अ‍ॅपशहर

केतकी चितळे प्रकरणावर शरद पोंक्षे म्हणाले, 'काहीही झालं तरी पातळी सोडू नये'

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे तिला अटक झाली आहे. याप्रकरणी आता ज्येष्ठ अभिनेता शरद पोंक्षे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

guest Amita-Bade | Lipi 20 May 2022, 1:03 pm

हायलाइट्स:

  • केतकी चितळेप्रकरणी शरद पोंक्षेंनी व्यक्त केलं मत
  • टीका करताना मर्यादा सोडू नये
  • केतकीला चूक सुधारण्याची संधी द्यायला हवी
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
मुंबई- अभिनेत्री केतकी चितळे नं फेसबुकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची बदनामीकारक आणि मानहानी करणारी पोस्ट शेअर केली होती. तसंच, संत तुकाराम महाराज यांच्या नावाचा उल्लेख करून बदनामी केली होती. याचे संतप्त पडसाद राज्यभरात उमटले. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनीदेखील याचा निषेध केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून राज्यात अनेक ठिकाणी केतकीवर गुन्हे दाखल झाले आहेत. केतकीला सध्या १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली.
केतकी चितळेला अॅट्रॉसिटी प्रकरणात ५ दिवसांची पोलीस कोठडी

काय म्हणाले शरद पोंक्षे

ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे हे कायम चालू घडामोडींवर त्यांचं मत व्यक्त करत असतात. आता देखील केतकीच्या प्रकरणावर त्यांनी मत व्यक्त केलं. शरद पोंक्षे म्हणाले, 'फेसबुकवर केतकीची पोस्ट मी वाचली. मला वाटतं की तिनं कुणाची तरी पोस्ट रिशेअर केली आहे. परंतु तरीही तिनं जे काही केलं, ते अत्यंत दुर्दैवी आणि निराशाजनकच आहे. आपल्या सर्वांना मत मांडण्यांचा अधिकार आहे. परंतु आपण आपली मर्यादा सांभाळायला हवी.'

शरद पोंक्षे पुढं म्हणाले की, 'आपण सोशल मीडियावर काय शेअर करतो ते माहिती असलं पाहिजे. याप्रकरणाबद्दल बोलायचं तर ती अजूनही लहान मुलगी आहे. त्यामुळे तिला सुधारण्याची एक संधी मिळायला हवी असं मला वाटतं. तिच्याकडून जी काही चूक झाली आहे, त्याची तिला जाणीव झाली असावी. याप्रकरणावरून राजकारण होऊ नये आणि त्यावरून कोणताही इश्यू केला जाऊ नये,' असं मत पोंक्षे यांनी व्यक्त केलं.

हॉलिवूड अभिनेत्रीलाही लाजवेल असं आहे आराध्यचं इंग्रजी, Video Viral

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल पोंक्षे यांनी सांगितलं की, 'सावरकरांच्या विचारधारेवर आक्षेप घेणाऱ्या, त्यांच्यावर टीका करणाऱ्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअऱ केल्या जातात. त्यांवर मी स्वतः कॉमेन्ट करतो. परंतु मत मांडत असताना अथवा कुणाचेही विचार शेअर करत असताना मी मर्यादा, पातळी सोडत नाही.' याप्रकरणी केतकीनं काही फार मोठा गुन्हा केलेला नाही. त्यामुळे तिला चूक सुधारण्याची एकसंधी सरकारनं द्यावी, असं मत पोंक्षे यांनी व्यक्त केलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज