अ‍ॅपशहर

ताऱ्यांची टक्कर

मल्टिस्टारर सिनेमे हे प्रेक्षकांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय असतो. मराठीत असे अनेक सिनेमे लवकरच पडद्यावर येऊ घातले असून, प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या कलाकारांची अदाकारी बघायला मिळेल. मोठ्या पडद्यावर होणाऱ्या ताऱ्यांच्या या टक्करीविषयी…

मृण्मयी नातू | Maharashtra Times 2 Jul 2017, 6:09 pm
'कच्चा लिंबू', 'जिप्सी', 'मला काहीच प्रॉब्लेम नाही', ‘बस स्टॉप’, ‘शेंटिमेंटल’ असे मल्टिस्टारर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. बॉलिवूडप्रमाणेच मराठीतही मल्टिस्टारर सिनेमांची लाट येणार असून, प्रेक्षक त्यांना कसा प्रतिसाद देताहेत हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम what is future of multistarer movies in marathi
ताऱ्यांची टक्कर

'व्हेंटिलेटर', 'दुनियादारी', 'प्यारवाली लव्हस्टोरी', 'वाय झेड', 'फॅमिली कट्टा' यांसारखे हाताच्या बोटांवर मोजता येतील असे मल्टिस्टारर सिनेमे बॉक्सऑफिसवर छाप पडू शकलेत. त्याउलट तगडी स्टारकास्ट असतानाही 'एफयू', 'बाजी', 'वृंदावन', 'नागरिक', 'वेलकम जिंदगी', 'बंध नायलॉनचे', 'फुगे', 'जाऊंद्या ना बाळासाहेब' हे अलीकडच्या काळात आलेले अनेक सिनेमे चालले नाहीत. पण असं असतानाही येत्या काळात अनेक स्टार्स असलेले काही सिनेमे बॉक्सऑफिसवर धडकताना दिसणार आहेत. 'मराठी सिनेमांच्या बाबतीत काहीच शाश्वती देता येत नाही. किती स्टार्स आहेत यापेक्षा त्याची कशी पब्लिसिटी केली गेलीय आणि त्याचा आशय कसा आहे यावरच सिनेमा बॉक्सऑफिसवर हिट किंवा फ्लॉप ठरतो' असं सनशाइन स्टुडियोजचे वितरक अंकित चंदीरामानी सांगतात.

आव्हानं काय?
मल्टिस्टारर सिनेमे करताना सगळ्या कलाकारांच्या तारखा मिळवणं, मानधन ठरवणं, शूटिंगदरम्यान कलाकारांचे इगो सांभाळणं आणि प्रमोशन्सच्या वेळी सगळ्यांना समान न्याय मिळतोय ना हे पाहणं अशा अनेक आघाड्यांवर काम करावं लागतं.

मराठीला कास्टिंगची गरज
'व्हेंटिलेटर' या हिट मल्टिस्टारर सिनेमाचा कास्टिंग डायरेक्टर रोहन मापुस्कर सांगतो, 'अशा सिनेमातली पात्रं जितकी जास्त खरी वाटतील तितकी ती लोकांच्या मनाला भावतात. अशावेळी भूमिकेचा विचार करून कलाकारांचं कास्टिंग व्हायला हवं. मराठीत कास्टिंगची प्रक्रिया येणं आवश्यक आहे. त्यासाठी स्वतंत्र बजेट असायला हवं.'

नावांचं वलय महत्त्वाचं
प्रेक्षकांच्या मनात आशयाबाबत उत्सुकता निर्माण करण्यासाठी, कलाकार निवडताना त्याची फेसव्हॅल्यू हा मुद्दा लक्षात घेतला जातो. त्यांच्या नावामागे असणारं वलय महत्त्वाचं असतं. भूमिकेला योग्य तो न्याय देण्यात कलाकार सर्वतोपरी मेहनत घेतात. सगळे जण एकमेकांना सांभाळून घेतात.
- समीर जोशी, दिग्दर्शक (बस स्टॉप)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज