अ‍ॅपशहर

त्यांनी देवघरात ठेवला सोनू सूदचा फोटो, दररोज होते आरती

आज देशभरात सर्वात जास्त चर्चा कोणत्या व्यक्तीची होत असेल तर ती म्हणजे अभिनेता सोनू सूदचीच. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत सारेच सोनूच्या नावाचा जप करत आहेत. त्याच्या कामाचं भरभरून कौतुक केलं जात आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Jun 2020, 3:14 pm
मुंबई- सोनू सूदच्या ट्वीटर अकाउंटवर नजर टाकली तर तुम्हाला अनेक मजेशीर ट्वीट दिसतील. विशेष म्हणजे अनेकांना सोनू स्वतः उत्तरही देतो. सोनूच्या ट्विटरवर एका व्यक्तीने त्याच्या घरातील देव्हाऱ्याचा व्हिडिओ शेअर केला. तो व्हिडिओ पाहून अभिनेत्याने असं न करण्याचा सल्ला दिला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम त्यांनी देवघरात ठेवला सोनू सूदचा फोटो, दररोज होते आरती


एका व्यक्तीने देवाची आरती करतानाचा व्हिडिओ शेअर केला. यात त्याने देव्हाऱ्यात देवांच्या प्रतिमेसोबत सोनूचा फोटोही ठेवला होता. या व्हिडिओला ट्वीट करत त्याने लिहिले की, 'जी व्यक्ती आईची भेट घालवून देते ती देव असते. सोनू सूदसारखा प्रत्येक व्यक्ती देव नसतो. मी तुम्हाला देवच मानतो. तुम्ही माझी स्वप्न मरू दिली नाहीत आणि माझी आईशी भेट घालून दिली.'


नागपुरात कटिंग चहा घेत खुललं सोनू आणि सोनालीचं प्रेम

सोनूने या ट्वीटला उत्तर देताना म्हटलं की, 'अरे भावा असं नको करू. आईला सांग माझ्यासाठीही दररोज प्रार्थना कर. सगळं काही ठीक होईल.' दुसऱ्या एका व्यक्तीने सोनूसाठी गाणं रेकॉर्ड करून पाठवलं आणि लिहिलं की, 'माझं गाणं कधी ऐकणार दादा?' यावर उत्तर देताना सोनूने लिहिले की, 'मस्तच! लवकरच भेटून गाणं ऐकीन. तुझ्यात खरचं टॅलेन्ट आहे.'



दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिनेता सोनू सूद यानं आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. स्थलांतरित लोकांना त्यांच्या मूळ राज्यात पोहचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची सूद यांनी राज्यपालांना माहिती दिली. दोन दिवसांपूर्वी राज्यपालांनी फोन करून कौतुक केलं होतं.

मराठी अभिनेत्रीला लागलं कठीण आसनाचं व्यसन!



राज्यपालांनी सोनूला फोन केल्यानंतर त्याच्या ट्विटरवर यासंदर्भात ट्विट करण्यात आलं होतं.राज्यपपाल कोश्यारी यांच्या ट्विटला उत्तर देताना सोनूनं त्यांचे आभार मानत तुम्ही केलेल्या कौतुकामुळं काम करण्यासाठी आणखी प्रेरणा मिळाली असल्याचंही त्यानं म्हटलं होतं.
आगीतून फोफाट्यात! चित्रीकरणाला परवानगी पण कडक आहेत नियम

सोनू करत असलेल्या कामाचं सर्वांनीच कौतुक केलं आहे. मजूरांच्या प्रवासारावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात वाद सुरू असले तरी राजकीय नेत्यांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी त्याला 'नायक'म्हटलं आहे. तर भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी देखील त्याला सलाम ठोकला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज