अ‍ॅपशहर

नशेत राम गोपाल वर्मांचा मोठा गौप्यस्फोट! राजामौलींना म्हणाले- 'सांभाळा, तुमच्या जीवाला धोका'

Ram Gopal Varma बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ट्वीट करत राजामौली यांच्यासाठी धोक्याचा ईशारा दिलाय. त्यांनी ट्वीट राजामौली यांच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jan 2023, 1:48 pm
मुंबई- सध्या एस एस राजामौली आणि त्यांच्या 'आरआरआर' चित्रपटाचा डंका जगभर वाजत आहे. या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवर कमाईचे विक्रमच केले नाहीत तर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकून आपला दबदबा निर्माण केला. नुकताच 'आरआरआर'ने 'नाटू नाटू' या गाण्यासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावला आणि आता तो ऑस्करच्या शर्यतीत आहे. मात्र अशातच लोकप्रिय बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ट्विटरवर एक धक्कादायक दावा केला आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. वर्मा यांनी ट्वीट करत राजामौली यांच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे आणि या कटात मी सुद्धा सहभागी आहे असं त्यांनी लिहिलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ram gopal varma


राम गोपाल वर्मा यांच्या ट्वीटने सोशल मीडियावर प्रचंड गदारोळ सुरू झाला आहे. ते नक्की खरं सांगत आहेत की मस्करी करत आहेत यावरून नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे कारण राम गोपाल वर्मा यांनी दारू पिऊन हे ट्वीट केलं असल्याची कबुलीही दिली आहे. त्यामुळे हे ट्वीट किती खरं आणि किती खोटं असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. राम गोपाल वर्मा यांनी ट्वीट करत लिहिलं, 'आणि एस एस राजामौली सर तुम्ही तुमची सुरक्षा वाढवा कारण इथे बॉलिवूडमध्ये अशा काही लोकांचा गट आहे जो तुमच्या यशावर जळतोय आणि त्यामुळेच त्यांनी तुमचा जीव घेण्याचा कट रचलाय. या गटाचा मीही एक भाग आहे. मी हे सिक्रेट सांगितलं कारण मी आता चार ग्लास दारू प्यायलोय.'

याआधी केलेल्या ट्वीटमध्ये राम गोपाल वर्मा यांनी राजामौली यांचं कौतुक केलं आहे. एक ट्वीट करत राम गोपाल वर्मा यांनी लिहिलं, 'दादासाहेब फाळके यांच्यापासून आतापर्यंत भारतीय सिनेमाच्या इतिहासात कधीही कुणीही असा विचार केला नसेल की एखादा भारतीय दिग्दर्शक या क्षणाचा साक्षीदार होईल. स्वतः राजामौली यांनीही असा विचार केला नसेल.' त्यांचे हे ट्वीट आता नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आहेत.

महत्वाचे लेख