अ‍ॅपशहर

ड्रग्ज केस - वाढू शकतात रिया चक्रवर्तीच्या अडचणी, अभिनेत्रीविरोधात समोर आले दोन साक्षीदार!

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या पुण्यतिथीला काही दिवस बाकी असताना आता या प्रकरणात नव्याने गोष्टी समोर येत आहेत. सुशांतची प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या संकटात वाढ होणार असे दिसते.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Jun 2021, 12:22 pm
मुंबई- दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतला जाऊन आता एक वर्ष होणार आहे. अजूनही त्याच्या मृत्यूच्या खटल्याची चौकशी सुरू आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून अनेक नवीन गोष्टी समोर येत आहेत. अभिनेत्याचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानीला एनसीबीने (नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो) अटक केली. यानंतर सोमवारी ३१ मे रोजी सुशांतच्या घरी काम करणारा स्वयंपाकी नीरज आणि सहाय्यक केशव यांचीही पुन्हा चौकशी करण्यात आली. आता अशी माहिती पुढे येत आहे की, अमली पदार्थांसंबंधित प्रकरणात नीरज आणि केशव हे साक्षीदार झाले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम रिया चक्रवर्ती


ड्रग्ज केस- NCB नोकर केशव आणि नीरज यांची केली चौकशी, रात्रभर विचारले प्रश्न
एनसीबीने सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांच्यासह ३५ जणांविरोधात चौकशीचे समन्स बजावले होते. आता एनसीबी अधिकाऱ्यांनी केशव आणि नीरज दोघांचेही जबाब नोंदवले आहेत. गेल्या वर्षी १४ जून रोजी वांद्रे येथील सुशांतच्या मृत्यूवेळी हे दोघंही घरात उपस्थित होते.

सिद्धार्थ, केशव आणि नीरज १४ जूनला घरी होते

सिद्धार्थ पिठानी, केशव आणि नीरज हे तिघेही १४ जून २०२० रोजी सुशांतच्या घरी होते. याचदिवशी अभिनेत्याने राहत्या घरी बेडरूममध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. खोलीची चावी मिळत नसल्यामुळे सिद्धार्थने चावी बनवणाऱ्यालाच फक्त संपर्क केला नाही तर त्याने पंख्यावरून मृतदेह खाली उतरवून पलंगावर ठेवला होता. सुशांतची बहीण मितू सिंगलाही सिद्धार्थनेच पहिला फोन केला होता.

कोण आहे सिद्धार्थ पिठानी, सुशांत केसशी काय संबंध आणि NCB ने का केली अटक; जाणून घ्या सगळं
सुशांतच्या घरच्यांनी केले गंभीर आरोप

१४ जून २०२० रोजी सुशांतसिंह राजपूत त्याच्या मुंबईस्थित घरात मृतावस्थेत आढळला होता. अभिनेत्याच्या वडिलांनी सुशांतची प्रेयसी आणि अभिनेत्री रियावर त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले आणि त्याचे पैसे हडप केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. या प्रकरणात अमली पदार्थांचं प्रकरण समोर आल्यानंतर एनसीबीनेही तपास सुरू केला. गेल्या वर्षभरात एनसीबीच्या मुंबई विभागाने या प्रकरणात ३० हून अधिक जणांना अटक केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज