अ‍ॅपशहर

एक विधान नेहरुंवर तर दुसरी महिलांवर, दोन वादग्रस्त विधानांमुळे मुकेश खन्ना आलेले अडचणीत

शक्तिमान आणि महाभारत या दोन मालिकांमुळे लोकप्रिय झालेले ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांचा एक चाहता वर्ग आहे. या दोन मालिकांचा विषय निघतो तेव्हा मुकेश खन्ना यांच्या अभिनयाचं कौतुक होतं. पण याच मुकेश खन्ना यांच्या आयुष्यात त्यांनी केलेल्या दोन विधानांमुळे वाद निर्माण झाला होता. असं काय बोलले होते मुकेश खन्ना?

guest Anuradha-Kadam | Lipi 25 Jun 2022, 3:45 pm
मुंबई- आज मुलांच्या हातात स्मार्ट फोन आहेत आणि सुपरहिरोंवर बेतलेले हजारो व्हिडिओ त्यांना एका क्लिकवर बघता येतात. पण ९० च्या दशकात फक्त लहान मुलच नव्हे तर मोठ्यांचंही मनोरंजन करणाऱ्या शक्तिमान या व्यक्तिरेखेला खूप प्रसिद्धी मिळाली होती. शक्तिमानची खूपच क्रेझ त्या काळात होती. शक्तिमान हे पात्र वठवणाऱ्या अभिनेते मुकेश खन्ना यांना या मालिकेने लोकप्रियता मिळवून दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shaktiman mukesh khanna talk on pandit nehru and mee too
एक विधान नेहरुंवर तर दुसरी महिलांवर, दोन वादग्रस्त विधानांमुळे मुकेश खन्ना आलेले अडचणीत


संजय राऊतच खरे गुलाम, शिवसेनेला तोडलं, एका वक्तव्यावर भडकले निर्माते

प्रेक्षकांच्या मनात विशेषत: बच्चे कंपनीच्या आयुष्यात मुकेश यांनी खास जागा मिळवली. तर महाभारत या मालिकेतील पितामह भीष्म ही भूमिकाही मुकेश यांनी त्यांच्या अभिनयाने गाजवली. छोट्या पडद्यावर या दोन भूमिकांमुळे घराघरात पोहोचलेले अभिनेते मुकेश खन्ना त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळेही चर्चेत असतात. शक्तिमान आणि पितामह भीष्म या भूमिकांनी मुकेश यांचं आयुष्य बदलून गेलं हे खर आहेच पण त्यांनी आयुष्यात दोन अशी काही विधानं केली की त्यामुळे त्यांना वादग्रस्त परिस्थितीलाही तोंड द्यावं लागलं होतं.

View this post on Instagram A post shared by Mukesh Khanna (@iammukeshkhanna)

९० च्या दशकातील पिढीला शक्तिमान माहिती नाही असं होणारच नाही. या मालिकेने मुकेश यांना ग्लॅमर दिलं. शक्तिमान या भूमिकेत त्यावेळची शालेय मुलं त्यांच्या मनातील सुपरहिरो पाहत होती. शक्तिमानच्या ड्रेसपासून त्याचे डायलॉग तुफान लोकप्रिय झाले होते. पितामह भीष्म या भूमिकेतूनही मुकेश यांच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना अनुभवली. कलाकारांची फौज असलेल्या महाभारत या मालिकेतील भीष्म ही भूमिका आजही मुकेश यांच्या अभिनयामुळे लक्षात राहते. या दोन व्यक्तीरेखांमुळे मुकेश चर्चेत राहिलेच, त्यांच्या काही वादग्रस्त मतामुळे ते अडचणीतही आले होते.

View this post on Instagram A post shared by Mukesh Khanna (@iammukeshkhanna)

कलाकार कधी कधी असं काही बोलून जातात की त्यामुळे वाद निर्माण होतो. असंच काहीसं मुकेश यांच्याही बाबतीत झालं. देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबतच वादग्रस्त विधान करत मुकेश अडचणीत आले होते. २०२१ च्या प्रजासत्ताकदिनी ते म्हणाले होते की, 'भारत हा लोकशाही असलेला देश आहे हे खरं असलं तरी महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांनी मनमानी केली. जर त्यांनी वल्लभभाई पटेल यांना पहिलं पंतप्रधान केलं असतं तर आज देशाची स्थिती चांगली असती.' ते असंही म्हणाले होते की 'भगतिसंग यांना गांधी वाचवू शकले असते. चंद्रशेखर आझाद यांनाही संरक्षण मिळालं असतं पण तसं झालं नाही कारण यामागे काहीतरी रहस्यमय गोष्टी घडल्या आहेत. पंडित नेहरू यांना पंतप्रधानपद ही देशातील मोठी चूक होती.' असंही विधान मुकेश यांनी केलं होतं.

View this post on Instagram A post shared by Mukesh Khanna (@iammukeshkhanna)

देशाच्या पहिल्या पंतप्रधानांबाबत प्रजासत्ताक दिनीच केलेल्या या विधानामुळे मुकेश यांच्यावर खूप टीका झाली. तर एका मुलाखतीत मुकेश यांनी महिलांच्याबाबतीतही वादग्रस्त मत व्यक्त केल्याने ते वादात अडकले होते. त्यांनी असं मत व्यक्त केलं होतं की, 'आज महिला पुरुषांची बरोबरी करण्याचा विनाकारण आग्रह धरत आहेत. मी टू अभियान यामुळेच सुरू झालं. महिलांनी नोकरी, व्यवसायात पाऊल टाकल्यामुळेच समस्या निर्माण झाल्या असून महिलांनी घरकाम करावं आणि पुरुषांनी नोकरी व्यवसाय करावा हेच योग्य आहे.' या विधानामुळे मुकेश यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं.

'मोठ्या भावासारखे शिंदेसाहेब...', शरद पोंक्षेंच्या पोस्टने वेधलं सर्वांचं लक्ष

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज