अ‍ॅपशहर

दारुच्या नशेत कपिल... जेव्हा राजू श्रीवास्तव यांनी केला होता मोठा खुलासा

Raju shrivastav no more प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे आज २१ सप्टेंबर रोजी निधन झालं. ते ५८ वर्षांचे होते. ज्येष्ठ कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं बुधवारी सकाळी निधन झाले. दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Sep 2022, 11:33 am
मुंबई: प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं आज निधन झालं. गेल्या दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते.आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. १० ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव जिममध्ये व्यायाम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. राजू जिममध्ये ट्रेडमिलवर धावत असतानाच बेशुद्ध होऊन कोसळले. त्यानंतर त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम raju srivastav and kapil sharma news



कानपूरच्या राजू श्रीवास्तव यांनी छोट्या पडद्यावरुन आपल्या करिअरची सुरुवात केली होती. २००५ मध्ये स्टँड-अप कॉमेडी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजच्या पहिल्या सीजनमधून त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. त्यांनी मैने प्यार किया, बाजीगर, बॉम्बे टू गोवा रिमेक, आमदानी अठन्नी खर्चा रुपैया यांसारख्या चित्रपटातही भूमिका साकारल्या होत्या. तसंच ते बिग बॉस सीझन ३ मध्ये स्पर्धकही होते. राजू उत्तर प्रदेशात चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्षही होते. ते नेहमीच रोखठोक बोलायचे. स्टँड-अप कॉमेडी करतानाही अनेकदा त्यांनी राजकीय नेते, सरकारवर निशाणा साधला होता.


कॉमेडी किंग कपिल शर्मानं विमानप्रवासादरम्यान दारूच्या नशेत सहकलाकारांना मारहाण केल्याचं प्रकरण चांगलंच गाजलं होतं. त्यानंतर सुनील ग्रोव्हर, चंदन प्रभाकर आणि अली असगर या प्रसिद्ध सहकलाकारांविनाच कपिलला 'दि कपिल शर्मा शो'चे शूटिंग करावं लागलं होतं.

आपल्या हुकूमी एक्क्यांविना एकाकी पडलेल्या कपिलनं शोची बुडती नौका सावरण्यासाठी राजू श्रीवास्तव, सुनील पाल आणि एहसान कुरेशी यांसारख्या नावजलेल्या हास्य कलाकारांना घेऊन एक खास एपिसोड शूट केला होता.
संजय राऊतांनी 'ठाकरे' सिनेमासाठी वापरला पत्राचाळीचा बेहिशेबी पैसा? स्वप्ना पाटकरांच्या दाव्याने खळबळ
कपिल आणि सहकलाकरांच्या वादावर प्रतिक्रिया देतानाच राजू श्रीवास्तव यांनी 'कपिल यश पचवू शकत नसल्याची' टिपण्णी करत त्याला अप्रत्यक्षरित्या सुनावलं होतं. 'तो उद्धट नसला तरी त्याला यशाचं ओझं पेलवता येत नाहीये, असं दिसतंय' अशी प्रतिक्रिया श्रीवास्तव यांनी दिली होती.


कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं निधन, ५८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
'कपिलनं कधी माझ्याशी गैरवर्तन केलं नाही पण दारू प्यायल्यावर त्याचा स्वत:वर आणि रागावर ताबा राहत नाही, असं मला त्याच्या सहकलाकारांनी सांगितलं. एरवी तो चांगला वागतो, पण दारू प्यायल्यावर त्याचं वागणं बदलतं. हे खूप चुकीचं आहे' असं श्रीवास्तव यांनी नमूद केलं होतं. 'काहीही झालं तरी प्रेक्षक म्हणजे आपले माय-बाप असतात. दारू पिणं वगैरे जरी त्यांनी समजून घेतलं तरी मारहाण करणं, शिव्या देणं हे ते सहन करणार नाहीत' असं श्रीवास्तव म्हणाले होते.

महत्वाचे लेख