मुंबई:
अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यातील वाद दिवसेंदिवस चिघळत चालला असून आता या प्रकरणाची 'सिंटा'द्वारे (सिने आणि टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन) पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे.
'सिंटा'च्या नियमानुसार, तीन वर्षे जुनं प्रकरणच 'सिंटा' हाताळू शकते. तनुश्री-नानांच्या प्रकरणाला आता दहा वर्षे झाली आहेत. मात्र, या प्रकरणात नाना किंवा तनुश्री यांनी नव्यानं तक्रार दाखल केली तर आम्ही चौकशी करण्यास तयार आहोत,' असं 'सिंटा'नं म्हटलं आहे.
'हॉर्न ऑके प्लीज’ चित्रपटादरम्यान नाना पाटेकर यांनी आपल्या सोबत असभ्य वर्तन केल्याची रितसर तक्रार २००८ मध्ये तनुश्रीनं 'सिंटा'च्या कार्यकारी समितीकडं केली होती. तेव्हा तनुश्रीच्या तक्रारीची कोणतीच दखल घेण्यात आली नव्हती. त्यावेळी ‘सिंटा’नं आपल्या तक्रारीकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलं, असा आरोपही तनुश्रीनं नुकताच केला होता. तब्बल १० वर्षांनी 'सिंटा'च्या सदस्यांनी तक्रारीवर कारवाई न केल्याबद्दल तनुश्रीची माफी मागितली आहे.
'सिंटा' तनुश्रीसोबत असून तिनं दाखल केलेल्या पाच पानी एफआयआरची सखोल चौकशी करण्यासाठी आम्ही तयार आहोत. या समितीमध्ये दोन महिला वकीलांचाही समावेश आहे, असं 'सिंटा'चे सहसचिव अमित बहल यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच २००८मध्ये जुन्या समितीकडून या प्रकरणात दुर्लक्ष का झालं? योग्य ती कारवाई का करण्यात आली नाही, याबद्दल तत्काळ स्पष्टीकरण मागवण्यात आल्याचही बहल यांनी सांगितलं.
अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्यातील वाद दिवसेंदिवस चिघळत चालला असून आता या प्रकरणाची 'सिंटा'द्वारे (सिने आणि टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन) पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे.
'सिंटा'च्या नियमानुसार, तीन वर्षे जुनं प्रकरणच 'सिंटा' हाताळू शकते. तनुश्री-नानांच्या प्रकरणाला आता दहा वर्षे झाली आहेत. मात्र, या प्रकरणात नाना किंवा तनुश्री यांनी नव्यानं तक्रार दाखल केली तर आम्ही चौकशी करण्यास तयार आहोत,' असं 'सिंटा'नं म्हटलं आहे.
'हॉर्न ऑके प्लीज’ चित्रपटादरम्यान नाना पाटेकर यांनी आपल्या सोबत असभ्य वर्तन केल्याची रितसर तक्रार २००८ मध्ये तनुश्रीनं 'सिंटा'च्या कार्यकारी समितीकडं केली होती. तेव्हा तनुश्रीच्या तक्रारीची कोणतीच दखल घेण्यात आली नव्हती. त्यावेळी ‘सिंटा’नं आपल्या तक्रारीकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलं, असा आरोपही तनुश्रीनं नुकताच केला होता. तब्बल १० वर्षांनी 'सिंटा'च्या सदस्यांनी तक्रारीवर कारवाई न केल्याबद्दल तनुश्रीची माफी मागितली आहे.
'सिंटा' तनुश्रीसोबत असून तिनं दाखल केलेल्या पाच पानी एफआयआरची सखोल चौकशी करण्यासाठी आम्ही तयार आहोत. या समितीमध्ये दोन महिला वकीलांचाही समावेश आहे, असं 'सिंटा'चे सहसचिव अमित बहल यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच २००८मध्ये जुन्या समितीकडून या प्रकरणात दुर्लक्ष का झालं? योग्य ती कारवाई का करण्यात आली नाही, याबद्दल तत्काळ स्पष्टीकरण मागवण्यात आल्याचही बहल यांनी सांगितलं.