मुंबई- अभिनेत्री श्वेता तिवारीचा एक्स पती अभिनव कोहली सध्या तिच्या आणि तिच्या मुलीच्या हात धुवून पाठी लागला आहे. गेल्यावर्षी श्वेता आणि तिची मुलगी पलकने अभिनववर घरगुती हिंसाचार केल्याचा आरोप केला होता. आता अभिनव तो निर्दोष असल्याचं सिद्ध करत आहेत. हे सर्व तेव्हा सुरू झालं जेव्हा श्वेता तिचा सहकलाकार फहमान खानला भेटली. या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ अभिनवने सोशल मीडियावर शेअर केले. यानंतर अभिनवला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. त्याच्यावर श्वेतावर नजर ठेवण्याचा आरोप करण्यात आला.
यानंतर अभिनवने श्वेता आणि पलकशी संबंधी इन्स्टाग्रामवर पोस्ट करायला सुरुवात केली. घरगुती हिंसाचाराचा आरोप करताना पलकने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. अभिनवच्यामते पलकने ती पोस्ट टाइमलाइनमधून डिलीट केली होती. पण आता परत तिने ही पोस्ट टाइमलाइनवर ठेवली आहे. यासंबंधीचे अनेक स्क्रीनशॉट त्याने शेअर केले.
अनेक युझर्सने अभिनवला यासंबंधी खडे बोल सुनावले. हे सगळं करून अभिनवला सिद्ध काय करायचं आहे असा प्रश्न युझर्सने त्याला विचारला. तसेच अनेक लोक त्याच्या हेतूवरही प्रश्न उपस्थित करत आहेत. नेटकऱ्यांच्यामते, अभिनवला स्वतःचा आत्मसन्मान जपला पाहिजे आणि अशा पद्धतीने तो वाया घालवू नये.
इथून सुरू झालं संपूर्ण प्रकरण-
गेल्यावर्षी श्वेता तिवारीने पतीविरोधात पोलीस तक्रार केली होती. श्वेताने अभिनववर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. श्वेता आणि तिची मुलगी पलकला अभिनव मारत असल्याचे आरोप त्यांनी केले होते.
पलकने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटलं होतं की, 'मीडियाकडे कोणतेही पक्के पुरावे नाहीयेत आणि कधी मिळणारही नाहीत. माझी आई नाही तर मी अनेकदा घरगुती हिंसाचाराची बळी ठरले आहे. ज्या दिवशी तक्रार नोंदवली तो दिवस सोडला तर त्याने कधीही माझ्या आईला मारलं नाही.'
यानंतर अभिनवने श्वेता आणि पलकशी संबंधी इन्स्टाग्रामवर पोस्ट करायला सुरुवात केली. घरगुती हिंसाचाराचा आरोप करताना पलकने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. अभिनवच्यामते पलकने ती पोस्ट टाइमलाइनमधून डिलीट केली होती. पण आता परत तिने ही पोस्ट टाइमलाइनवर ठेवली आहे. यासंबंधीचे अनेक स्क्रीनशॉट त्याने शेअर केले.
अनेक युझर्सने अभिनवला यासंबंधी खडे बोल सुनावले. हे सगळं करून अभिनवला सिद्ध काय करायचं आहे असा प्रश्न युझर्सने त्याला विचारला. तसेच अनेक लोक त्याच्या हेतूवरही प्रश्न उपस्थित करत आहेत. नेटकऱ्यांच्यामते, अभिनवला स्वतःचा आत्मसन्मान जपला पाहिजे आणि अशा पद्धतीने तो वाया घालवू नये.
इथून सुरू झालं संपूर्ण प्रकरण-
गेल्यावर्षी श्वेता तिवारीने पतीविरोधात पोलीस तक्रार केली होती. श्वेताने अभिनववर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. श्वेता आणि तिची मुलगी पलकला अभिनव मारत असल्याचे आरोप त्यांनी केले होते.
पलकने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटलं होतं की, 'मीडियाकडे कोणतेही पक्के पुरावे नाहीयेत आणि कधी मिळणारही नाहीत. माझी आई नाही तर मी अनेकदा घरगुती हिंसाचाराची बळी ठरले आहे. ज्या दिवशी तक्रार नोंदवली तो दिवस सोडला तर त्याने कधीही माझ्या आईला मारलं नाही.'