अ‍ॅपशहर

'लगे रहो मुन्नाभाई'... संजय दत्त करतोय गरजूंना अन्नदान

करोनामुळे उद्धभवलेल्या परिस्थितीत गेले काही दिवस संजय दत्त गरजू लोकांच्या जेवणाची व्यवस्था करत आहे. मुंबईत सावरकर शेल्टर्स सहकार्याने संजय दत्त हे काम करत आहे. हजारो कुटुंबांना यामुळे आतापर्यंत मदत झालीये.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Apr 2020, 11:57 am
सध्याच्या परिस्थितीत हातावरचं पोट असणाऱ्या लोकांना एक वेळेच्या जेवणासाठीसुद्धा संघर्ष करावा लागतोय. अशा लोकांना मदत करण्यासाठी अनेक कलाकारांनी पुढाकार घेतलाय. आता मुन्नाभाई अर्थात अभिनेता संजय दत्तनंही मदतीचा हात पुढे केलाय. सांगण्यात येतंय की, सावरकर शेल्टर्स या सेवाभावी संस्थेच्या मदतीने संजय दत्तने १००० कुटुंबांच्या जेवणाची व्यवस्था केलीये. सध्या संपूर्ण देशामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या समस्या भेडसावत आहेत, त्यातील सर्वात मोठी समस्या आहे ती गोरगरीबांसाठी दोन वेळच्या जेवणाची. संजय दत्तने सांगितलं की, "हा संपूर्ण देशासाठी संकटाचा काळ आहे. प्रत्येकजण एकमेकांना काहीना काही मदत करायला हवी, मग अगदी घरीच राहून सोशल डिस्टसिंगचं पालन करणं का असेना. माझ्यापरिने जास्तीत जास्त लोकांना शक्य तितकी मदत करण्याचा मी प्रयत्न करतोय."
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sanjay-dutt

समाजसेवेत कायम पुढाकार घेणाऱ्या संजय दत्तने सावरकर शेल्टर्सच्या माध्यमातून मुंबईतील बोरिवली, वांद्रे या भागातील गरजू लोकांच्या जेवणाची सोय केलीये. याबद्दल संजय दत्त म्हणाला, "सावरकर शेल्टर्स चांगले काम करत आहेत. त्यांनी खूप मेहनत घेतलीये आणि त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आशा आहे, यावेळी आपण एकमेकांना मदत करून लवकरच या कठीण काळातून बाहेर येऊ"
तर सावरकर शेल्टर्सचे अध्यक्ष रूपेश सावरकर म्हणाले की, "करोना विरुद्धच्या लढाईत लोक एकत्र येत आहेत. गरजू लोकांना मदत करण्यासाठी एक उत्तम उपक्रम संजय दत्त यांनी हाती घेतलाय. हा प्रयत्न इतरांना प्रेरणा देणारा आहे."
अशाप्रकारे करोनाविरुद्धच्या लढाईत प्रत्येक कलाकार मोलाच वाटा उचलताना आणि दुसऱ्यांना प्रोत्साहन देताना दिसतोय.

शाहरुखचा २५ हजार वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी मदतीचा हात

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज