अ‍ॅपशहर

विवेक अग्निहोत्रींचं सईद मिर्झाला सडेतोड उत्तर, द कश्मीर फाइल्सला म्हणालेले कचरा

दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झां यांनी 'द काश्मीर फाईल्स' सिनेमावर टीका करत त्याला कचरा म्हटलं आहे. त्यावर सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी उत्तर दिलं आहे.

guest Amita-Bade | Lipi 21 Dec 2022, 3:36 pm
मुंबई : दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांनी अलिकडेच विवेक अग्निहोत्री यांच्या द काश्मीर फाईल्स सिनेमावर टीका करत या सिनेमाला कचरा असं म्हटलं आहे. तसंच काश्मिरी पंडितांच्या समस्या खरोखरच असल्याचं सांगितलं. सईद यांनी व्यक्त केलेल्या मतावर सिनेनिर्माते अशोक पंडित यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसंच बॉलिवूडनं यावर बाळगलेल्या मौनावरही टीका केली. आता यावर विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली असून सिनेमाला कचरा म्हणणाऱ्या सईद मिर्झांना त्यांनी चोख उत्तर दिलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Vivek- Saeed


मलायका अरोराच्या फॅशन सेन्सची लेकानेच उडवली खिल्ली, म्हणाला- 'कैद्यांसारखी दिसते'

विवेक यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एका बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केला. त्यात सईज मिर्झा यांनी द काश्मीर फाईल्स सिनेमाला कचरा म्हटल्याचं नमूद केलं आहे. त्याबरोबर विवेक यांनी लिहिलं की, 'माझा मिर्झा साहेबांना सलाम. जनाब, पुन्हा भेटू या द दिल्ली फाईल्सनंतर २०२४ मध्ये!'


काय म्हणाले होते सईद मिर्झा

'नुक्कड' आणि 'इंतजार' यासारख्या मालिका याशिवाय 'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है?' आणि 'नसीम' सारख्या चित्रपटांसाठी ते प्रसिद्ध आहेत. ते पटकथा लेखक आणि दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहेत. 'द कश्मीर फाइल्स'वरील वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे ते सध्या चर्चेत आले आहेत. सिनेमावर भाष्य करताना ते म्हणाले होते की, 'माझ्यासाठी 'द कश्मीर फाइल्स' हा कचरा आहे. काश्मिरी पंडितांचा मुद्दा कचरा आहे का? नाही हे असे नाही, तो मुद्दा खरा आहे. फक्त काश्मिरी हे हिंदूच आहेत का? नाही. मुस्लिमदेखील आहेत. इथे मुद्दा कोणाचा बाजू घेण्याचा नाही. माणूस व्हा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा.'

शाहरुखची कातडी सोलेन; सलमान-आमिरचा तर जीवच घेईन... संत परमहंस यांची जीभ घसरली

अभिनेत्री पल्लवी जोशी यांची निर्मिती असणारा हा सिनेमा १५ ते २५ कोटींच्या बजेटमध्ये बनला होता. मात्र सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जवळपास ३०० कोटींचा गल्ला जमवला. या सिनेमात पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, चिन्मय मांडलेकर आणि दर्शन कुमार मुख्य भूमिकांमध्ये होते.

आता दिल्ली दंगलीवर येतोय द दिल्ली फाईल्स

आता विवेक अग्निहोत्री हे 'द दिल्ली फाईल्स' हा सिनेमा घेऊन येत आहे. या सिनेमात दिल्लीमध्ये झालेली दंगल दाखवली आहे. सिनेमाबद्दल विवेक यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, १९८४ मध्ये झालेल्या शिख दंगलीतील सत्य यात दाखवले जाणार आहे. त्यात तामिळनाडूचं कनेक्शन असून ते ही सगळ्यांना लवकरच कळणार आहे.
लेखकाबद्दल
मधुरा नेरुरकर
मधुरा नेरुरकर, महाराष्ट्र टाइम्समध्ये सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा प्रिंट आणि डिजिटल मीडियातील १२ वर्षांचा अनुभव आहे. मनोरंजन, लाइफस्टाइल क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज