अ‍ॅपशहर

आठ वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन, क्षितिज पटवर्धनचं हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला

kshitij patwardhan marathi play: सिनेइंडस्ट्रीतला लोकप्रिय लेखक क्षितिज पटवर्धन तब्बल आठ वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन करत आहे.

Edited byभाग्यश्री रसाळ | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Apr 2024, 4:07 pm
प्रथमेश दोंड, स्टर्लिंग इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kshitij patwardhan


बच्चेकंपनीसाठी एक खुशखबर! मैदानी, घरगुती खेळ, टीव्ही, व्हिडीओ गेम्स असं सगळं करून काही काळानं कंटाळा येतोच. तर बालगोपाळांचा हा कंटाळा घालवण्यासाठी आणि सुट्टीत एक वेगळा अनुभव देण्यासाठी लेखक क्षितिज पटवर्धन एक नवं कोरं नाटक घेऊन आला आहे. ‘आजीबाई जोरात’ असं नाटकाचं नाव असून क्षितिजनं ते दिग्दर्शितही केलं आहे. ‘दोन स्पेशल’ या गाजलेल्या नाटकानंतर क्षितिज आठ वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन करतोय. या बालनाट्यात कृत्रिम बुद्धिमत्ता, ॲनिमेशन, संगीत आणि नृत्य अशा विविध गोष्टींचा अनुभव प्रेक्षकांना घेता येईल.

आठ वर्षांनी नाटककाकडे वळण्याविषयी क्षितीज म्हणाला, ‘गेली तीन वर्षं मी हिंदी चित्रपट, वेब सीरिजलेखन करतोय. मराठीमध्येही काहीतरी करायला हवं असं नेहमी वाटे. तसंच ‘दोन स्पेशल’नंतर एकही नाटक केलं नव्हतं; म्हणून मी हे नाटक करायचं ठरवलं.’ चंद्रकांत कुलकर्णी आणि दिलीप जाधव यांनी नाटकाची निर्मिती केली आहे. नाटकात ८ कलाकार आणि ११ नर्तक आहेत. ‘हे नाटक आजच्या तरुण पिढीच्या आणि त्यांच्या पालकांशी निगडित विषयावर आहे. नव्या प्रेक्षकांची पिढी तयार करायची असेल तर दर्जेदार मनोरंजनाचा अनुभव द्यायला हवा. असा विषय आणि तंत्रज्ञानाचा वापर याआधी बालनाट्यामध्ये झालेला नाही. यापुढे कोणतीही नवी कलाकृती करताना त्यातला काही भाग तरुण पिढी आणि लहान मुलांसाठी असेल असा मी नेहमी विचार करणार आहे’, असं क्षितिज म्हणाला.
लगट करणाऱ्या कार्तिकचा सईमुळे फसला प्लॅन, बायकोसाठी सागर लेकीशी करणार हातमिळवणी
लेखन आणि दिग्दर्शन अशी दुहेरी जबाबदारी आनंद देणारी असल्याचं क्षितिज आवर्जून म्हणाला. ‘आपण केलेल्या लेखनाचे विविध पैलू दिग्दर्शक म्हणून कलाकार आणि तंत्रज्ञांसोबत तपासता येतात. त्यात नव्यानं भर घालता येते. त्यामुळे लेखनासह दिग्दर्शनाचंही काम मी हाती घेतलं. माझे वडील गेली अनेक वर्षं बालरंगभूमीसाठी काम करत आहेत. त्यामुळे त्यांनादेखील हे बालनाट्य पाहून आनंद होणार आहे’, असं त्यानं सांगितलं. पहिल्यांदाचा बालनाट्य करत असल्यामुळे क्षितिजनं विशेष तयारी केली आहे. त्याविषयी तो सांगतो, ‘लहान मुलांचा प्रेक्षक म्हणून कसा अनुभव असतो याविषयी मी वडिलांशी चर्चा केली. मी स्वत: अनेक बालनाट्य पाहिली आहेत. मित्रांच्या मुलांना हे नाटक वाचून दाखवलं. त्यांचा अभिप्राय सुखावणारा होता.’ या नाटकात काही दिग्गज कलाकारसुद्धा असणार आहेत.


'नेताजी सुभाषचंद्र बोस हे पहिले PM' कंगनाच्या चुकीच्या विधानाने तापलं वातावरण,आता म्हणतेय...
‘आजीबाई जोरात’ विनोदाच्या अंगानं जाणारी अशी फँटसी आहे. वय वर्षं पाचपासून त्यापुढील वयोगटातील मुलांना मनोरंजनासाठी कार्टून, बडबड गीतं इतकीच माध्यमं आहेत. म्हणूनच पालक आणि मुलं एकत्र पाहू शकतील अशी ही सुंदर अनुभव देणारी कलाकृती असेल.
लेखकाबद्दल
भाग्यश्री रसाळ
" महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हाताळण्याचा सहा वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांच्या लिखाणाची आवड."... आणखी वाचा

महत्वाचे लेख