अ‍ॅपशहर

असा अभिनेता होणे नाही! विक्रम गोखले यांच्या निधनाने रोहिणी हट्टंगडी यांना अश्रू अनावर

Rohini Hattangadi ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीचं फार मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या निधनानंतर जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनाही अश्रू अनावर झाले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Nov 2022, 5:14 pm
मुंबई- आपल्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण चित्रपटसृष्टीवर अधिराज्य करणारे लोकप्रिय जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं आज २६ नोव्हेंबर रोजी निधन झालं. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. गेले १७ दिवस त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर त्यांची मृत्यूबरोबरची झुंज आज थांबली आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला. प्रदीर्घ आजारानंतर त्यांचं निधन झालं. आता त्यांच्या निधनावर अनेक मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनीही अभिनेत्याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. एक उत्कृष्ट अभिनेता आणि जवळचा व्यक्ती गमावल्याने रोहिणी यांना अश्रू अनावर झाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rohini hattangadi vikram goakhale


View this post on Instagram A post shared by VIKRAM GOKHLE (@vikramgokhle.official)

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विक्रम गोखले यांच्याबद्दलच्या भावना बोलू दाखवल्या. त्या म्हणाल्या, 'आमची पहिली भेट पुण्यात झाली होती. नंतर जेव्हा मी अभिनय क्षेत्रात आले तेव्हा आमची ओळख वाढली. आम्ही एकत्र फार काम केलं नाही पण त्यांच्या अभिनयाची पद्धत मला खूप आवडायची. त्यांचा चेहरा प्रचंड बोलका होता. त्यांचे डोळे न बोलताही खूप काही सांगून जायचे. नेहमी भेटल्यानंतर ते मला म्हणायचे की रोहिणी आपण एकमेकांची नावं सजेस्ट करायची हा भूमिकेसाठी. आता तर त्यांच्या तोडीला कुणीच नाही. असा अभिनेता आता होणं नाही. मला त्यांचं 'बॅरिस्टर'मधलं काम खूप आवडलं. त्यांचं 'महासागर' मला आठवतंय. 'अग्निपथ' मध्ये ते होते. मन लावून काम करायचं हेच त्यांचं ध्येय होतं आणि त्यामुळे ते आज यशाच्या शिखरावर होते.' हे सगळं बोलताना रोहिणी यांना रडू आवरत नव्हतं. बोलताना त्या प्रचंड भावुक झाल्या होत्या.

View this post on Instagram A post shared by VIKRAM GOKHLE (@vikramgokhle.official)

रोहिणी यांच्यासोबतच अभिनेत्री अलका कुबल यांनीही विक्रम गोखले यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. अलका यांनी म्हटलं, 'त्यांच्या जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झालीये. ती जागा कुणीही भरून काढू शकत नाही. नाटक असो, चित्रपट असो. त्यांच्यासारखा अभिनय कुठेही पाहिला नाही. त्यांनी बच्चनसारख्या माणसासोबत त्यांनी तोडीस तोड अभिनय केला. हिंदी चित्रपटात मराठी कलाकारांना दुय्यम वागणूक दिली जाते पण त्यांच्याबाबतीत असं नव्हतं. त्यांचं काम बोलायचं. खुप वाईट वाटतंय ते गेल्याचं.'

महत्वाचे लेख