मुंबईः कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुका तोंडावर असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून दोन महत्त्वाच्या नेत्यांनी पक्षांतर केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. याच संदर्भात अभिनेते संजय मोने यांनी सोशल मीडियावर लिहिलेली एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
डोंबिवलीतील काही मनसे कार्यकर्त्यांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला व त्याला विविध माध्यमांद्वारे वारंवार दाखविल्यामुळे त्याची बातमी झाली. त्यामुळं एक आमदार असलेल्या पक्षाची ही मोठी झाली, त्यामुळं त्या पक्षाची असण्याची सगळे दखल घेत असल्याचं संजय मोने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या पक्षानं , कार्यकर्त्यांनी जी कामं केली त्यांची पावती देणं हे आपलं कर्तव्य आहे. तसंच मी कोणत्याही पक्षाची बाजून घेत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
शेवटी आपण ठरवायचं आहे..जाणता राजा (जो जाणतो)आणि नेणता राजा (जो आपल्याला हव्या त्या ठिकाणी -इप्सित स्थळी सुरक्षित नेतो )यात निवड करायची आहे.बोटाला रंग लागला की मतदान असं समजू नका..रंग लावायला बोट शिल्लक राहिलंय हे महत्वाचं, असंही संजय मोने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. वाचा संजय मोने यांची पोस्ट:
डोंबिवलीतील काही मनसे कार्यकर्त्यांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला व त्याला विविध माध्यमांद्वारे वारंवार दाखविल्यामुळे त्याची बातमी झाली. त्यामुळं एक आमदार असलेल्या पक्षाची ही मोठी झाली, त्यामुळं त्या पक्षाची असण्याची सगळे दखल घेत असल्याचं संजय मोने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या पक्षानं , कार्यकर्त्यांनी जी कामं केली त्यांची पावती देणं हे आपलं कर्तव्य आहे. तसंच मी कोणत्याही पक्षाची बाजून घेत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
शेवटी आपण ठरवायचं आहे..जाणता राजा (जो जाणतो)आणि नेणता राजा (जो आपल्याला हव्या त्या ठिकाणी -इप्सित स्थळी सुरक्षित नेतो )यात निवड करायची आहे.बोटाला रंग लागला की मतदान असं समजू नका..रंग लावायला बोट शिल्लक राहिलंय हे महत्वाचं, असंही संजय मोने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.