मुंबई:
बॉलिवूडमधील लैंगिक शोषणाच्या मुद्द्यावर सुप्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत आपलं मत मांडलं आहे. 'सध्या पुढं येणाऱ्या लैंगिक शोषणाच्या विविध घटनांचं बीज आपल्या पुरुषप्रधान व सनातनी मानसिकतेत आहे. चित्रपटांमध्ये महिलांचं जे चित्र रंगवलं जात, त्याचाही यात मोठा वाटा आहे. निर्माते म्हणून आम्हीही यास जबाबदार आहोत,' असं राय यांनी म्हटलं आहे.
अभिनेत्री तनुश्री दत्ता हिनं नाना पाटेकर यांच्यावर विनयभंगाचा आरोप केल्यापासून बॉलिवूडमध्ये 'मी टू' ही चळवळच सुरू झाली आहे. अनेक अभिनेत्री व महिला स्वत:वर गुदरलेले प्रसंग मांडण्यासाठी पुढं येत आहेत. त्यांना पाठिंबाही मिळत आहे. बॉलिवूडमधील स्टार मंडळींनी याबाबत मौन पाळलं असलं तरी काही विचारी, संवेदनशील कलाकार हिरीरीनं मतं मांडत आहेत. आनंद एल राय हेही कोणाची थेट बाजू न घेता व्यक्त झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणाबाबत बोलताना त्यांनी बदलत्या सामाजिक मानसिकतेवर बोट ठेवलं आहे.
'चित्रपटांमध्ये काळानुरूप होत गेलेले बदलही यास कारणीभूत आहेत. 'एकेकाळी लोक अभिनेत्रींच्या सोज्वळतेच्या, सात्विकतेच्या चर्चा करायचे. आज चित्र उलट आहे. आज बॉलिवूडवालेच मुलींना वेगवेगळे टॅग देतात. गाण्यांनुसार मुलींना वेगवेगळे टॅग दिले जातात. त्यातून समाजातही तसाच संदेश जाणार,' असा सवाल त्यांनी केला. 'चित्रपटसृष्टी एखाद्या कुटुंबासारखी आहे. आम्हाला या कुटुंबाची काळजी घ्यावी लागेल. अन्यथा, समाजात आमची प्रतिमा अशीच बनून राहणार,' असंही राय म्हणाले. 'लैंगिक शोषणांच्या घटनांबद्दल सातत्यानं चर्चा व्हायला हवी. काही ठोस पावलंही उचलायला हवी. तरच, काही तरी बदल होतील. कदाचित त्यासाठी २५ वर्षेही लागतील. पण आपण प्रयत्न सुरू ठेवले पाहिजेत,' असं राय म्हणाले.
बॉलिवूडमधील लैंगिक शोषणाच्या मुद्द्यावर सुप्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत आपलं मत मांडलं आहे. 'सध्या पुढं येणाऱ्या लैंगिक शोषणाच्या विविध घटनांचं बीज आपल्या पुरुषप्रधान व सनातनी मानसिकतेत आहे. चित्रपटांमध्ये महिलांचं जे चित्र रंगवलं जात, त्याचाही यात मोठा वाटा आहे. निर्माते म्हणून आम्हीही यास जबाबदार आहोत,' असं राय यांनी म्हटलं आहे.
अभिनेत्री तनुश्री दत्ता हिनं नाना पाटेकर यांच्यावर विनयभंगाचा आरोप केल्यापासून बॉलिवूडमध्ये 'मी टू' ही चळवळच सुरू झाली आहे. अनेक अभिनेत्री व महिला स्वत:वर गुदरलेले प्रसंग मांडण्यासाठी पुढं येत आहेत. त्यांना पाठिंबाही मिळत आहे. बॉलिवूडमधील स्टार मंडळींनी याबाबत मौन पाळलं असलं तरी काही विचारी, संवेदनशील कलाकार हिरीरीनं मतं मांडत आहेत. आनंद एल राय हेही कोणाची थेट बाजू न घेता व्यक्त झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणाबाबत बोलताना त्यांनी बदलत्या सामाजिक मानसिकतेवर बोट ठेवलं आहे.
'चित्रपटांमध्ये काळानुरूप होत गेलेले बदलही यास कारणीभूत आहेत. 'एकेकाळी लोक अभिनेत्रींच्या सोज्वळतेच्या, सात्विकतेच्या चर्चा करायचे. आज चित्र उलट आहे. आज बॉलिवूडवालेच मुलींना वेगवेगळे टॅग देतात. गाण्यांनुसार मुलींना वेगवेगळे टॅग दिले जातात. त्यातून समाजातही तसाच संदेश जाणार,' असा सवाल त्यांनी केला. 'चित्रपटसृष्टी एखाद्या कुटुंबासारखी आहे. आम्हाला या कुटुंबाची काळजी घ्यावी लागेल. अन्यथा, समाजात आमची प्रतिमा अशीच बनून राहणार,' असंही राय म्हणाले. 'लैंगिक शोषणांच्या घटनांबद्दल सातत्यानं चर्चा व्हायला हवी. काही ठोस पावलंही उचलायला हवी. तरच, काही तरी बदल होतील. कदाचित त्यासाठी २५ वर्षेही लागतील. पण आपण प्रयत्न सुरू ठेवले पाहिजेत,' असं राय म्हणाले.