मुंबई- बॉलिवूड अभिनेता राहुल देव आणि अबिनेत्री मुग्धा गोडसे गेल्या सात वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांच्या वयात १४ वर्षांचं अंतर आहे. वयाच्या या मुद्द्यावरून त्यांच्या नात्यावर अनेक प्रश्न उपस्थित गेले होते. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत राहुलने वयामधील हे अंतर फार नसल्याचं सांगितलं. त्याच्या आई- वडिलांच्या वयातही १० वर्षांचं अंतर होतं असं राहुल म्हणाला.
सावत्र वडिलांच्या आठवणीने भावुक झाली दिया मिर्झा
एका टॉक शो दरम्यान राहुल म्हणाला की, 'आमच्या वयात जवळपास १४ वर्षांचं अंतर आहे. काही काळासाठी या गोष्टीने मी चिंतीतही झालो होतो. पण नंतर मला जाणवलं की माझ्या आई- वडिलांच्या वयातही १० वर्षांचं अंतर होतं. तर हे इतकं मोठं अंतर नाही. याशिवाय मला वाटतं की, जोपर्यंत तुम्ही आनंदी आहात तोपर्यंत वय किंवा इतर कोणत्याच गोष्टी महत्त्वाच्या राहत नाहीत.'
राहुल म्हणाला की, 'हे काही पहिल्या नजरेतलं प्रेम नव्हतं. एका लग्नात आमची ओळख झाली काळांतराने आमची मैत्री झाली. लग्नानंतर आम्ही एकमेकांना भेटत राहिलो. थोड्याच काळात आम्ही एकमेकांना आवडू लागलो आणि प्रेमात ठार वेडे झालो. मी फार नशीबवान आहे असं मी नक्कीच म्हणू शकतो.'
Holi 2020: आराध्यासोबत ऐश्वर्याने साजरी केली होळी
राहुलला एक मुलगा आहे. त्याच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं. कर्करोगाने पत्नीचं निधन झाल्यानंतर सिद्धार्थचा सांभाळ राहुलनेच केला. पत्नी रीनाची जागा या जगात कोणी घेऊ शकेल असं राहुलला कधीच वाटलं नव्हतं. पण त्याच्या आयुष्यात दुसऱ्यांदा प्रेम आलं.
सावत्र वडिलांच्या आठवणीने भावुक झाली दिया मिर्झा
एका टॉक शो दरम्यान राहुल म्हणाला की, 'आमच्या वयात जवळपास १४ वर्षांचं अंतर आहे. काही काळासाठी या गोष्टीने मी चिंतीतही झालो होतो. पण नंतर मला जाणवलं की माझ्या आई- वडिलांच्या वयातही १० वर्षांचं अंतर होतं. तर हे इतकं मोठं अंतर नाही. याशिवाय मला वाटतं की, जोपर्यंत तुम्ही आनंदी आहात तोपर्यंत वय किंवा इतर कोणत्याच गोष्टी महत्त्वाच्या राहत नाहीत.'
राहुल म्हणाला की, 'हे काही पहिल्या नजरेतलं प्रेम नव्हतं. एका लग्नात आमची ओळख झाली काळांतराने आमची मैत्री झाली. लग्नानंतर आम्ही एकमेकांना भेटत राहिलो. थोड्याच काळात आम्ही एकमेकांना आवडू लागलो आणि प्रेमात ठार वेडे झालो. मी फार नशीबवान आहे असं मी नक्कीच म्हणू शकतो.'
Holi 2020: आराध्यासोबत ऐश्वर्याने साजरी केली होळी
राहुलला एक मुलगा आहे. त्याच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं. कर्करोगाने पत्नीचं निधन झाल्यानंतर सिद्धार्थचा सांभाळ राहुलनेच केला. पत्नी रीनाची जागा या जगात कोणी घेऊ शकेल असं राहुलला कधीच वाटलं नव्हतं. पण त्याच्या आयुष्यात दुसऱ्यांदा प्रेम आलं.