अ‍ॅपशहर

ईशा अंबानीच्या लग्नात लतादीदींनी दिला होता खास आशीर्वाद ,नीता अंबानीही झाल्या होत्या भावुक

लता मंगेशकर यांनी २०१८ मध्ये ईशा अंबानीच्या लग्नात गायत्री मंत्र आणि गणेश स्तुती यांचे गायन केलं होतं.या लग्नाला त्या प्रत्यक्ष उपस्थित नसल्या तरी त्यांनी एक व्हिडिओ संदेश पाठवला होता.आता या सोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

guest Ganesh-Mhaske | Lipi 8 Feb 2022, 1:38 pm
मुंबई : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी रविवारी ६ फेब्रुवारी रोजी मुंबईत अखेरचा श्वास घेतला .करोना संसर्ग झाल्याने त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते.त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये न्योमोनियाही झाला होता. बरेच दिवस उपचार घेतल्या नंतर त्या ठीक ही झाल्या होत्या.परंतु ५ फेब्रुवारी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली आणि ६ फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम lata mangeshkar sang gayatri mantra at isha ambani wedding look at this last emotional moment
ईशा अंबानीच्या लग्नात लतादीदींनी दिला होता खास आशीर्वाद ,नीता अंबानीही झाल्या होत्या भावुक


दीदी ९२ वर्षांच्या होत्या. त्यामुळं गेल्या काही वर्षात त्यांनी गाणी गाणं बंद केलं होतं. त्यांनी शेवटचं गाणं कोणतं गायलं , याविषयी बोललं जात आहे. तर लतादीदींनी कोणत्या चित्रपटासाठी नव्हे तर मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी हिच्या लग्नासाठी शेवटचं रेकॉर्डिंग केलं होतं, असं म्हटलं जात आहे.

ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या लग्नासाठी उपस्थित राहणं लतादीदींना शक्य नव्हतं. त्यामुळं त्यांनी त्यांच्या खासपद्धतीनं दोघांना शुभेच्छा दिल्या होत्या. दीदींनी दोघांच्या विवाहसोहळ्यासाठी शुभेच्छा संदेशासह गायत्री मंत्राचं रेकॉर्डिंग केलं होतं.

ईशा आणि आनंदला लतादीदींनी लग्नाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.लता मंगेशकर म्हणाल्या होत्या,प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी लग्नाला उपस्थित राहू शकले नाही,पण मी माझ्या वतीने जे काही चांगल करू शकत होते, त्यापैकी हे आहे.माझा आशिर्वाद नेहमीच ईशा आणि तिचा पती आनंद यांच्यासोबत आहे.दोघांनीही आपल्या आई वडिलांचा अभिमान वाढवावा.


दरम्यान, लता मंगेशकर यांनी त्यांचे शेवटचे 'सौगंध मुझे इस मिट्टी की' हे गाण गायलं होत.मयुरेश राय यांनी ते संगीतबद्ध केल होत.हे गाणं देशातील सैनिकांना आदरांजली म्हणून त्यांनी ते गायलं होत,जे मार्च २०१९ मध्ये प्रदर्शित झालं होत.तर चित्रपटासाठी त्यांनी शेवटचं गाणं २००४ मध्ये 'वीर-जारा' या चित्रपटासाठी गायलं होतं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज