मुंबई- अभिनेता राजीव खंडेलवाल लवकरच 'नक्सल' या अॅक्शन- थ्रीलर वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी ५ वर ही वेब सीरिज दिसणार आहे. राजीवसोबत टीना दत्ता, आमीर अली, श्रीजीता डे आणि सत्यदीप मिश्रा या कलाकारांची महत्त्वपूर्ण भूमिका सीरिजमध्ये असणार आहे. 'नक्सल'च्या चित्रीकरणाला निर्माते लवकरच सुरुवात करणार आहेत. त्यासाठी कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर योग्य आणि कठोर असे सुरक्षा उपाय योजले जाणार आहेत.
अॅक्शनने भरलेली ही आठ भागांची ही सीरिज काल्पनिक कथेवर आधारित असून यात 'नक्सल' चळवळीविरोधात लढणाऱ्या एका योद्ध्याची कथा दाखवण्यात येणार आहे. राघवसाठी (राजीव खंडेलवाल) ही काळाच्या विरोधातील लढाई आहे. राघव हा एक पोलीस अधिकारी आहे आणि तो सर्व आव्हानांचा सामना करत लढतो आहे. महाराष्ट्रातील दाट जंगलांपासून महानगरांपर्यंत सर्वच अंगे व्यापणारी अशी ही मालिका असून 'नक्सल' चळवळ या दोन्ही वातावरणात कशी फोफावत चालली आहे, त्याचे चित्रण या मालिकेमध्ये घडणार आहे.
सुशांतसिंह राजपूतवरून पत्रकारावर भडकली दीपिका पदुकोण, मिळालं जशासतसं उत्तर
या वेबसीरिजबद्दल बोलताना राजीव खंडेलवाल म्हणाला की, 'कोविडच्या पार्श्वभूमीवर या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यात फार मोठ्या प्रमाणावर बदल केले गेले आहेत. पण सरतेशेवटी यात निवडण्यात आलेले सर्वच कलाकार व तंत्रज्ञ हे खूप ताकदीचे आहेत. आमीर, सत्यदीप, टीना आणि इतर कलाकारांबरोबर काम करण्यास मी फार उत्सुक आहे.'
'एकाही कलाकारासोबत मी काम केलेले नाही. त्यामुळे उत्सुकता अधिकच वाढली आहे. या मालिकेसाठी आम्ही संहितावाचन केले आहे. लॉकडाउनच्या काळात मी माझ्या व्यक्तिरेखेवर काम केले. 'एसटीएफ' एजंटची माझी व्यक्तिरेखा ही प्रेक्षकांना चकित करून जाईल. कारण या व्यक्तिरेखेला खूप कंगोरे आहेत.'
जेव्हा सुशांतसिंह राजपूत स्वतःच्याच प्रेमात होता
''झी5'बरोबर या अत्यंत महत्वाच्या अशा वेबसीरिजवर काम करण्याची उत्सुकता आहे. आज भारतामध्ये जे काही घडत आहे, त्याच्याशी सुसंगत अशीच ही मालिका आहे. आज देशाला जी गोष्ट पोखरत आहे, अशा कथेवर ही मालिका बेतली आहे. पण त्याचवेळी त्यातून पूर्ण मनोरंजन होईल, याची काळजी घेतली गेली आहे. राजीव खंडेलवालची यात प्रमुख भूमिका आहे. त्याचबरोबर अत्यंत प्रतिभावान असे इतर कलाकार व तंत्रज्ञ या मालिकेत आहेत, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे,' असं 'नक्सल'चे निर्माते अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशानदार म्हणाले.
अॅक्शनने भरलेली ही आठ भागांची ही सीरिज काल्पनिक कथेवर आधारित असून यात 'नक्सल' चळवळीविरोधात लढणाऱ्या एका योद्ध्याची कथा दाखवण्यात येणार आहे. राघवसाठी (राजीव खंडेलवाल) ही काळाच्या विरोधातील लढाई आहे. राघव हा एक पोलीस अधिकारी आहे आणि तो सर्व आव्हानांचा सामना करत लढतो आहे. महाराष्ट्रातील दाट जंगलांपासून महानगरांपर्यंत सर्वच अंगे व्यापणारी अशी ही मालिका असून 'नक्सल' चळवळ या दोन्ही वातावरणात कशी फोफावत चालली आहे, त्याचे चित्रण या मालिकेमध्ये घडणार आहे.
सुशांतसिंह राजपूतवरून पत्रकारावर भडकली दीपिका पदुकोण, मिळालं जशासतसं उत्तर
या वेबसीरिजबद्दल बोलताना राजीव खंडेलवाल म्हणाला की, 'कोविडच्या पार्श्वभूमीवर या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यात फार मोठ्या प्रमाणावर बदल केले गेले आहेत. पण सरतेशेवटी यात निवडण्यात आलेले सर्वच कलाकार व तंत्रज्ञ हे खूप ताकदीचे आहेत. आमीर, सत्यदीप, टीना आणि इतर कलाकारांबरोबर काम करण्यास मी फार उत्सुक आहे.'
'एकाही कलाकारासोबत मी काम केलेले नाही. त्यामुळे उत्सुकता अधिकच वाढली आहे. या मालिकेसाठी आम्ही संहितावाचन केले आहे. लॉकडाउनच्या काळात मी माझ्या व्यक्तिरेखेवर काम केले. 'एसटीएफ' एजंटची माझी व्यक्तिरेखा ही प्रेक्षकांना चकित करून जाईल. कारण या व्यक्तिरेखेला खूप कंगोरे आहेत.'
जेव्हा सुशांतसिंह राजपूत स्वतःच्याच प्रेमात होता
''झी5'बरोबर या अत्यंत महत्वाच्या अशा वेबसीरिजवर काम करण्याची उत्सुकता आहे. आज भारतामध्ये जे काही घडत आहे, त्याच्याशी सुसंगत अशीच ही मालिका आहे. आज देशाला जी गोष्ट पोखरत आहे, अशा कथेवर ही मालिका बेतली आहे. पण त्याचवेळी त्यातून पूर्ण मनोरंजन होईल, याची काळजी घेतली गेली आहे. राजीव खंडेलवालची यात प्रमुख भूमिका आहे. त्याचबरोबर अत्यंत प्रतिभावान असे इतर कलाकार व तंत्रज्ञ या मालिकेत आहेत, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे,' असं 'नक्सल'चे निर्माते अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशानदार म्हणाले.