मुंबई : विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचे येत्या ९ डिसेंबर रोजी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील एका आलिशान हॉटेलमध्ये होणार आहे. या विवाहसोहळ्यासाठी विकी आणि कतरिनाचे कुटुंबीय राजस्थानमध्ये टप्याटप्याने दाखल होत आहेत. हे सर्वजण सिक्स सेंस फोर्ट बरवाडा हॉटेलमध्ये राहणार आहेत. या दोघांचे लग्न भारतीय आणि पाश्चात्य पद्धतीने होणार आहे. या दोघांच्या शाही विवाह सोहळ्यातील शाही मेजवानी काय असेल हे देखील आता समोर आले आहे.
काय आहे शाही मेजवानी? सिक्स सेंस फोर्ट बरवाडा हॉटेलमध्ये विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या शाही सोहळ्यासाठी पाहुणे विवाहसोहळ्यासाठी दाखल होत आहेत. शाही सोहळ्यासाठी येणा-या पाहुण्यांना खास मेजवानी देण्यात येणार आहे. या शाही विवाहामध्ये पारंपरिक भारतीय आणि पाश्चात्य पद्धतीचे पदार्थ असणार आहेत. त्यामध्ये छोले-भटुरे, बटर चिकन यांसारखे पदार्थ असणार आहेत.
इतकेच नाही तर परदेशातून आणि भारतातील काही शहरांमधून लग्नसोहळ्यातील मेजवानीसाठी भाज्या मागवण्यात आल्या आहेत. थायलंडमधून काही खास भाज्या मागवल्या आहेत. कर्नाटक येथून लाल केळी आणि मशरुम्स मागविली आहेत. तर पालक आणि कोबी कर्नाटकमधून येणार आहेत. दरम्यान, लग्नसोहळ्यासाठी येणा-या व्हीआयपी पाहुण्यासाठी मुंबईहून ३०० भांड्यांचे सेट मुंबईहून जयपूरला नेण्यात येणार आहेत.
मोजक्याच व्यक्तींनाच निमंत्रण
कतरिना आणि विकी ७ ते १२ डिसेंबर दरम्यान लग्न करणार आहेत. या दोघांच्या लग्नाला कुटुंबातील काही निवडक व्यक्ती आणि मित्र-मैत्रिणींना आमंत्रण दिले आहे. राजस्थानमध्ये होणा-या शाही विवाह सोहळ्याआधीच कतरिना आणि विकीने मुंबईत कोर्ट मॅरेज केल्याचे सांगितले जात आहे.
काय आहे शाही मेजवानी?
इतकेच नाही तर परदेशातून आणि भारतातील काही शहरांमधून लग्नसोहळ्यातील मेजवानीसाठी भाज्या मागवण्यात आल्या आहेत. थायलंडमधून काही खास भाज्या मागवल्या आहेत. कर्नाटक येथून लाल केळी आणि मशरुम्स मागविली आहेत. तर पालक आणि कोबी कर्नाटकमधून येणार आहेत. दरम्यान, लग्नसोहळ्यासाठी येणा-या व्हीआयपी पाहुण्यासाठी मुंबईहून ३०० भांड्यांचे सेट मुंबईहून जयपूरला नेण्यात येणार आहेत.
मोजक्याच व्यक्तींनाच निमंत्रण
कतरिना आणि विकी ७ ते १२ डिसेंबर दरम्यान लग्न करणार आहेत. या दोघांच्या लग्नाला कुटुंबातील काही निवडक व्यक्ती आणि मित्र-मैत्रिणींना आमंत्रण दिले आहे. राजस्थानमध्ये होणा-या शाही विवाह सोहळ्याआधीच कतरिना आणि विकीने मुंबईत कोर्ट मॅरेज केल्याचे सांगितले जात आहे.