आमचा माणूस (नवरा) काहीतरी आणायला बाजारात गेला होता. मी चहा पीत बसले होते. तेवढ्यात WhatsApp notification आलं. उघडून पाहीलं तर आमच्या माणसाने वडाची पूजा करणाऱ्या बायकांचे २ फोटो पाठवले होते. मी रिप्लाय करत म्हटलं 'हो मला माहितीये आज वटपौर्णिमा आहे!' त्यावर त्याचा काहीच रिप्लाय आला नाही. मला प्रश्न पडला माझ्या लक्षात नसेल म्हणून याने हे पाठवलं की आणखी काही!'
हेमांगी पुढे लिहिते की, 'थोड्या वेळाने आमचा माणूस घरी येताच दारातच मी त्याला म्हटलं, 'ते फोटो कशासाठी पाठवलेस? म्हणजे मी जाऊन आता वडाची पूजा करू की काय? नाही म्हणजे उपवास वगैरे काही होणार नाही कारण मी आताच चहा बिस्किट खाल्लंय'. त्यावर त्याने 'अगं, आज वटपौर्णिमा नं, तू ते काही बाही लिहितेस ना सोशल मीडियावर, त्यासाठी रेफरन्स म्हणून फोटो पाठवले. पोस्टच्या खाली टाकता येतील तुला' असं म्हणत मोगऱ्याच्या गजऱ्याची पूडी माझ्या हातात ठेवली आणि आत निघून गेला. त्याचं हे बोलणं ऐकून मला हसूच आलं! मनापासून वाटलं अशी साथ देणारा सत्यवान सात जन्म काय सातशे जन्म मिळावा! जीयो मेरे पती परमेश्वर!'
'मी आवरून आमच्या माणसाने आणलेला गजरा केसांत त्याच्याकडून माळून घेतला आणि त्याला पप्पी देत म्हटलं, 'Happy वटपौर्णिमा! Hehe!', असंही हेमांगीने पुढे लिहिलं. हेमांगीने या पोस्टमध्ये तळटीप अशी लिहिली की, ' कालच ही पोस्ट टाकणार होते पण मंडळातील काही अतिसंवेदनशील सदस्यांच्या भावना जपत ‘निदान आजच्या दिवशी तरी या संस्कृतीबुडवीने ज्ञान पाजळायला नको होतं’ असं कुणी म्हणू नये म्हणून मी आवरतं घेतलं याची मंडळाने नोंद घ्यावी!' अभिनेत्रीने अशी तळटीप देत तिच्यावर होणाऱ्या संभाव्य टीकेला आधीच उत्तर दिले आहे.
विविध सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या हेमांगीने या पोस्टमध्ये लिहिले की, 'काल वटपौर्णिमा होती. परवा रात्री शूटिंगला उशीरा पॅक अप झाल्यामुळे काल सकाळी जरा उशीराच उठले. आमचा माणूस (नवरा) काहीतरी आणायला बाजारात गेला होता. मी चहा पीत बसले होते. तेवढ्यात WhatsApp notification आलं. उघडून पाहीलं तर आमच्या माणसाने वडाची पूजा करणाऱ्या बायकांचे २ फोटो पाठवले होते. मी रिप्लाय करत म्हटलं 'हो मला माहितीये आज वटपौर्णिमा आहे!' त्यावर त्याचा काहीच रिप्लाय आला नाही. मला प्रश्न पडला माझ्या लक्षात नसेल म्हणून याने हे पाठवलं की आणखी काही!'
हेमांगी पुढे लिहिते की, 'थोड्या वेळाने आमचा माणूस घरी येताच दारातच मी त्याला म्हटलं, 'ते फोटो कशासाठी पाठवलेस? म्हणजे मी जाऊन आता वडाची पूजा करू की काय? नाही म्हणजे उपवास वगैरे काही होणार नाही कारण मी आताच चहा बिस्किट खाल्लंय'. त्यावर त्याने 'अगं, आज वटपौर्णिमा नं, तू ते काही बाही लिहितेस ना सोशल मीडियावर, त्यासाठी रेफरन्स म्हणून फोटो पाठवले. पोस्टच्या खाली टाकता येतील तुला' असं म्हणत मोगऱ्याच्या गजऱ्याची पूडी माझ्या हातात ठेवली आणि आत निघून गेला. त्याचं हे बोलणं ऐकून मला हसूच आलं! मनापासून वाटलं अशी साथ देणारा सत्यवान सात जन्म काय सातशे जन्म मिळावा! जीयो मेरे पती परमेश्वर!'
'मी आवरून आमच्या माणसाने आणलेला गजरा केसांत त्याच्याकडून माळून घेतला आणि त्याला पप्पी देत म्हटलं, 'Happy वटपौर्णिमा! Hehe!', असंही हेमांगीने पुढे लिहिलं. हेमांगीने या पोस्टमध्ये तळटीप अशी लिहिली की, ' कालच ही पोस्ट टाकणार होते पण मंडळातील काही अतिसंवेदनशील सदस्यांच्या भावना जपत ‘निदान आजच्या दिवशी तरी या संस्कृतीबुडवीने ज्ञान पाजळायला नको होतं’ असं कुणी म्हणू नये म्हणून मी आवरतं घेतलं याची मंडळाने नोंद घ्यावी!' अभिनेत्रीने अशी तळटीप देत तिच्यावर होणाऱ्या संभाव्य टीकेला आधीच उत्तर दिले आहे.