मुंबई- महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत सोशल मीडियावरही चर्चा रंगली आहे. राज्य सरकारचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच त्यांच्यासोबत ३५ हून जास्त आमदार असल्याचं स्पष्ट केलं आहे. शिंदे यांच्या बंडखोरीनंतर अन्य आमदारही उद्धव ठाकरे यांची एक एक करून साथ सोडत आहेत. यामुळेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार राहणार की नाही याबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. अशात माजी आयएएस सूर्य प्रताप सिंह यांनी ट्वीट करत महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची खिल्ली उडवली आहे. ज्यावर अनेक लोक कमेंट करत आहेत.
'अभिनेत्रीची टीम कामाला लागली, भरपूर पैसे मिळाले असतील'
सूर्य प्रताप सिंह यांनी लिहिले की, 'जर शिंदे यांच्याकडे संख्याबळ आहे, तर ते गुवाहाटीत का बसले आहेत? उद्धव ठाकरेंनी अद्याप राजीनामा का दिला नाही? उद्धव यांच्या १० मिनिटांच्या भावनिक आवाहनाने गोष्टा बदलणार का? खेळ अजून सुरू आहे का? आणखी एक प्रश्न. उद्धव यांच्या जाण्याने कंगना इतकी खूश का आहे?'
माजी आयएएसच्या ट्वीटवर चौधरी साहब नावाच्या युजरने लिहिले की, 'हिंदुत्वाची आवड असलेले आणि या अडीच वर्षांत ज्यांचा छळ झाला, केवळ कंगनाच नाही तर उद्धव यांच्या जाण्याने अनेकजण आनंदी आहेत. महाराष्ट्राबाहेरील असे लोक आनंदी आहेत, ज्यांचा तिथल्या सरकारशी काहीही संबंध नाही आणि दुःखी पश्चिम बंगालमधीलही आहेत ज्यांना पंतप्रधान व्हायचं होतं.'
'आमदार गुजरातमध्ये विकायला जातात, कारण तिथूनच बोली लावणारे येतात', कॉमेडियनच्या ट्वीटची चर्चा
प्रशांत सिंह यांनी लिहिले, 'उद्धवने कंगनाचं कार्यालय तोडलं, आता कंगना खूश आहे कारण उद्धवचे सरकार धोक्यात आहे. आकडे उद्धव यांच्याकडे असतील तर भावनिक आवाहन का? याशिवाय सूर्यप्रताप यांनी आणखी एका ट्वीटमध्ये लिहिले की, 'लोकशाहीची अशी थट्टा जगात क्वचितच कुठे पाहायला मिळत असेल. देशात खुलेआम 'घोडेविक्री'चा खेळ सुरू आहे. लोकशाही बुलडोझरच्या हातात आहे.'
दरम्यान, या प्रकरणात कंगनाचं नाव जोडलं जात आहे कारण गेल्या वर्षी बीएमसीने कंगनाच्या ऑफिसवर बुलडोझर चालवला होता. त्यावेळी कंगना (Kangana Ranaut) उद्धव ठाकरेंना म्हणाली, 'आज माझे घर तुटले, उद्या तुझा अहंकार मोडेल.' आता ठाकरे सरकारमध्ये फूट पडली असताना लोकांना कंगनाचं ते वक्तव्य वारंवार आठवत आहे.
'अभिनेत्रीची टीम कामाला लागली, भरपूर पैसे मिळाले असतील'
सूर्य प्रताप सिंह यांनी लिहिले की, 'जर शिंदे यांच्याकडे संख्याबळ आहे, तर ते गुवाहाटीत का बसले आहेत? उद्धव ठाकरेंनी अद्याप राजीनामा का दिला नाही? उद्धव यांच्या १० मिनिटांच्या भावनिक आवाहनाने गोष्टा बदलणार का? खेळ अजून सुरू आहे का? आणखी एक प्रश्न. उद्धव यांच्या जाण्याने कंगना इतकी खूश का आहे?'
माजी आयएएसच्या ट्वीटवर चौधरी साहब नावाच्या युजरने लिहिले की, 'हिंदुत्वाची आवड असलेले आणि या अडीच वर्षांत ज्यांचा छळ झाला, केवळ कंगनाच नाही तर उद्धव यांच्या जाण्याने अनेकजण आनंदी आहेत. महाराष्ट्राबाहेरील असे लोक आनंदी आहेत, ज्यांचा तिथल्या सरकारशी काहीही संबंध नाही आणि दुःखी पश्चिम बंगालमधीलही आहेत ज्यांना पंतप्रधान व्हायचं होतं.'
'आमदार गुजरातमध्ये विकायला जातात, कारण तिथूनच बोली लावणारे येतात', कॉमेडियनच्या ट्वीटची चर्चा
प्रशांत सिंह यांनी लिहिले, 'उद्धवने कंगनाचं कार्यालय तोडलं, आता कंगना खूश आहे कारण उद्धवचे सरकार धोक्यात आहे. आकडे उद्धव यांच्याकडे असतील तर भावनिक आवाहन का? याशिवाय सूर्यप्रताप यांनी आणखी एका ट्वीटमध्ये लिहिले की, 'लोकशाहीची अशी थट्टा जगात क्वचितच कुठे पाहायला मिळत असेल. देशात खुलेआम 'घोडेविक्री'चा खेळ सुरू आहे. लोकशाही बुलडोझरच्या हातात आहे.'
दरम्यान, या प्रकरणात कंगनाचं नाव जोडलं जात आहे कारण गेल्या वर्षी बीएमसीने कंगनाच्या ऑफिसवर बुलडोझर चालवला होता. त्यावेळी कंगना (Kangana Ranaut) उद्धव ठाकरेंना म्हणाली, 'आज माझे घर तुटले, उद्या तुझा अहंकार मोडेल.' आता ठाकरे सरकारमध्ये फूट पडली असताना लोकांना कंगनाचं ते वक्तव्य वारंवार आठवत आहे.