मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सुरू असलेलं वर्सोवा पुलाचं काम, त्यामुळे महामार्गावर आणि घोडबंदर रोडवर होणारी जबरदस्त वाहतूककोंडी हे चित्र नेहमीचंच. शनिवारी दुपारी काही नाट्यकलाकारांनाही या भागात झालेल्या वाहतूककोंडीचा फटका बसला आणि प्रयोगच रद्द करून तो दुसऱ्या दिवशी ठेवण्याची वेळ आली.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सुरू असलेलं वर्सोवा पुलाचं काम, त्यामुळे महामार्गावर आणि घोडबंदर रोडवर होणारी जबरदस्त वाहतूककोंडी हे चित्र नेहमीचंच. शनिवारी दुपारी काही नाट्यकलाकारांनाही या भागात झालेल्या वाहतूककोंडीचा फटका बसला आणि प्रयोगच रद्द करून तो दुसऱ्या दिवशी ठेवण्याची वेळ आली. ‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकाच्या बाबतीत हा प्रकार घडला.
शनिवारी दुपारी ४.३० वाजता डोंबिवलीतल्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात ‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकाचा प्रयोग होता. नाटकात काम करणारे कलाकार मंगेश कदम, लीना भागवत, शशांक केतकर बोरिवलीहून कारने डोंबिवलीला जाण्यासाठी निघाले. दुपारी एक-दीडच्या सुमारास ते मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दहिसर चेकनाक्याच्या पुढे पोहोचले होते. पण फाऊंटनच्या चौकाजवळ एक ट्रेलर उलटल्यानं या भागात प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. बराच वेळ हे कलाकार वाहतूककोंडीत अडकले होते.
वाहतूक पुढे सरकतच नाही हे बघितल्यावर या कलाकारांनी अखेर गाडी सोडून, भर दुपारच्या उन्हात उलट बाजूने दहिसरच्या दिशेनं चालत येण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी रिक्षानं दहिसर चेकनाका गाठला. पुढे बोरिवलीच्या नॅशनल पार्कपर्यंत येऊन त्यांनी एक खासगी टॅक्सी बोलावली. तोपर्यंत चार तिथेच वाजले होते. त्यामुळे डोंबिवलीत पोहोचणं तर शक्यच नव्हतं.
मंगेश आणि लीना यांचा ‘के दिल अभी…’चा प्रयोग वाशीच्या विष्णूदास भावेमध्ये रात्री साडेआठ वाजता होता. अखेर त्यांनी तिथूनच टॅक्सीनं वाशीला जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान नाट्यव्यवस्थापकांनी डोंबिवलीच्या नाट्यगृहात प्रेक्षकांना कलाकार वाहतूककोंडीत अडकल्याची माहिती दिली. ‘प्रयोगाला काही प्रेक्षक थेट टिटवाळा, वाशीहून आले होते. नाटकाचा हा प्रयोग रद्द करून दुसऱ्या दिवशी सकाळी ११.३० वाजता याच नाट्यगृहात प्रयोग होईल असं आम्ही जाहीर केलं. ज्या प्रेक्षकांना रविवारी येणं शक्य नव्हतं त्यांना तिकीटाचे पैसे परत देण्यात आले. तर जवळपास ५० टक्के प्रेक्षकांनी दुसऱ्या दिवशी नाटकाला येण्याचं मान्य केलं. अचानक ठरलेल्या प्रयोगामुळे पेपरमध्ये जाहीरातही नव्हती. नाट्यगृहाच्या व्यवस्थापकांनी तसंच कर्मचाऱ्यांनीही आम्हाला पूर्ण सहकार्य केलं’, असं नाटकाचे व्यवस्थापक नंदू पणशीकर यांनी सांगितलं.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सुरू असलेलं वर्सोवा पुलाचं काम, त्यामुळे महामार्गावर आणि घोडबंदर रोडवर होणारी जबरदस्त वाहतूककोंडी हे चित्र नेहमीचंच. शनिवारी दुपारी काही नाट्यकलाकारांनाही या भागात झालेल्या वाहतूककोंडीचा फटका बसला आणि प्रयोगच रद्द करून तो दुसऱ्या दिवशी ठेवण्याची वेळ आली. ‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकाच्या बाबतीत हा प्रकार घडला.
शनिवारी दुपारी ४.३० वाजता डोंबिवलीतल्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात ‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकाचा प्रयोग होता. नाटकात काम करणारे कलाकार मंगेश कदम, लीना भागवत, शशांक केतकर बोरिवलीहून कारने डोंबिवलीला जाण्यासाठी निघाले. दुपारी एक-दीडच्या सुमारास ते मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दहिसर चेकनाक्याच्या पुढे पोहोचले होते. पण फाऊंटनच्या चौकाजवळ एक ट्रेलर उलटल्यानं या भागात प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. बराच वेळ हे कलाकार वाहतूककोंडीत अडकले होते.
वाहतूक पुढे सरकतच नाही हे बघितल्यावर या कलाकारांनी अखेर गाडी सोडून, भर दुपारच्या उन्हात उलट बाजूने दहिसरच्या दिशेनं चालत येण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी रिक्षानं दहिसर चेकनाका गाठला. पुढे बोरिवलीच्या नॅशनल पार्कपर्यंत येऊन त्यांनी एक खासगी टॅक्सी बोलावली. तोपर्यंत चार तिथेच वाजले होते. त्यामुळे डोंबिवलीत पोहोचणं तर शक्यच नव्हतं.
मंगेश आणि लीना यांचा ‘के दिल अभी…’चा प्रयोग वाशीच्या विष्णूदास भावेमध्ये रात्री साडेआठ वाजता होता. अखेर त्यांनी तिथूनच टॅक्सीनं वाशीला जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान नाट्यव्यवस्थापकांनी डोंबिवलीच्या नाट्यगृहात प्रेक्षकांना कलाकार वाहतूककोंडीत अडकल्याची माहिती दिली. ‘प्रयोगाला काही प्रेक्षक थेट टिटवाळा, वाशीहून आले होते. नाटकाचा हा प्रयोग रद्द करून दुसऱ्या दिवशी सकाळी ११.३० वाजता याच नाट्यगृहात प्रयोग होईल असं आम्ही जाहीर केलं. ज्या प्रेक्षकांना रविवारी येणं शक्य नव्हतं त्यांना तिकीटाचे पैसे परत देण्यात आले. तर जवळपास ५० टक्के प्रेक्षकांनी दुसऱ्या दिवशी नाटकाला येण्याचं मान्य केलं. अचानक ठरलेल्या प्रयोगामुळे पेपरमध्ये जाहीरातही नव्हती. नाट्यगृहाच्या व्यवस्थापकांनी तसंच कर्मचाऱ्यांनीही आम्हाला पूर्ण सहकार्य केलं’, असं नाटकाचे व्यवस्थापक नंदू पणशीकर यांनी सांगितलं.