मुंबई: टीव्ही मालिकेत आदर्श सून, लेक, सासू अशा अनेक भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींचं पडद्यापलीकडंच खरं आयुष्य मात्र वेगळं असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. अनेक अभिनेत्रींनी घरगुती हिंसाचार झाल्याचा गौप्यस्फोट केलाय. सध्या हिंदी टीव्ही सृष्टीतील अभिनेत्री सुरभी तिवारी (सुरभि तिवारी) चर्चेत आली आहे.
सुरभी तिवारी हिनं तिच्या नवऱ्यावर गंभीर प्रकारचे आरोप केले आहेत. सुरभी तिवारी हिचा संसार लग्नाच्या दोन वर्षांनंतर आता तुटण्याच्या मार्गावर आहे. दोन वर्षांपूर्वी सुरभीनं पायलट असलेल्या प्रवीण कुमार सिन्हा सोबत लग्न केलं होतं. एका वेबसाइटवरून दोघांची ओळख झाली होती आणि लग्न ठरलं होतं. लग्नानंतर काही तासांतच प्रवीण कुमार सिन्हाचा खरा चेहरा समोर आला, असं सुरभीनं एका मुलाखतीत म्हटलं आहे.
लग्नानंतर काही तासांतच त्यानं आणि त्याच्या कुटुंबियांनी पैशांबद्दल बोलणी सुरू केली. नवीन लग्न झाल्यानंतर घरात कसं वातावरण असतं, तसं तिथं काहीही नव्हतं. मला त्यांनी खोट्या गोष्टी सांगितल्या, माझी फसवणूक केली, असं सुरभीनं पोलिसांना सांगितलं आहे.
लग्नानंतर प्रविण आणि त्याच्या कुटुंबियांनी प्रचंड मानसिक त्रास दिल्याचं सुरभीनं म्हटलं आहे. लग्नापूर्वी मी त्यांना मी सिनेसृष्टीतील करिअर सोडणार नसल्याचं सांगितलं होतं. परंतु लग्नानंतर मात्र त्यांनी मला करिअर सोडण्यासाठी दबाव टाकला. मला आर्थिकदृष्ट्या मी पूर्णपणे प्रविणवर अवलंबून होते. माझ्या खाण्यावर बंधनं आणली. एका पैशा नं पैशाचा हिशोब माझ्याकडं मागितला जायचा, असं सुरभीनं सांगितलं.
माहेरकडून लग्नात दिलेले सोन्याचे दागिने, तसंच चांदीची भांडी देखील प्रविणच्या कुटुंबियांनी परत दिले नसल्याचं सुरभीनं म्हटलं आहे. त्यांचा व्यावसाय वाढावा, आणि स्थानिक राजकारणासाठी प्रविणच्या कुटुंबियांनी तिचा वापर केला,असा आरोपही सुरभीनं केला आहे. यांच्यामुळं माझ्यावर स्वत:'च्या औषधोपचारासाठी माझं सोनं विकण्याची वेळ आहे.
लग्नानंतर मला मुल हवं होतं. सुखी कुटुंब हवं होतं, परंतु प्रविण तयार झाला नाही, असंही सुरभीनं तिचं दु:ख व्यक्त केलं.
सुरभी तिवारी हिनं तिच्या नवऱ्यावर गंभीर प्रकारचे आरोप केले आहेत. सुरभी तिवारी हिचा संसार लग्नाच्या दोन वर्षांनंतर आता तुटण्याच्या मार्गावर आहे. दोन वर्षांपूर्वी सुरभीनं पायलट असलेल्या प्रवीण कुमार सिन्हा सोबत लग्न केलं होतं. एका वेबसाइटवरून दोघांची ओळख झाली होती आणि लग्न ठरलं होतं. लग्नानंतर काही तासांतच प्रवीण कुमार सिन्हाचा खरा चेहरा समोर आला, असं सुरभीनं एका मुलाखतीत म्हटलं आहे.
लग्नानंतर काही तासांतच त्यानं आणि त्याच्या कुटुंबियांनी पैशांबद्दल बोलणी सुरू केली. नवीन लग्न झाल्यानंतर घरात कसं वातावरण असतं, तसं तिथं काहीही नव्हतं. मला त्यांनी खोट्या गोष्टी सांगितल्या, माझी फसवणूक केली, असं सुरभीनं पोलिसांना सांगितलं आहे.
लग्नानंतर प्रविण आणि त्याच्या कुटुंबियांनी प्रचंड मानसिक त्रास दिल्याचं सुरभीनं म्हटलं आहे. लग्नापूर्वी मी त्यांना मी सिनेसृष्टीतील करिअर सोडणार नसल्याचं सांगितलं होतं. परंतु लग्नानंतर मात्र त्यांनी मला करिअर सोडण्यासाठी दबाव टाकला. मला आर्थिकदृष्ट्या मी पूर्णपणे प्रविणवर अवलंबून होते. माझ्या खाण्यावर बंधनं आणली. एका पैशा नं पैशाचा हिशोब माझ्याकडं मागितला जायचा, असं सुरभीनं सांगितलं.
माहेरकडून लग्नात दिलेले सोन्याचे दागिने, तसंच चांदीची भांडी देखील प्रविणच्या कुटुंबियांनी परत दिले नसल्याचं सुरभीनं म्हटलं आहे. त्यांचा व्यावसाय वाढावा, आणि स्थानिक राजकारणासाठी प्रविणच्या कुटुंबियांनी तिचा वापर केला,असा आरोपही सुरभीनं केला आहे. यांच्यामुळं माझ्यावर स्वत:'च्या औषधोपचारासाठी माझं सोनं विकण्याची वेळ आहे.
लग्नानंतर मला मुल हवं होतं. सुखी कुटुंब हवं होतं, परंतु प्रविण तयार झाला नाही, असंही सुरभीनं तिचं दु:ख व्यक्त केलं.