मुंबई : दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला आरआरआर हा चित्रपट अखेर प्रदर्शित झालाय. रौद्रम रणम रुधिरम असं या चित्रपटाचं पूर्ण नाव आहे. 'आरआरआर' प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. चित्रपटात ज्युनिअर एनटीआर, रामचरण, अजय देवगण तसंच आलिया भट्ट यांच्या भूमिका आहेत.
चित्रपटातील सर्वांची कामं प्रेक्षकांना खूपच भावली आहेत. सोशल मीडियावर प्रेक्षकांनी चित्रपटासंबंधित अनेक पोस्ट शेअर करत त्याचं कौतुक केलं आहे. अनेक युझर्सनही हा चित्रपट ब्लॉकबस्टर असल्याचं म्हटलं आहे. परंतु या चित्रपटाबद्दची मोठी बातमी समोर आली आहे. या चित्रपटाद्वारे आलियानं तेलुगूमध्ये पदार्पण केलंय. असं असलं तरी आलिया सध्या राजामौली यांच्यावर नाराज असल्याचं आता समोर आलं आहे.
दिग्दर्शक राजामौली यांनी आलियाला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याची संधी दिली मात्र, आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मात्र आलिया प्रचंड दुखावली गेल्याचं म्हटलं जात आहे. राजामौली यांच्यावर नाराज असल्यानं आलियानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून RRR चित्रपटासंदर्भातील बऱ्याच पोस्ट डिलीट केल्या आहेत. तिच्या अकाऊंटवर केवळ तिच्या लुकसंदर्भातील फोटो पोस्ट आहेत.
आरआरआरच्या पोस्टरवर आलिया दिसत असली तरी प्रत्यक्ष चित्रपटात मात्र ती फार कमी वेळ स्क्रिनवर दिसतेय, हेच कारण आलियाच्या नाराजीचं आहे. याचा राग म्हणून आलियानं राजामौली यांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलंय. त्यामुळं या चर्चेला उधाण आलंय.
देशभरातील पाच हजार स्क्रिनवर आरआरआर चित्रपट प्रदर्शित झालाय.उत्तरेत दोन हजार स्क्रिनवर हा चित्रपट दाखवला जातोय. या चित्रपटानं पहिल्या दिवशी भारतात १९ कोटींची कमाई केली. तर काल दिवसभरात १७ कोटी कमावले आहेत. या चित्रपटाची भारतातील एकूण कमाई ९० कोटींच्या पुढे गेल्याचं समजतं.
चित्रपटातील सर्वांची कामं प्रेक्षकांना खूपच भावली आहेत. सोशल मीडियावर प्रेक्षकांनी चित्रपटासंबंधित अनेक पोस्ट शेअर करत त्याचं कौतुक केलं आहे. अनेक युझर्सनही हा चित्रपट ब्लॉकबस्टर असल्याचं म्हटलं आहे. परंतु या चित्रपटाबद्दची मोठी बातमी समोर आली आहे. या चित्रपटाद्वारे आलियानं तेलुगूमध्ये पदार्पण केलंय. असं असलं तरी आलिया सध्या राजामौली यांच्यावर नाराज असल्याचं आता समोर आलं आहे.
दिग्दर्शक राजामौली यांनी आलियाला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याची संधी दिली मात्र, आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मात्र आलिया प्रचंड दुखावली गेल्याचं म्हटलं जात आहे. राजामौली यांच्यावर नाराज असल्यानं आलियानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून RRR चित्रपटासंदर्भातील बऱ्याच पोस्ट डिलीट केल्या आहेत. तिच्या अकाऊंटवर केवळ तिच्या लुकसंदर्भातील फोटो पोस्ट आहेत.
आरआरआरच्या पोस्टरवर आलिया दिसत असली तरी प्रत्यक्ष चित्रपटात मात्र ती फार कमी वेळ स्क्रिनवर दिसतेय, हेच कारण आलियाच्या नाराजीचं आहे. याचा राग म्हणून आलियानं राजामौली यांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलंय. त्यामुळं या चर्चेला उधाण आलंय.
देशभरातील पाच हजार स्क्रिनवर आरआरआर चित्रपट प्रदर्शित झालाय.उत्तरेत दोन हजार स्क्रिनवर हा चित्रपट दाखवला जातोय. या चित्रपटानं पहिल्या दिवशी भारतात १९ कोटींची कमाई केली. तर काल दिवसभरात १७ कोटी कमावले आहेत. या चित्रपटाची भारतातील एकूण कमाई ९० कोटींच्या पुढे गेल्याचं समजतं.