मुंबई- गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर आज १७ जानेवारीला त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. आपला हा वाढदिवस अविस्मरणीय करण्यासाठी त्यांनी रेट्रो थीम बर्थडे पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये अनेक सेलेब रेट्रो लुकमध्ये आले होते. स्वतः जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांना रेट्रो लुकमध्ये पाहण्यात आलं. त्यांनी लाल रंगाचे पोलका डॉट कपडे घातले होते.
कपिल शर्माने पूर्ण केलं जॅकी श्रॉफचं चॅलेंज
पार्टीमध्ये झोया अख्तरही आली होती. तिने निळ्या रंगाची डेनिम घातली होती. अनिल कपूर पत्नी सुनीता कपूरसह पार्टीत सहभागी झाले होते. यावेळी सर्वांच्या नजरा या जोडीवर खिळून राहिल्या होत्या. रेट्रो लुकमध्ये दोघंही एव्हरग्रीन कपल दिसत होते. उर्मिलाने यावेळी निळ्या रंगाचा गाउन घालण्याला पसंती दिली होती. या ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत होती.
यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते अभिनेत्री दिव्या दत्ताने तिने या पार्टीत लाल रंगाचा शरारा घातला होती. तिचा हा लुकपाहून जुन्या दिवसांची आठवण आल्यावाचून राहत नाही. यावेळी आमिर खान आणि किरण राव नेहमीच्या लुकमध्येच दिसले. काळ्या रंगाचा पोलका डॉट शर्ट सतीश कौशिक यांच्यावर सूट होत होता.
फरहान अख्तर यांने अमिताभ बच्चन यांचा लुक केला होता. डॉन सिनेमातील बिग बी यांच्या लुकमध्ये तो हटके दिसत होता. त्याने डोक्यावर गमछाही बांधला होता.
जावेद अख्तर यांचा जन्म १७ जानेवारी १९४५ मध्ये ग्वालियर येथे झाला होता. त्यांचा संबंध एका अशा कुटुंबाशी आहे ज्यांच्या उल्लेखाशिवाय उर्दु साहित्याचा इतिहास अपूर्ण आहे. शायरी तर अनेक पिढ्या त्यांच्या रक्तात आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
अरे देवा! अनुष्काच्या सॉक्सवर अर्जुन कपूरची नजर
१९६४ मध्ये जावेद अख्तर मुंबईत आले. सलीम खान यांच्यासोबत जावेद अख्तर यांची पहिली भेट 'सरहदी लुटेरा' या सिनेमाच्या चित्रीकरणावेळी झाली. दिग्दर्शक एसएम सागर यांनी या दोन व्यक्तींना सलीम- जावेद हे नाव देऊन बॉलिवूडला एक हिट जोडी दिली. सलीम खान कथेची संकल्पना द्यायचे तर जावेद अख्तर संवाद लिहिण्यात मदत करायचे. जावेद अख्तर उर्दुमध्येच सिनेमाची संहिता लिहायचे. संपूर्ण संहिता लिहून झाल्यावर त्याचं हिंदीत भाषांतर केलं जायचं.
७० च्या दशकात पटकथा लेखकांचं नाव सिनेमांच्या पोस्टरवर लिहीलं जायचं नाही. पण सलीम- जावेद यांनी बॉलिवूडमध्ये एवढं यश मिळवलं होतं की, त्यांची नावं सिनेमाच्या पोस्टरवर मोठ्या अक्षरात झळकू लागली होती.
अभिनेत्याने ७०व्या वर्षी केलं होतं चौथं लग्न
१९८२ मध्ये सलीम- जावेद जोडी तुटली. या दोघांनी मिळून एकूण २४ सिनेमे एकत्र लिहिले. यातले २० सिनेमे सुपरहिट होते. जावेद अख्तर यांना आतापर्यंत पाचवेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
कपिल शर्माने पूर्ण केलं जॅकी श्रॉफचं चॅलेंज
पार्टीमध्ये झोया अख्तरही आली होती. तिने निळ्या रंगाची डेनिम घातली होती. अनिल कपूर पत्नी सुनीता कपूरसह पार्टीत सहभागी झाले होते. यावेळी सर्वांच्या नजरा या जोडीवर खिळून राहिल्या होत्या. रेट्रो लुकमध्ये दोघंही एव्हरग्रीन कपल दिसत होते. उर्मिलाने यावेळी निळ्या रंगाचा गाउन घालण्याला पसंती दिली होती. या ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत होती.
यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते अभिनेत्री दिव्या दत्ताने तिने या पार्टीत लाल रंगाचा शरारा घातला होती. तिचा हा लुकपाहून जुन्या दिवसांची आठवण आल्यावाचून राहत नाही. यावेळी आमिर खान आणि किरण राव नेहमीच्या लुकमध्येच दिसले. काळ्या रंगाचा पोलका डॉट शर्ट सतीश कौशिक यांच्यावर सूट होत होता.
फरहान अख्तर यांने अमिताभ बच्चन यांचा लुक केला होता. डॉन सिनेमातील बिग बी यांच्या लुकमध्ये तो हटके दिसत होता. त्याने डोक्यावर गमछाही बांधला होता.
जावेद अख्तर यांचा जन्म १७ जानेवारी १९४५ मध्ये ग्वालियर येथे झाला होता. त्यांचा संबंध एका अशा कुटुंबाशी आहे ज्यांच्या उल्लेखाशिवाय उर्दु साहित्याचा इतिहास अपूर्ण आहे. शायरी तर अनेक पिढ्या त्यांच्या रक्तात आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
अरे देवा! अनुष्काच्या सॉक्सवर अर्जुन कपूरची नजर
१९६४ मध्ये जावेद अख्तर मुंबईत आले. सलीम खान यांच्यासोबत जावेद अख्तर यांची पहिली भेट 'सरहदी लुटेरा' या सिनेमाच्या चित्रीकरणावेळी झाली. दिग्दर्शक एसएम सागर यांनी या दोन व्यक्तींना सलीम- जावेद हे नाव देऊन बॉलिवूडला एक हिट जोडी दिली. सलीम खान कथेची संकल्पना द्यायचे तर जावेद अख्तर संवाद लिहिण्यात मदत करायचे. जावेद अख्तर उर्दुमध्येच सिनेमाची संहिता लिहायचे. संपूर्ण संहिता लिहून झाल्यावर त्याचं हिंदीत भाषांतर केलं जायचं.
७० च्या दशकात पटकथा लेखकांचं नाव सिनेमांच्या पोस्टरवर लिहीलं जायचं नाही. पण सलीम- जावेद यांनी बॉलिवूडमध्ये एवढं यश मिळवलं होतं की, त्यांची नावं सिनेमाच्या पोस्टरवर मोठ्या अक्षरात झळकू लागली होती.
अभिनेत्याने ७०व्या वर्षी केलं होतं चौथं लग्न
१९८२ मध्ये सलीम- जावेद जोडी तुटली. या दोघांनी मिळून एकूण २४ सिनेमे एकत्र लिहिले. यातले २० सिनेमे सुपरहिट होते. जावेद अख्तर यांना आतापर्यंत पाचवेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.