मुंबई:
देशातील महत्त्वाचा मुद्द्या 'विज चोरी' या विषयावर भाष्य करणारा ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपपटाची बॉक्सऑफिसवर देखील 'बत्ती गुल' असल्याचं पाहायला मिळत आहे. २१सप्टेंबरला हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाकडून चांगल्या कमाईची अपेक्षा केली जात होती. मात्र चित्रपटानं प्रेक्षकांची निराशा केल्याचं चित्र आहे. चित्रपटात शाहिद कपूर, श्रध्दा कपूर आणि यामी गौतम या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
पहिल्या आठवड्यात चित्रपटानं केवळ २१.५० कोटींचा गल्ला जमवला. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी चित्रपटानं ६.२५ कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी ७.२७ कोटींचा व्यवसाय केला. रविवारी चित्रपटाच्या कमाईचा आकडा ८ कोटींवर पोहोचला.
उत्तराखंडमधील टिहरी या छोट्याशा गावामध्ये राहणारा सुशील कुमार पंत (शाहीद कपूर)याच्या भोवती या चित्रपटाचं कथानक फिरत असून त्याला साजेशा गाण्यांची जोड देण्यात आली आहे.
देशातील महत्त्वाचा मुद्द्या 'विज चोरी' या विषयावर भाष्य करणारा ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपपटाची बॉक्सऑफिसवर देखील 'बत्ती गुल' असल्याचं पाहायला मिळत आहे. २१सप्टेंबरला हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाकडून चांगल्या कमाईची अपेक्षा केली जात होती. मात्र चित्रपटानं प्रेक्षकांची निराशा केल्याचं चित्र आहे. चित्रपटात शाहिद कपूर, श्रध्दा कपूर आणि यामी गौतम या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
पहिल्या आठवड्यात चित्रपटानं केवळ २१.५० कोटींचा गल्ला जमवला. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी चित्रपटानं ६.२५ कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी ७.२७ कोटींचा व्यवसाय केला. रविवारी चित्रपटाच्या कमाईचा आकडा ८ कोटींवर पोहोचला.
उत्तराखंडमधील टिहरी या छोट्याशा गावामध्ये राहणारा सुशील कुमार पंत (शाहीद कपूर)याच्या भोवती या चित्रपटाचं कथानक फिरत असून त्याला साजेशा गाण्यांची जोड देण्यात आली आहे.