अ‍ॅपशहर

नागा चैतन्यपासून विभक्त होण्याची पोस्ट केली डिलीट, सामंथाचे चाहेत गोंधळले

गेल्या वर्षी सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य विभक्त होतं असल्याची बातमी त्यांनी एक पोस्ट शेअर करत दिली होती. मात्र आता सामंथाने ही पोस्ट हटवली आहे ज्यामुळे चाहते गोंधळात पडले आहेत.

guest Arpita-Deo | Lipi 21 Jan 2022, 5:16 pm
मुंबई- साउथ इंडस्ट्रीमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणचे सामंथा रुथ प्रभु आणि नागा चैतन्य होती. मात्र आता ते विभक्त झाले आहेत. सामंथा आणि नागा चैतन्या विभक्त होणार असल्याच्या चर्चा खूप आधीपासून सुरू होत्या. नंतर दोघांनी एक पोस्ट शेअर करत ते घटस्फोट घेतं असल्याची बातमी ऑक्टोबर २०२१ला पोस्ट शेअर करत सांगितली होती. मात्र आता सामंथाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरची पोस्ट हटवल्यावर सगळेच हैराण झाले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम samantha deletes her divorce announcement post from instagram here is the reason
नागा चैतन्यपासून विभक्त होण्याची पोस्ट केली डिलीट, सामंथाचे चाहेत गोंधळले


घटस्फोटाचे विधान हटवले
सामंथाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घटस्फोटाची माहिती देणारे स्टेटमेंट हटवलं आहे. यामुळे अनेक नवीन प्रश्न तयार झाले. चाहत्यांना वाटलं की त्याच्यातील वाद मिटला असेल मात्र मीडिया रिपोर्टसनुसार, सामंथा तिचं इन्स्टाग्राम अकाउंट साफ करत होती, त्यावेळी ही पोस्ट तिच्याकडून डिलीट झाली असेल. तसंच ते दोघं पुन्हा कधीच एकत्र येणार नाहीत, असंही या रिपोर्टसमध्ये सांगितलं आहे.

View this post on Instagram A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)


दरम्यान सामंथा सध्या स्विजरलैंडमध्ये सुट्ट्या एंजॉय करत आहे. सुट्टी दारम्यानचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिने बर्फात स्की करतानाचा एक फोटो शेअर केलेल्या फोटोला खूप पसंती मिळत आहे. या फोटोवर चाहते कमेंट करत तिच कौतूक करत आहे, आतापर्यंत ११ लाखा हून अधिक लोकांनी लाइक केलं आहे.

नागा चैतन्यने तोडलं मौन
घटस्फोटाची बातमी दिल्यानंतर नागा चैतन्यन याबाबत काहीही बोलला नव्हता. मात्र काही काळापूर्वी त्याने यावर भाष्य केलं होतं. नागा त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सांगितलं होतं की, 'ती (सामंथा)खुश असेल तर मीही खुश आहे आणि अशा परिस्थितीत घटस्फोट योग्य आहे.'

आगामी चित्रपट
कामा बाबत बोलायचं झालं तर, सामंथा सध्या तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. अलीकडेच ती अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' या चित्रपटात आयटम साँग केलं आहे. या चित्रपतील 'oo anvatva' हे गाण्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली. या गाण्यासाठी सामंथाचे खूप कौतुक होत आहे. तर नागा चैतन्य बाबत बोलायचं झालं तर 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज