मुंबई: ''नाट्यरसिकांका एक धोक्याची सूचना, नाटक ऐकताना तुम्ही ज्यावेळी हशशाल त्यावेळी तुमचा वस्त्रहरण झाला तर त्येची जबाबदारी आमच्यावर नाय हां'...असं सांगत ज्येष्ठ अभिनेते मच्छिंद्र कांबळी यांनी नाट्यरसिकांना 'वस्त्रहरण'मधून खळखळून हसवलं. रसिकांच्या मनात आगळंवेगळं स्थान निर्माण करणाऱ्या 'वस्त्रहरण' या नाटकाला यंदा १६ फेब्रुवारी रोजी ४४ वर्षं पूर्ण झाली. यानिमित्तानं सेलिब्रिटी कलाकारांच्या संचात 'वस्त्रहरण'चे सुरुवातीचे दोन आणि नंतर ४४ असे एकूण ४६ प्रयोग पुन्हा सादर होणार आहेत. हे नाटक नव्यानं येणार असल्याचं कळल्यानंतर, नव्या संचात कोण कलाकार झळकणार याची नाट्यरसिकांना उत्सुकता होती. या कलाकारांची नावं सगळ्यात आधी 'मटा' खास तुमच्यासाठी सांगत आहे. नाटकातील प्रचंड गाजलेल्या तात्याच्या भूमिकेत दिगंबर नाईक तर मास्तरच्या भूमिकेत अभिनेता पुष्कराज चिरपुटकर झळकणार आहे. दुर्योधनाच्या भूमिकेत प्रियदर्शन जाधव, दु:शासनाच्या भूमिकेत रोहन गुजर, विदुराच्या भूमिकेत सुनील तावडे, अर्जुनाच्या भूमिकेत अंशुमन विचारे, धर्माच्या भूमिकेत ओंकार गोवर्धन तर शकुनी मामाच्या भूमिकेत अरुण कदम, प्रॉम्टरच्या भूमिकेत प्रणव रावराणे हे कलाकार झळकणार आहेत. तर गोप्याच्या भूमिकेत मुकेश जाधव असेल. अभिनेत्री किशोरी अंबिये आणि रेशम टिपणीस यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत.
२०१९ मध्ये ५,२५४वा प्रयोग झाल्यानंतर हे नाटक थांबलं होतं. संपूर्ण नाटक सेलिब्रिटींनी करण्याची या नाटकाची ही तिसरी वेळ आहे. २०१२ मध्ये सेलिब्रिटी कलाकारांच्या संचात नाटकाचे ३० प्रयोग झाले होते. 'संपूर्ण महाराष्ट्रातील नाट्यरसिकांनी आणि विशेषत: संपूर्ण कोकणातील नाट्यप्रेमींनी या नाटकावर भरभरून प्रेम केलं आहे. या नाटकानं आता ४५व्या वर्षात पदार्पण केलं आहे. वेगवेगळ्या कलाकारांनी येऊन मालवणीमध्ये हे नाटक सादर करणं ही वेगळी, धमाल गोष्ट आहे. गेली तीन वर्षं मी यासाठी प्रयत्न करत होतो. आता सुदैवानं त्याला मूर्त रुप आलं आहे', असं निर्माता प्रसाद कांबळीनं सांगितलं. प्रयोग क्रमांक ५,२५५ आणि ५,२५६ हे दोन प्रयोग झाल्यानंतर मुंबई, ठाणे, कल्याण, वाशाी येथे नाटकाचे एकूण ४४ प्रयोग सादर होतील. त्यानंतर ५,३००वा प्रयोग थोडा वेगळ्या स्वरुपात सादर होऊन मग हे नाटक स्वल्पविराम घेईल, असं प्रसादनं सांगितलं.
निर्माते प्रसाद कांबळी यांनी असे म्हटले की, 'नव्या संचातील प्रत्येक कलाकाराचं एक वैशिष्ट्य आहे. प्रत्येक जण आपापल्या जागा शोधून प्रयोग करतील. आताचे नव्या पिढीतील लोकप्रिय कलाकार घेऊन हे तुफान लोकप्रिय मालवणी नाटक पुन्हा एकदा धमाल करण्यासाठी सज्ज होतेय.'
२०१९ मध्ये ५,२५४वा प्रयोग झाल्यानंतर हे नाटक थांबलं होतं. संपूर्ण नाटक सेलिब्रिटींनी करण्याची या नाटकाची ही तिसरी वेळ आहे. २०१२ मध्ये सेलिब्रिटी कलाकारांच्या संचात नाटकाचे ३० प्रयोग झाले होते. 'संपूर्ण महाराष्ट्रातील नाट्यरसिकांनी आणि विशेषत: संपूर्ण कोकणातील नाट्यप्रेमींनी या नाटकावर भरभरून प्रेम केलं आहे. या नाटकानं आता ४५व्या वर्षात पदार्पण केलं आहे. वेगवेगळ्या कलाकारांनी येऊन मालवणीमध्ये हे नाटक सादर करणं ही वेगळी, धमाल गोष्ट आहे. गेली तीन वर्षं मी यासाठी प्रयत्न करत होतो. आता सुदैवानं त्याला मूर्त रुप आलं आहे', असं निर्माता प्रसाद कांबळीनं सांगितलं. प्रयोग क्रमांक ५,२५५ आणि ५,२५६ हे दोन प्रयोग झाल्यानंतर मुंबई, ठाणे, कल्याण, वाशाी येथे नाटकाचे एकूण ४४ प्रयोग सादर होतील. त्यानंतर ५,३००वा प्रयोग थोडा वेगळ्या स्वरुपात सादर होऊन मग हे नाटक स्वल्पविराम घेईल, असं प्रसादनं सांगितलं.
निर्माते प्रसाद कांबळी यांनी असे म्हटले की, 'नव्या संचातील प्रत्येक कलाकाराचं एक वैशिष्ट्य आहे. प्रत्येक जण आपापल्या जागा शोधून प्रयोग करतील. आताचे नव्या पिढीतील लोकप्रिय कलाकार घेऊन हे तुफान लोकप्रिय मालवणी नाटक पुन्हा एकदा धमाल करण्यासाठी सज्ज होतेय.'