अ‍ॅपशहर

रजनीकांतने केले 'बाहुबली'चं कौतुक

'बाहुबली-२' ने सर्वत्र धुमाकूळ घातलेला असतानाच 'बाहुबली'च्या यशाने सुपरस्टार रजनीकांतही भारावून गेला असून त्यांनी या 'बाहुबली'च्या यशाचं भरभरून कौतुक केलं आहे. 'हा चित्रपट भारतीय सिनेमाचा अभिमान असेल. तुमच्या टीमला माझा सलाम,' असं गौरवोद्गार रजनीकांत यांनी काढले आहेत.

Maharashtra Times 1 May 2017, 3:33 pm
मटा ऑनलाइन वृत्त । चेन्नई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम whoa baahubali 2 is indian cinemas pride tweets superstar rajinikanth
रजनीकांतने केले 'बाहुबली'चं कौतुक


'बाहुबली-२' ने सर्वत्र धुमाकूळ घातलेला असतानाच 'बाहुबली'च्या यशाने सुपरस्टार रजनीकांतही भारावून गेला असून त्यांनी या 'बाहुबली'च्या यशाचं भरभरून कौतुक केलं आहे. 'हा चित्रपट भारतीय सिनेमाचा अभिमान असेल. तुमच्या टीमला माझा सलाम,' असं गौरवोद्गार रजनीकांत यांनी काढले आहेत.

देशभरात 'बाहुबली'ची क्रेझ निर्माण झाली आहे. लांबच लांब रांगा लावून आणि महागडं तिकीट घेऊन प्रेक्षक 'बाहुब'ली बघायला येत आहेत. पहिल्याच दिवशी या सिनेमाने सुमारे दीडशे कोटींचा पल्ला गाठल्याने या सिनेमाची आणखीनच चर्चा होऊ लागली आहे. 'बाहुबली'च्या या यशाची सुपरडूपर हिट सिनेमे देणारे अभिनेते रजनीकांत यांनीही दखल घेतली आहे. त्यांनी 'बाहुबली'चं कौतुक करणारं टि्वट केलं आहे. ''बाहुबली-२ भारतीय सिनेमाचा अभिमान आहे. एस एस राजामौली आणि त्यांच्या टीमला माझा सलाम', असं टि्वट रजनीकांत यांनी केलं आहे. खुद्द रजनीकांत यांनीच कौतुक केलं आहे म्हटल्यावर राजामौली यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी लगेच ट्विटला उत्तर देत, 'थलैवा... देव स्वत: आम्हाला आशिर्वाद देत आहे असं वाटतं, यापेक्षा मोठं काही असू शकत नाही', असं म्हटलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज