अ‍ॅपशहर

अठरा वर्षाची होण्यापूर्वीच सायली संजीवने केलाय राजकीय पक्षात प्रवेश; म्हणाली- मला समाजात...

Sayali Sanjeev In Politics आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं करणारी लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव हिने एका मुलाखतीत आपण कधीच राजकीय पक्षात प्रवेश केला असल्याचं म्हटलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Mar 2023, 9:32 am
मुंबई- आपल्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांना आपलंसं करणारी अभिनेत्री सायली संजीव प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. तिने आपल्या सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. तिच्या फॉलोवर्सची संख्या प्रचंड आहे. प्रत्येक भूमिकेतून सायलीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सायली सोशल मीडियावरही सक्रिय असते. मात्र अभिनय ही सायलीची पहिली पसंती नव्हती. तिला एका वेगळ्याच गोष्टीत रस आहे. सायलीला राजकारणाची प्रचंड आवड आहे. तिला जनतेसाठी काहीतरी करायची इच्छा आहे, समाजात वेगळं काहीतरी घडवून आणण्याची इच्छा आहे. त्यासाठी ती प्रयत्नशीलही आहे. एका मुलाखतीत तिने याबद्दल सांगितलं होतं. अठरा वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच आपण एका राजकीय पक्षात प्रवेश केल्याचं तिने सांगितलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sayali sanjeev



'हर हर महादेव' या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळेस सायलीने एका वेबसाइटला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत बोलताना सायलीने याबद्दल सांगितलं होतं. तुला राजकारणात रस आहे का असं विचारल्यावर सायली म्हणाली, 'मला आठवतंय मी अठरा वर्षाची होणार तेव्हा आपलं पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, हे सगळं काढायच्या आधी मी एका पक्षात प्रवेश घेतला. राजकारणात प्रवेश केला. त्याचं कारण असं आहे की नेते उभे राहतात आपण त्यांना निवडून देतो, मग ते मंत्री होतात आणि मग आपण त्यांना नावही ठेवतो की कशी आमची कामं केली नाहीत. तर मला कायम असं वाटतं की इतरांना नावं ठेवण्यापूर्वी आपण का नाही करत हे. आपण करून बघूया हे आधी. मला असं वाटतं की ती माझी हर हर महादेवची गर्जना होती की सतत इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा, त्यांना नावं ठेवण्यापेक्षा या समाजात आपण काही बदल करू शकतोय का हे पाहायला हवं.'

View this post on Instagram A post shared by सायली संजीव (@sayali_sanjeev_official)

पुढे सायली म्हणाली, 'अर्थातच मी राजकारण हा विषय निवडला कारण मी त्याच्यात शिक्षण घेतेय आणि मी सध्या एम ए इन पॉलिटिकल सायन्सपण करतेय. ती माझी सतत आतमध्ये असलेली गर्जना आहे. आहेच जोपर्यंत मी समाजात काही बदल घडवत नाही तो पर्यंत ती चालू राहणार.' सायलीच्या या हिंमतीची अनेकांनी दाद दिली आहे. तिचे विचार ऐकून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे.
ठरलं तर मग: रात्री नेमकं काय घडलं? अर्जुनला त्या अवस्थेत पाहून सायलीचा होणार गैरसमज

महत्वाचे लेख