मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या चित्रपटाची इतकी चर्चा होती, तो चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला आणि अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिका असलेला 'झुंड' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'झुंड' पाहून अनेकांनी भावुक प्रतिक्रिया दिल्याचंही समोर आलं. समीक्षकांनी देखील चित्रपटाचं प्रचंड कौतुक केलं आहे. मात्र प्रत्येक नाण्याच्या दोन बाजून असतात, तसं कौतुक आहे तिथं टीका देखील होणार. अनेकांनी या चित्रपटाबद्दल काहीशी वेगळी प्रतिक्रिया दिली आहे.
झुंड चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्यांदाच नकारात्मक आणि जातीय दृष्टीकोणातून चित्रपटावर टीका करण्यात आली आहे. प्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य यांनी त्याच्या फेसबुकवर याबद्दल काही मोजक्या शब्दांत एक पोस्ट शेअर केलीए. 'इतका राग होता ‘उच्चवर्णिय प्रस्थापितांवर’ तर मग मुख्य भूमिकेत अमिताभ कशाला?, अश्या शब्दांत त्यांनी झुंड आणि नागराज मंजुळेंवर टीका केलीए.
शेफाली वैद्य यांच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे. तर नागराज आणि झुंडच्या टीमची बाजूनं विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'चित्रपटात कोणाला घ्यायचं, कोणाला नाही, हा दिग्दर्शकाचा प्रश्न आहे. त्यांनाच ते ठरवू द्या..असं एकानं म्हटलय. अनेकांनी हा चित्रपट चांगल्या उद्देशानं बनवला असून जातीय रंग देणं योग्य ठरणार नाही, अशा प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
दरम्यान, झुंडचं कौतुक करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसून येत आहे. सुपरस्टार आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं चित्रपट पाहिल्यानंतर भावुक प्रतिक्रिया दिली आहे. , 'चित्रपटात आपल्या देशातील तरुणांची सळसळती, जादुई, चमकदार, तेजस्वी ऊर्जा सुंदरपणे टिपलेली आहे. बच्चन साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत उत्तम चित्रपट केलेलं आहे. पण हा त्यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. हॅट्स ऑफ टू नागराज, हा चित्रपट शेवटी त्याचा आहे! इतका सुंदर चित्रपट बनवल्याबद्दल मी नागराज, भूषण, मिस्टर बच्चन, द झुंड आणि संपूर्ण टीमचे आभार मानतो. जेव्हा मी 'झुंड' सारखे चित्रपट पाहतो तेव्हा मला मी भारतीय चित्रपट उद्योगजगताचा एक भाग असल्याचा अभिमान वाटतो.’असं आमिरनं म्हटलं आहे.
झुंड चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्यांदाच नकारात्मक आणि जातीय दृष्टीकोणातून चित्रपटावर टीका करण्यात आली आहे. प्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य यांनी त्याच्या फेसबुकवर याबद्दल काही मोजक्या शब्दांत एक पोस्ट शेअर केलीए. 'इतका राग होता ‘उच्चवर्णिय प्रस्थापितांवर’ तर मग मुख्य भूमिकेत अमिताभ कशाला?, अश्या शब्दांत त्यांनी झुंड आणि नागराज मंजुळेंवर टीका केलीए.
शेफाली वैद्य यांच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे. तर नागराज आणि झुंडच्या टीमची बाजूनं विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'चित्रपटात कोणाला घ्यायचं, कोणाला नाही, हा दिग्दर्शकाचा प्रश्न आहे. त्यांनाच ते ठरवू द्या..असं एकानं म्हटलय. अनेकांनी हा चित्रपट चांगल्या उद्देशानं बनवला असून जातीय रंग देणं योग्य ठरणार नाही, अशा प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
दरम्यान, झुंडचं कौतुक करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसून येत आहे. सुपरस्टार आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं चित्रपट पाहिल्यानंतर भावुक प्रतिक्रिया दिली आहे. , 'चित्रपटात आपल्या देशातील तरुणांची सळसळती, जादुई, चमकदार, तेजस्वी ऊर्जा सुंदरपणे टिपलेली आहे. बच्चन साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत उत्तम चित्रपट केलेलं आहे. पण हा त्यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. हॅट्स ऑफ टू नागराज, हा चित्रपट शेवटी त्याचा आहे! इतका सुंदर चित्रपट बनवल्याबद्दल मी नागराज, भूषण, मिस्टर बच्चन, द झुंड आणि संपूर्ण टीमचे आभार मानतो. जेव्हा मी 'झुंड' सारखे चित्रपट पाहतो तेव्हा मला मी भारतीय चित्रपट उद्योगजगताचा एक भाग असल्याचा अभिमान वाटतो.’असं आमिरनं म्हटलं आहे.