अ‍ॅपशहर

सुशांतसिंह राजपूतच्या आठवणीत रडल्या उषा नाडकर्णी

सुशांतसिंह राजपूतने त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही बातमी जेव्हा ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना कळली तेव्हा काहीक्षणासाठी त्यांना ही बातमी खोटी असल्याचे वाटले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jun 2020, 1:26 pm
मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या निधनाची बातमी जेव्हा सर्वत्र पसरली तेव्हा ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना मोठा धक्का बसला. सुरुवातीला त्यांना या बातमीवर विश्वास बसला नाही. मात्र थोड्यावेळाने बातमी खरी असल्याचे कळताच त्यांचे हात-पाय थरथरू लागले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम सुशांतसिंह राजपूतच्या आठवणीत रडल्या उषा नाडकर्णी


'माझ्या हेअरड्रेसरने मला फोन करून सुशांतने आत्महत्या केल्याचं सांगितलं. मला सुरुवातीला खरं वाटलं नाही. मीच तिला ओरडले आणि म्हणाले असं काही बोलू नकोस.' यावर ती म्हणाली आई खरंय ते आपल्याच सुशांतसिंह राजपूतबद्दल बोलत आहेत. तिच्या वाक्यावर मला काय बोलावं सुचलंच नाही. मी थरथर कापू लागले. तो फार चांगला मुलगा होता. आम्ही जवळपास दोन ते अडीच वर्ष एकमेकांसोबत काम केलं.'

सलमानने पोलिसांवर दबाव टाकला, जिया खानच्या आईचे गंभीर आरोप

''पवित्र- रिश्ता'च्या सेटवर तो नेहमीच हसत खेळत रहायचा. पण तो लाजाळूही होता. सेटवर मीच जास्त मस्ती करायचे पण तो नेहमी मान ठेवून वागायचा. एका सीनमध्ये मी माझ्या ऑनस्क्रिन मुलीला सीन कसा करायचा ते सांगत होते तेव्हा तो स्वतः पुढे येऊन म्हणाला की, आई तुला काहीतरी शिकवत आहे. तिच्याकडून शिक. हे २०२० वर्ष फारच वाईट आहे. या वर्षात अनेक चांगले कलाकार आपल्याला सोडून गेले.'

'सेटवर सारेच मला आई हाक मारायचे. सुशांतही मला आईच बोलायचा. पवित्र रिश्ता शो सुरू झाला तेव्हा तो फक्त २३ वर्षांचा होता. आज जेव्हा मी त्याचे फोटो टीव्हीवर पाहते माझं काळीज तुटतं. सुशांतला जे हवं होतं ते त्याने स्वबळावर मिळवलं होतं. चांगले सिनेमे, घर सगळं त्याने कमावलं होतं. पवित्र रिश्ता मालिकेच्या वेळी त्याने सांगितलं होतं की लवकरच तो २ कोटींचं घर घेणार आहे. तसेच भविष्यात त्याला कोणती गाडी घ्यायची आहे याबद्दलही त्याने सांगितलं होतं.'

सुशांतसिंहच्या गॅलरीत मिळाला अत्याधुनिक टेलीस्कोप, शास्त्रज्ञांनी केले मोठे खुलासे

'सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर पोराला काय झालं काय माहीत. सिनेसृष्टीत ३६५ दिवस काम मिळत नाही. मी माझ्या मुलालाही तेच सांगते की काम मिळालं नाही म्हणून नैराश्यात जायचं नाही. जेवढं आपल्या नशिबात आहे तेवढंच आणि त्याचवेळी मिळतं. कोणतीही गोष्ट आधी किंवा नंतर मिळत नाही. त्यावेळी सुशांतसोबत घरातलं वडिलधारं कोणीतरी असायला हवं होतं. त्याचे बाबा किंवा बहिणींपैकी कोणीतरी त्याच्यासोबत राहायला हवं होतं.'

प्रार्थना बेहरेने सांगितलं अंकिताच्या शांत राहण्याचं कारण

उषा नाडकर्णी पुढे म्हणाल्या की, 'सुशांतला दिग्दर्शनातही रुची होती. दिग्दर्शनातले खाचखळगे शिकण्यासाठी त्याने पवित्र- रिश्ता मालिका सोडली होती. सुशांतला वाचनाची तुफान आवड होती. तेव्हा तो त्याचा सर्वाधिक पैसा पुस्तक विकत घेण्यावरच खर्च करायचा. सुशांतच्या वडिलांचं काय होत असेल याचा विचारही करवत नाही. वडिलांना मुलाचे अंत्यसंस्कार करावे लागतात याहून भयावह काहीच नसतं.' या गोष्टीची जाणीव होताच त्या रडू लागल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज