अ‍ॅपशहर

श्री अधिकारी ब्रदर्स आता पुन्हा विचारणार ‘गलती किसकी’

सुपर कॉप अशी ओळख असलेल्या किरण बेदी यांच्या प्रसिद्ध 'व्हॉट वेन्ट राँग अॅण्ड व्हाय?' या पुस्तकावर आधारित गलती किसकी हा कार्यक्रम काही वर्षापूर्वी तुफान गाजला होता. लॉकडाउनमध्ये दूरदर्शन आणि श्री अधिकारी ब्रदर्सने पूर्नः प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 May 2020, 5:40 pm
मुंबई- सुपर कॉप किरण बेदी लिखित 'व्हॉट वेन्ट राँग अॅण्ड व्हाय?' या पुस्तकावर गलती किसकी मालिका आधारित आहे. एम अण्ड ई समूहातील श्री अधिकारी ब्रदर्स यांनी आणखी एक क्लासिक हिट शो 'गलती किसकी' हा शो पुन्ह प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा शो सुपर कॉप आणि पुदुचेरीचे विद्यमान लेफ्टनंट गव्हर्नर - किरण बेदी लिखित 'व्हॉट वेन्ट राँग अॅण्ड व्हाय?' या पुस्तकावर आधारित आहे. हा कार्यक्रम राष्ट्रीय दूरदर्शन वर दररोज १ वाजता प्रसारित होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम श्री अधिकारी ब्रदर्स आता पुन्हा विचारणार ‘गलती किसकी’
सुपर कॉप अशी ओळख असलेल्या किरण बेदी यांच्या प्रसिद्ध 'व्हॉट वेन्ट राँग अॅण्ड व्हाय?' या पुस्तकावर आधारित गलती किसकी हा कार्यक्रम काही वर्षापूर्वी तुफान गाजला होता. लॉकडाउनमध्ये दूरदर्शन आणि श्री अधिकारी ब्रदर्सने पूर्नः प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेतला आहे.


बुर्ज खलीफामध्येही आहे सुपरस्टार मोहनलाल यांचं घर, जाणून घ्या त्यांच्या प्रॉपर्टीबद्दल

'गलती किसकी’ हा शो वास्तविक जीवनावर आधारित आहे. वास्तविक जीवनातील प्रथमदर्शनी अनुभवांचे एक अनोखं संकलन यात दाखवण्यात आलं आहे. हा शो प्रेक्षकांना लोकांना घरी बसून दखल घेण्यास भाग पाडतो. सामाजिक आणि आर्थिक गैरसोयींमध्येही एखादी परिस्थिती किंवा प्रसंग कशा पद्धतीने हाताळता येऊ शकते याचं उत्तम उदाहरण या मालिकेत पाहायला मिळेल. हा शो अशा अनेक घटना सांगणारा आहे.


हा शो पुन्हा एकदा दाखवताना मार्कंड अधिकारी म्हणाले की, 'दूरदर्शनवर गलती किस्की मालिका पुनः प्रक्षेपित करण्याचा आम्हाला आनंदच आहे. लॉकडाउनच्या काळात प्रेक्षकांना घरी गुंतवून ठेवण्यात या शोची मदत होईल यात काही शंका नाही. तसेच लोकांचं मनोरंजन करण्यासाठी जे शक्य असेल ते सर्व आम्ही करू.'

लोककलावंत छगन चौगुले यांचं निधन


किरण बेदी म्हणाल्या की, 'आयपीएस अधिकारी असताना, वेगवेगळ्या टप्प्यात मी लोकांमध्ये होत असलेले भेदभाव पाहिले. हे पुस्तक निष्पक्षपणे लिहिण्याचा प्रयत्न केला. 'गलती किसकी' या शोमार्फत माझं ध्येय हे भविष्यात होणारे बळी वाचवणं एवढंच होतं. प्रसिद्धी किंवा लोकप्रियतेसाठी कधीच नव्हतं. लॉकडाउननंतर आत्मपरीक्षण आणि आयुष्याचा पुर्नःविचार करून एक चांगला समाज तयार करण्याची संधी प्रत्येकालाच आहे.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज